Saturday, July 19, 2014

हिंदी कविता



आप का जनम हिंदू घर में हुआ
तो आप हिंदू हित की बात करेंगे

आपका जनम मुस्लिम घर में हो गया
तो आप मुसलमानों के मुद्दों पर बोलेंगे


आप ऊंची जात वाले घर में पैदा हुए तो आप
दलितों के मुद्दों पर अविचलित रहेंगे

अगर आपका जनम दलित परिवार में हुआ तो आप
दलित समस्याओं पर बोलेंगे

आपका जनम किसी बड़े शहर में हुआ तो आप दंतेवाड़ा के आदिवासियों की ज़मीनें छीने जाने को विकास के लिए ज़रूरी बताएँगे

और अगर आपका जनम दंतेवाड़ा के आदिवासी के घर में हुआ तो आप नक्सलवादी कहलायेंगे .

किसी खास जगह पैदा होने की वजह से आप एक खास तरीके से सोचते हैं

आपका चिंतन स्थान सापेक्ष है
स्थान बदलते ही आपके विचार बदल जायेंगे

लेकिन सत्य तो स्थान बदलने से नहीं बदलता

सत्य हिंदू या मुसलमान ,सवर्ण या दलित के, घर में या भारत या पाकिस्तान में भी नहीं बदलता

अब देखिये आपके विचार अपने जनम के स्थान के कारण बने हैं या उन विचारों में हर स्थान में सही सिद्ध होने का गुण है .

कभी अपने ही मन में अपना स्थान बदल कर फिर सोचिये .

कल्पना में खुद को अपने विरोधी के स्थान पर रख कर सोचने की कोशिश कीजिये .

क्या आप हर जगह के सत्य को देख पा रहे हैं ?

क्या अब भी आपको लगता है आप सही थे ?

देखिये आपका कट्टर नजरिया अब हल्का होने लगा है .

यही मुक्ति है .

यही आपके जानवरपन से मनुष्त्व की यात्रा की शुरुआत है .

अब आप जीवन का आनंद लेने के लिए तैयार हैं .

कवी : हिमांशू कुमार

Tuesday, July 8, 2014

माझी विचारसरणी

विविध विषयांवर माझे विचार काय आहेतमाझी मते कोणती आहेत ते या लेखात मांडण्याचा प्रयत्‍न केला आहेविविध विषय म्हटले तरी ते देव-धर्म-श्रद्धा-विवेकवाद यांच्याशी संबंधित आहेततसेच लेखातील विषय काही एका विशिष्ट क्रमाने मांडले आहेत असे नाहीजसे सुचेल तसे लिहिले आहेमला जे मन:पूर्वक वाटते तेच लिहिले आहे.
(हे विश्व कशातून निर्माण झाले कसे उत्पन्न झाले कोणी केले प्रारंभी काय होते हे विश्व शून्यातून निर्माण झाले का याविेषयी मला निश्चित असे काही ठाऊक नाहीअजून मतमतांतरे आहेत असे दिसते.महाविस्फोटबिगबॅंगहिग्सबोसोन् कण यांसंबंधी प्रसंगपरत्वे वाचतोपण ते मला आकळते(समजतेअसेनाहीहे विश्व एवढे अफाटएवढे अमर्याद आहे की त्याच्या तुलनेत आपला पृथ्वी ग्रह अगदीच नगण्य आहेहेमला समजतेमाझा संबंध या पृथ्वी ग्रहाशी आहेम्हणून विश्वाच्या उत्पतीविषयी मी अधिक विचार करीत नाहीअवकाशवस्तुमानकाळ (स्पेस-मास-टाईमया गोष्टी अनादि कालापासून अस्तित्वात आहेत ,निसर्गनियमही अनादि कालापासून आहेत असे मी मानतोया घटकांवर निसर्गनियमांनुसार विविध प्रक्रिया होऊन तारेग्रहमालाआकाशगंगानेब्यूलाक्वासारकृष्णविवरेइत्यादि सर्व काही निर्माण झाले असे मी मानतोमाझे हे अज्ञान असेलमाझ्या आकलन क्षमतेची ही मर्यादा आहे.
मात्र हे विश्व कोण्या एका अलौकिक ईश्वराने निर्माण केलेले नाहीते निसर्गनियमांनुसार उद्भवले असे माझे ठाम मत आहेयाविषयी अधिक वाचन,मननचिंतन करण्याची माझी क्षमता नाहीतसे करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाहीत्यातून काही उपयुक्त घडेल असेही वाटत नाहीमाझे आयुष्य काही वर्षांचे आहेमाझे विश्व लहान आहे.
() " या अमर्याद विश्वाविषयी अधिक सखोल विचार करावा असे मला वाटत नाही. " असे म्हटले असले तरी या विश्वाविषयी शक्य होईल तेवढे सत्यज्ञान आपण मिळवायला हवे असे मला वाटतेआपली ग्रहमाला(प्लॅनेटरि सिस्टिमकशी अस्तित्वात आली याचे विश्वासार्ह आणि सर्वमान्य ज्ञान विज्ञानाला आहे.साधारणपणे ४६० कोटी वर्षांपूर्वी एक अजस्र तारा सूर्या जवळून गेलात्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे सूर्यावर मोठी भरती आली. (सूर्य वायुरूप आहे.) ती फुटून लहान-मोठे पुंजके तयात झालेते सूर्याच्या गुरुत्वाकर्षणक्षेत्राच्या बाहेर गेले नाहीतसूर्याच्या केंद्रगामी गुरुत्वाकर्षण बलामुळे(सेंट्रिपेटल फोर्सते सूर्याभोवती फिरत राहिलेहीझाली आपली ग्रहमालाम्हणजे पृथ्वीचे वय ४६० कोटी वर्षे आहे.
कालांतराने पृथ्वी थंड झालीपाणी पृथ्वीच्या पोटातून वर येऊन समुद्र निर्माण झालेसमुद्राच्या पाण्यातील विविध रासायनिक द्रव्यांचे क्रमपर्यायी संयोग (परम्युटेशन्स-कॉंबिनेशन्सअविरत घडत राहिलेया सततच्या प्रक्रियेतून सुमारे साठ कोटी वर्षांनी सजीव पेशी यदृच्छया निर्माण झाल्याअगदी प्रथमिक स्वरूपाचे जीव तयार झालेनंतर स्वैर गुणबदल (रॅंडम म्युटेशनआणि निकष लावून झालेली नैसर्गिक निवड (नॉन रॅंडम नॅचरल सिलेक्शनया तत्त्वांच्या आधारे उत्क्रांती होत होत या पृथ्वीवरील वैविध्यपूर्ण सजीवसृष्टी निर्माण झालीमाणूसही त्याच प्रक्रियेतून उत्क्रांत झाला.
(या पृथ्वी ग्रहावरील मानव प्रजातीत माझा जन्म झाला हे माझे महद्भाग्य मानतोमला लाभलेले हे एकमेव जीवन आहे--पहिले आणि शेवटचेमाझा गतजन्म नव्हतापुनर्जन्मही असणार नाहीकुणाचाच नसतो.पुनर्जन्म ही भ्रामक कल्पना आहे. "जातस्य हि ध्रुवो मृत्युहे गीतावचन सत्य आहेमृत्यू अटळ आहेमाझामृत्यू झाल्यावर माझे जीवन संपुष्टात येणार.
(मी कुटुंबात राहातोसमाजात राहातोम्हणून जी काही माझी कौटुंबिक कर्तव्ये आहेतसामाजिक कर्तव्ये आहेत ती सर्व मी यथाशक्तीयथामती आनंदाने आणि निष्ठेने पार पाडणारकर्तव्य म्हणजे अवश्य करायला हवे असे स्वकर्मज्ञानेश्वरीतील "तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्मकुसुमांची वीरा ।पूजा केली होय अपारा तोषालागी ।हे वचन मी मानतो.
(मरण अटळ आहेमृत्युनंतर पुन्हा जीवन नाहीम्हणून या सृष्टिविषयीचे आणि विश्वासंबंधीचे शक्य होईल तेवढे सत्यज्ञान मिळविण्याचा मी आमरण प्रयत्‍न करणारजीवनाचा आनंद उपभोगणारकुटुंबाचे,समाजाचे आणि पुढील पिढ्यांचे जीवन अधिक सुखकर ,अधिक सुरक्षित होईल यासाठी शक्य होईल ते काम करणारसमाजातील अज्ञान आणि माणसांचे दु: दूर होण्यासाठी यथाशक्ती प्रयत्‍न करणार.
(भारत माझा देश आहेसारे भारतीय माझे बांधव आहेतया सार्‍यांच्या प्रगतीत देशाची प्रगती गुंफलेली आहेहे मला पटतेम्हणून मी ते मनापासून मानतोमाझ्या देशबांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे त्यांच्या हिताचे आहेम्हणून ते समाजाच्या आणि अंततदेशाच्या हिताचे आहे असे मला विचारान्तीं वाटतेहेप्रामाणिक मत माझ्या देशबांधवांना वैधमार्गांनी परोपरीने सांगण्याचे मला घटनादत्त स्वातंत्र्य आहेकिंबहुनावैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे आणि त्याचा प्रसार करणे हेभारतीय संविधानानुसार आपणा सर्वांचे कर्तव्य आहे.
(या लेखात मी ज्या अंधश्रद्धा सांगितल्या आहेतज्यांना भंपक शास्त्रे (स्यूडो सायंसे म्हटले आहेत्यांतीलकोणत्याही गोष्टीचा त्याग न करता ती खरी मानून चालणार्‍या श्रद्धाळूंना मी दोष देत नाहीत्यांच्याविषयीमाझ्यामनात किंचितही राग नाहीपण त्यांनी स्वबुद्धीने विचार करावाश्रद्धेची चिकित्सा करावीअसे माझे मत आहेसमाजात काही धूर्तलबाड माणसे असतातसर्वकाळी असतातश्रद्धाळूंना फसवून लुबाडणेत्यांचेआर्थिक शोषण करणे हाच त्यांच्या उपजीविकेचा धंदा असतोप्रसारमाध्यमांतून जाहिराती करून ते सतत अज्ञान पसरवीत असताततसेच भाडोत्री प्रचारक नेमून आपल्या धंद्याचा प्रचार करतातएखाद्या समस्येमुळे अपरिहार्यपणे अगतिक झालेले श्रद्धाळू या धूर्तांच्या प्रचाराला बळी पडतातआधीच अगतिक झालेल्या आणि श्रद्धेने लिप्त असलेल्या लोकांना आपली आर्थिक फसवणूक होत आहे हे कळतही नाहीमाझा विरोध आहे तो या कावेबाज धूर्तांनाराग येतो तो त्यांचाते भोळ्या श्रद्धाळूंना अज्ञानात ठेवून निर्दयपणे फसवत असतातवरशहाजोगपणाचा आव आणतात.
(जगनिर्माताजगन्नियंतापूजा-अर्चा-प्रार्थना यांनी संतुष्ट होऊन भक्तांवर कृपा करणारा असा कोणी अलौकिक ईश्वर अस्तित्वात नाहीकितीही आर्ततेने धावा केला तरी देव धावून येत नाही. "देव भक्ताघरीं धावलाहे केवळ काल्पनिक पुराणकथांत असतेव्यवहारात नसतेमाणसाने वास्त्ववादी असावेकुठल्याहीभ्रमात राहू नये.
() "या विश्वात एक अलौकिक अद्भुत शक्ती आहेती विश्वाचे संचलन करतेविश्वातील यच्चयावत् सर्व घटना ती शक्ती घडवते. " हे पूर्णतया तथ्यहीन आहेअशी अलौकिक शक्ती कुठेही अस्तित्वात नाही.विश्वातील सर्व घटना निसर्गनियमांनुसार घडतात.
(१०जगात कुणाकडे कसलीही दैवी शक्ती नसतेआपल्या कृपेनेप्रसादानेअनुग्रहानेआशीर्वादाने कुणाचे भले करण्याचे सामर्थ्य कुणाजवळ नसतेमग तो कितीही मोठासुप्रसिद्ध असोतसे सामर्थ्य असल्याचा दावा करणारे गुरु-बाबा-स्वामी-बापू हे सर्व लबाडढोंगीठकसेन असतात अथवा मनोविकृत भ्रमसेन असतात.
..........
(११आत्मापुनर्जन्मपरमात्मामोक्ष या सर्व भ्रामक संकल्पना आहेतत्या उपनिषदांत आहेतगीतेतप्रत्यक्ष भगवंतांच्या मुखी आहेतशांकरभाष्यात आहेतसंतसाहित्यात आहेततरी त्या सत्य मानता येत नाहीतत्या प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध होत नाहीतलोकप्रसिद्ध अनुमान प्रमाणाने सिद्ध होत नाहीततार्किकयुक्तिवादाने तसेच मानवाच्या अधिकृत ज्ञान संग्रहातील तत्त्वांच्या आधारे वरील संकल्पनांची सत्यता प्रस्थापित करता येत नाहीत्या संकल्पना केवळ श्रद्धेने खर्‍या मानायच्याश्रद्धेला तर विज्ञानात तसेच तर्कशास्त्रात मुळीच स्थान नाहीम्हणून आत्मापरमात्मा इसंकल्पना मी खर्‍या मानीत नाहीपूर्वापार ,पिढ्यानुपिढ्या चालत आलेल्या या संकल्पनांची कोणतीही चिकित्सा न करता व्यासमहर्षीआद्यशंकराचार्य,ज्ञानेश्वरअन्य साधुसंत यांनी त्या शब्दप्रामाण्याच्या आधारे खर्‍या मानल्यापण आधुनिक विज्ञानाच्या आधारे चिकित्सा केल्यास त्या भ्रामक ठरतात.
(१२स्वर्गनंदनवनअप्सराअमृतनरक-कुंभिपाक-रौरव-यमयातना या सर्वच्या सर्व गोष्टी केवळ काल्पनिक आहेतप्रत्यक्ष अस्तित्वात नाहीतहे उघड आहे.
(१३संचितक्रियमाणप्रारब्धकर्मविपाकया तथ्यहीन कल्पना आहेतनियतीललाटलेखब्रह्मलिखित,या सर्व गोष्टी निरर्थक आहेत.
(१४कोणतेही धार्मिकविधी (पूजा-अर्चा-व्रतवैकल्ये-होम-हवन इ.)करून कोणताही हेतू साध्य होत नाही. (जोविधी करायचा असे योजिले असेल तो विधी पार पडतो एव्हढेच.) केवळ मानसिक समाधान लाभू शकतेअशाकर्मकांडांच्या वेळी जे संस्कृत भाषेतील मंत्र म्हणतात त्या मंत्रांत कोणतेही सामर्थ्य नसते.
(१५गुरुमंत्र नमशिवाय।गं गणपतये नम: ॐ नमो भगवते वासुदेवाय ।मृत्युंजय महामंत्रगायत्रीमंत्रअसल्या कुठल्याही मंत्रात कसलेही सामर्थ्य नसतेहे मंत्र आणि "ओले मंतर कोले मंतर फूमंतर छूमंतरयांत मूलतकाही भेद नाहीसगळे सारखेच निरुपयोगी !
(१६पुराणात शाप-:शापवर-वरदानदेण्याच्या अनेक कथा आहेतत्या सर्व काल्पनिक आहेतएखाद्यालाशाप देऊन त्याचे काही वाईट करण्याचे सामर्थ्य कुणाजवळही नसतेपूर्वीसुद्धा कुणाजवळ नव्हतेतथाकथितसिद्धयोगीतपस्वीऋषीअशा कोणीही कुणाला शाप दिला तरी त्या शापाचा कोणताही परिणाम शापित व्यक्तीवर हो्ऊ शकत नाहीपूर्वी कधीही झालेला नाहीभविष्यात कधी होणार नाहीमात्र, "मला त्या साधूने शाप दिला आहेआता माझे काहीतरी वाईट होणार असा धसका त्या शापित व्यक्तीने घेतला तर त्या भीतीने मानसिक परिणाम होईलत्याचे पर्यवसान काही शारीरिक आजारात होऊ शकेलकुण्या तापट साधूने रागीट मुद्रा धारण करूनडोळे खदिरांगारांसारखे लालबुंद करून , "तुला भस्मसात करतो." अशी शापवाणी उच्चारली तरी वाळलेल्या गवताची काडीसुद्धा पेट घेणार नाही.
तसेच आपल्या भक्तावर संतुष्ट होऊन कुण्या साधूनेतथाकथित योग्यानेत्या भक्ताला वर अथवा आशीर्वाद दिला तरी त्यामुळे त्याभक्ताचे काही कल्याण होणार नाहीकाहीसुद्धा भले होऊ शकत नाही. (केवळ मानीव मानसिक समाधान मिळेल तेवढेच.)
शाप अथवा वर यामुळे काही प्रत्यक्ष घडून येणे हे निसर्गनियमाविरुद्ध आहेतसे करण्याचे सामर्थ्य कुणालाही प्राप्त होत नाहीया संबंधीच्या सर्व पौराणिक कथा बाष्कळ आहेत.
(१७कितीही योगसाधना केलीध्यान-धारणा करून समाधी लावलीतरी अष्टसिद्धींतील एकही सिद्धी कुणालाही प्राप्त होणे शक्य नाहीअशी सिद्धी मिळणे हे निसर्ग नियमाचे उल्लंघन आहेते कोणीही करू शकत नाही.
(१८सर्व तथाकथित चमत्कार हे हातचलाखीचे प्रयोग असतातपदार्थांच्या रासायनिक गुणधर्मांचा उपयोग करून असे प्रयोग दखविता येतात की जे लोकांना चमत्कारसदृश वाटतीलविविध रासायनिक अभिक्रियांविषयी जनसामान्यांना काही ठाऊक नसते.
(१९आकाशातील ग्रह आणि राशी (तारकापुंजमाणसाच्या जीवनावर काही परिणाम होतो याला यत्किंचितही पुरावा नाहीअसा कोणताच परिणाम होत नाही असे सर्व वैज्ञानिक नि:संदिग्धपणे सांगतात.म्हणूनफलज्योतिषत्यांतील ग्रह योगयुती-प्रतियुतीचे परिणामशनीची साडेसातीसर्व संकल्पना निरर्थक आहेतथोडक्यात म्हणजे फलज्योतिष हे एक भंपक विज्ञान (स्यूडो सायन्सआहेहे वारंवार सिद्ध झाले आहे.फलज्योतिषाचा अभ्यास इथेच संपतोफलज्योतिष विषयावरील पुस्तके वाचणेअभ्यास करणे हा केवळ कालापव्यय आहे.
(२०अंगठीत विशिष्ट रंगाचा खडा घातला की इथून कित्येक कोटी कि.मिदूर असलेल्या ग्रहांची अशुभफळे टळतात ही समजूत अडाणीपणाची आहेमुळात कुठल्याही ग्रहाचे कसलेच फळ नसतेस्वबुद्धीने थोडा जरी विचार केला तरी हे सहज समजतेतसेच बोटांत अंगठ्याकिंबहुना अंगावर कसले अलंकार घालणे हे मला ओंगळवाणेपणाचे वाटते.
(२१कोणताही दिवसकोणतीही गोष्टशुभ-अशुभपवित्र-अपवित्रपुण्यदायक-पापकारक नसतेती चांगली-वाईटयोग्य-अयोग्यहितकारक-अहितकारक असू शकते.
(२२वास्तु (दिशाभूलशास्त्रप्राणिक हीलिंग (प्राणशक्तिउपचार) , ब्रह्मविद्याओंकार गुंजनअग्निहोत्र.सर्व भंपक (स्यूडोशास्त्रे आहेतत्यांतून हितकारक असे काहीही साध्य होत नाही.मात्र असल्या भंपक शास्त्रांच्या आधारे श्रद्धाळू गिर्‍हाइकांना फसवून काही लबाड माणसे भरपूर कमाई करतात.
(२३सुरक्षाकवचेश्रीयंत्रेरुद्राक्षेपिरॅमिडस्अशा सर्व वस्तु पूर्णतया निरुपयोगी असतातत्या घरात आणून ठेवल्या असता आपल्या समस्या दूर होतील असे मानणे असमंजसपणाचे आहे.
(२४अंत्यसंस्कारांच्या संदर्भात हिंदुधर्मातील पुरोहितांनी जी कर्मकांडे रूढ केली ती सर्व त्यांच्या कमाईसाठी,अधिकाधिक लाभासाठी आहेतहे अगदी स्पष्ट दिसतेअन्यथा पिंडदानअकरावेबारावेतेरावेमासिकश्राद्धवार्षिक श्राद्धसर्वपित्री अमावास्याअसले प्रकार का आले असतेया संदर्भात वैज्ञानिक सत्य काय आहे?मृत्युनंतर जीवन पूर्णतया संपतेअमर आत्माअतृप्त आत्मापुनर्जन्ममोक्ष या सर्व कल्पना भ्रामक आहेत.विद्युत् दाहिनीत दहन करावे. (देहदान केल्यास उत्तमच). नंतर कोणतेही कर्मकांड करू नयेमोठ्याप्रमाणातहोणारा अनावश्यक खर्च वाचेलआपल्या श्रमाचाघामाचाकष्टाचा पैसा व्यर्थ वेचू नयेया कर्मकांडांमुळे आजवर अब्जावधी रुपयांची लूट झालीकित्येकजण कर्जबाजारी झालेहे पैसे नुसते वाया जातातहे विधी केले नाही तर कुणाचे काहीही वाईट होत नाहीहे स्वानुभवाने सांगतोसमाज काय म्हणेल याची चिंता नको.अनेकजण तुमचे अनुकरण करतील.

(२५निसर्ग हा पूर्णतया उदासीन आहेभूकंपवणवेमहापूरवादळेअशा घटना निसर्ग नियमांनुसार घडतात.त्यामागे कुणाचा कसलाही हेतू नसतोकोणतीही नैसर्गिक घटना माणसांच्यापशुपक्षांच्याअन्य प्राण्यांच्या,वनस्पतिसृष्टीच्या हितासाठी अथवा हानीसाठी घडत नाहीपाऊस पडतो तो प्राणिमात्रांना वृक्षवेलींना पाणी मिळावे म्हणून नव्हेतो निसर्गनियमानुसार पडतोत्यामागे कार्य-कारणभाव असतो तो केवळ निसर्ग नियमांचाअन्य कशाचाही नाही.
-प्रा.य.ना.वालावलकर