Saturday, November 22, 2014

वैज्ञानिक सृष्टी घेतली पण वैज्ञानिक दृष्टी मात्र घेतली नाही !!


जगात असा कुठलाही विषय नाही की ज्यात विज्ञान नाही. ह्या चरचरात विज्ञानच भरून राहीले आहे.निसर्गाचा शोध घेणे म्हणजेच विज्ञान. त्याला चारभिंतीच्या प्रयोगशाळेत बंदीस्त करणे ही आपली संकुचित विचारसरणी झाली. आईनस्टाइनने त्याचे शोध निसर्गाच्या प्रयोगशाळेत गणिती विचार करून लावले. याचा अर्थ वैज्ञानिक दृष्टीकोन हा माणसाला तत्वज्ञ बनवतो. आणि प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करण्यास प्रवृत्त करतो. त्यामध्ये धर्म,भावना,शब्द्प्रामण्य यापेक्षा सत्याची कसोटी महत्वाची ठरते. प्रत्येक गोष्टीचे documentation केल्यावरच त्याची सत्यासत्यता पडताळता येते. तेथे शब्द्प्रामण्यपेक्षा चिकीत्सेला महत्त्व असते. या पध्दतीनेच आजवर माणसाची प्रगती झाली आहे.
गोमूत्र प्यायाल्याने आणि शेण सारवल्याने वा खाल्याने तब्बेत सुधारते हे कुठल्याही authentic कोशात लिहीलेले नाही आणि सिध्दही झालेले नाही. ते फ़क्त लहानपणापासून ऐकलेल्या गोष्टीमुळे खरे वाटायला लागते. म्हणून या सगळ्या सांगोवांगीच्या गोष्टी ठरतात.मग ती फ़क्त वैयक्तीक अनुभूती ठरते.सार्वत्रिक नव्हे.
योग, तुळस,वृक्ष, हळदीसारखी काही उदाहरणे वैज्ञानिकतेच्या निकषावर काही बाबतीत खरी असली तरी हनुमान चालीसामध्ये जरी NASA ची साक्ष (खरी असेल तर तो कागद प्रसिध्द करायला कोणाची हरकत आहे?) काढून सूर्य व पृथ्वीचे अंतर दिले आहे तरी कुठल्याही वैज्ञानिकाने त्यावर समर्थन दिलेले नाही. तसेच जानवे घातल्याने रोगांपासून बचाव होतो. (मग जानवेधारी आजारी का पडतात?) चरणस्पर्श केल्याने पाठीचा कणा निरोगी रहातो. (मग दहादा वाकून नमस्कार करणार्यांना स्पाँडीलायटीस का होतो?) दारावर तोरण लावल्याने वातावरण शुध्द होते. (उलट तोरणासाठी पाने-फुले तोडून आपण पर्यावरणाची हानी करत असतो.) दिवा लावल्याने पॉझिटीव्ह ऊर्जा वाढते. (मुळात ती आपल्या वृत्तीत असावी लागते.) कान टोचल्याने अस्थमा बरा होतो.( मग अनेक कान टोचलेल्या बाया अस्थामाग्रस्त का आहेत?) कुंकूम लावल्याने वशीकरणापासून बचाव होतो. (Hypnotist अनेक कुंकू लावलेल्या - टिकली नव्हे - स्त्रीयांना hypnotized कसे करू शकतात?) तिलक लावल्याने कपाळावरील अतिरिक्त पाणी शोषले जाते, शंख ध्वनी केल्याने डासांचा नाश होऊन मलेरीयापासून बचाव होतो. (मग शंखध्वनी करणारेच मलेरीयाग्रस्त का होतात? दुसरे असे की,भारतात आज मोठ्या प्रमाणात मलेरीयाचे रुग्ण वढताहेत तेव्हा करा की शंख ध्वनी! डॉक्टरांची गरज काय?) चिताग्नी दिल्याने प्रेताची योग्य विल्हेवाट लागून पर्यावरणाची हानी टळली जाते.(लाकडे जाळून प्रदूषण झाले तरी) उठाबशा वा कान खेचण्याच्या शिक्षेमुळे मेंदू तल्लख होतो आणि तोतरेपणा जातो यासारख्या गोष्टीत हास्यास्पद व चुकीचे विज्ञान सांगून ते वैज्ञानिक असल्याचा आभास निर्माण करण्यात आला आहे. यातील एकही मुद्दा कुठेही सिध्द झालेला नाही. हे सगळे आपल्या पूर्वजांना माहीत होते या अभिनिवेशाने लिहीले जाते. वैज्ञानिक पध्दतीत documentation ला महत्त्व असते,पुराण कथांना नाही.
कोणत्याही धर्मवाद्यांचे मुद्दे जर विज्ञानेतर असतील तर मग त्यातील प्रत्येक मुद्दयाचा वैज्ञानिक संबंध दाखवण्याचा अट्टाहास का? त्यांनी ही वैयक्तीक अनुभूती आहे असे स्पष्ट करावे, म्हणजे वादच मिटतो. मग त्यांनी Believe-Hinduism is based on science असं म्हणायला नको. खरी मखलाशी अशी असते की,ते विज्ञानाला अनुसरून आहे असे म्हटले की, सुशिक्षित लोक सहज स्वीकारातात, हे त्यांना पक्के ठाऊक असते.ह्याला बनवेगिरी म्हणतात.दुर्दैवाने आजचे सुशिक्षित (की फ़क्त साक्षर) धार्मिक अस्मितेचे आणि उन्मादाचे बळी ठरताहेत.
म्हणूनच मी म्हणतो, आजच्या सुशिक्षित माणसाने वैज्ञानिक सृष्टी घेतली पण वैज्ञानिक दृष्टी मात्र घेतली नाही. त्यातूनच हिन्दू धर्माला वैज्ञानिक लेबल लावायचा फोल प्रयत्न केला जातो.
विचार- जगदीश काबरे सर

Friday, November 14, 2014

सहप्रवासी: बावीस आस्तिक -एक नास्तिक

हा अनुभव खूप वर्षांपूर्वीचा आहेआठवला तसा लिहिला आहेत्याकाळीं नोकरीनिमित्त कोकणात वेंगुर्ले गावी होतोतिथे विजय कर्णिक नावाच्या तरुणाशी परिचय झालात्याने एकदा गोवा-कारवार-जोग धबधबा अशा पर्यटनस्थळांची सहल आयोजित केली होतीएक मिनिबस ठरवलीत्यांतील काही जागा रिकाम्या राहिल्या म्हणून त्याने मला विचारलेसहल तीन दिवसांची होतीसगळी माहिती घेऊन मी हो म्हटलेपैसे भरलेनियोजित दिवशी सहल निघालीसहलीला नऊ जोडपी आणि पाच एकटे (मी धरूनअसे तेवीस पर्यटक सहभागी होतेसर्व तिशी-पंचविशीतील उत्साही तरुण मंडळी होतीपणजीला पोहोचेपर्यंत सर्वांची परस्परांशी ओळख झालीसमूह (ग्रुपचांगला होता.
प्रत्येक सहलीत मंदिरेदेवस्थानेतीर्थक्षेत्रे यांचा समावेश पर्यटन स्थळांत असतोचआम्ही एका मंदिरात गेलोदेऊळ भव्य नव्हते तसेच फार पुरातनही नव्हतेसर्वांबरोबर मीही आत गेलोमूर्ती संगमरवरी दगडाची होतीकाळ्या दगडातील कोरीव शिल्प नव्हते.कोरीव शिल्पांची निरीक्षणे करणे मला आवडतेभाविकांनी मूर्तीला हात जोडलेनतमस्तक होऊन नमस्कार केलापेटीत दान टाकले.प्रसाद घेतलामी यातले काही केले नाहीसगळे पाहिलेइतरांसोबत प्रदक्षिणा घातलीबहुतेक सहप्रवाशांच्या हे लक्षात आले असावे.बसमध्ये बसल्यावर शेजारच्याने विचारले,
तुम्ही देवाला नमस्कार केला नाहीप्रसाद घेतला नाहीअसे का ?"
मला तसे करावेसे वाटले नाहीकधीच वाटत नाहीम्हणून. "
"कुठल्याच देवाला नमस्कार करीत नाही का ?"
होकुठल्याच देवाला नाही."
थोडा वेळ शांततेत गेलापुन्हा त्याने प्रश्न विचारला.
मग मंदिरात कसे आला ?"
तुमच्यासारखाचबस मधून उतरलोचालत चालत देवळात आलो."
तसे नव्हेनास्तिक आहात तर मंदिरात का आला?"
"नास्तिकांना देवळात यायला बंदी आहे कातशी पाटी कुठे दिसली नाहीअसोगमतीने विचारलेमूर्तीचे शिल्प पाहायचेदर्शनालाआलेले भाविक काय करतातपुजारी काय करतातकाय बोलतात ते पाहायचेऐकायचे या हेतूने आलो.
"नमस्कार न करणे हा अहंकार आहे असे वाटत नाही का ?"
मी देवाला नमस्कार केला नाही हे त्याच्या मनाला थोडे लागले असावेसगळ्यांनी देवाला नमस्कार करायलाच हवा असेही त्याला वाटत असावे.
"नाहीयात अहंकाराचा प्रश्न नाहीनिर्जीव मूर्तीला हात जोडणे मला असमंजसपणाचे वाटते म्हणून मी तसे करीत नाहीमाणसांनानमस्कार करतो."
देवाला नाही आणि माणसांना का बरे?"
"कारण मी नमस्कार केला हे देवाला समजत नाहीमाणसांना समजतेत्यांना भावना असतातत्या दुखावू नये असे मला वाटते.देवापुढे मी नतमस्तक झालो नाहीत्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या असतील तर त्याला माझा निरुपाय आहे."
"तुमच्याशी बोलण्यात कांही अर्थ नाही." सहप्रवासी थोडा रागावला.
"जशी तुमची इच्छामी म्हणालो.
थोडा वेळ आम्ही दोघे गप्प राहिलोनंतर काही निमित्ताने मी दुसरा विषय काढलापरत गप्पा सुरू झाल्यादुसर्‍या दिवशी आणखी एका मंदिराला भेट दिलीतिथे पहिल्याचीच पुनरावृत्ती झालीमूर्ती वेगळीती अधिक रेखीव आणि सुबक होतीपुरोहित वेगळेबाकीसगळे तेच.
तिसरे मंदिर कारवारचेते मोठे सुप्रसिद्ध प्राचीन देवस्थान होतेतिथे कांही जणांनी देवाला अभिषेक केलानंतर सर्वांनी (मी सोडून )देवस्थानला देणग्या दिल्याएकूण तेरा पावत्या फाडल्याआम्ही हॉटेलवर परतलोते जवळच होतेकाही वेळाने देवस्थानचा एक माणूस प्रसादाचे लाडू घेऊन हॉटेलवर आलामी देणगी दिली नव्हतीतरी माझ्यासाठीसुद्धा लाडू आणला होतामी नम्रपणे प्रसाद नाकारला. " क्षमा करामी कुठल्याच देवाचा प्रसाद घेत नाही." असे सांगितलेत्याने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिलेमीनाकारलेला प्रसादाचा लाडू आणि देणगीचे पावती पुस्तक पिशवीत भरलेआणि तो तिथून निघालामाझे वागणे सहपर्यटकांना आवडले नाहीएकाने तसे बोलूनही दाखवले.
दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही परतीच्या प्रवासाला निघालोसगळे वेळी आलेबस चालू झालीहवेत गारवा होतावातावरण छान उत्साहवर्धक होतेअजून सूर्योदय व्हायचा होता. " ठरल्याप्रमाणे आपली सर्व ठिकाणे पाहून झालीकुठे काही अडचण आली नाही.तुम्ही सर्वांनी चांगले सहकार्य दिलेसर्वांचे आभार." विजय कर्णिक म्हणालात्याने सहलीचे आयोजन केले होतेआपली जबाबदारी चांगल्या तर्‍हेने पार पाडली होती.
"आपली ट्रिप छान झाली." कोणी तरी मनापासून आनंदानेउत्स्फूर्तपणे बोलला.
बसमध्ये सर्व तरुण मंडळी होतीसारेजण उत्साहातआनंदात होतेहास्यविनोद चालले होतेसकाळचे अकरा वाजले असतील.एकदम धक्का बसल्यासारखे होऊन बसचे इंजिन बंद पडलेतेवढ्यात चलाखीने ड्रायव्हरने गाडी रस्त्याच्या कडेला घेतलीआणि ती थांबलीचवाहक(ड्रायव्हर ) आणि त्याचा मदतनीस खाली उतरलेकाही ठाक-ठूक करू लागलेवीस मिनिटे गेलीबस चालू होईना.प्रवाशांचा उत्साह मावळलाअस्वस्थताचुळबुळ सुरू झालीएक बाई मला उद्देशून म्हणाल्या,
"तुम्ही तो प्रसादाचा लाडू नाकारायला नको होताप्रसाद ग्रहण न करण्याचे काय परिणाम होतात ते तुम्हाला ठाऊक नाही काय?सत्यनारायणाची कथा तुम्ही कधी ऐकली नाही काय ?"
ती कथा मी अनेकदा ऐकली आहेतसेच पोथीसुद्धा स्वतवाचली आहेसत्यनारायण पोथीतील सर्व कथा असत्य आहेत हे कॉमनसेन्स वापरला तर सहज लक्षात येतेवंगध्वज राजासाधुवाणीअसल्या कथा केवळ श्रद्धेनेच ऐकायच्या का त्यांवर कधी विचार करायचाच नाही का आपल्या पूजेचा दिलेला प्रसाद प्रत्येकाने ग्रहण केलाच पाहिजेभक्षण केलाच पाहिजे असा या देवाचा हट्ट का असावा कोणी प्रसाद घेतला नाहीखाल्ला नाही तर या देवाचा एवढा अपमान होतो की देवाने त्या प्रसाद न खाणार्‍याला मोठी शिक्षा द्यावी राजाने प्रसाद घेतला नाही म्हणून त्याच्या पुत्रांना मारायचे ? हा देवाघरचा न्याय का देव इतका सूडकरी कसा ?एवढ्या क्षुद्र मनाचा कसा या व्रताविषयी खूप काही सांगण्यासारखे आहेपण नकोवेळ जाईल."
आता गाडी मार्गीं लागेपर्यंत वेळ घालवायलाच हवा.एक बाई बोलल्या.
"ठीक आहेऐकणार असाल तर थोडे सांगतोसत्यनारायण पोथीच्या प्रत्येक अध्यायाशेवटी -इति श्री स्कंद पुराणे रेवा खंडे...-असे लिहिले आहेपण ही पुराणकथा नाहीशिवकालीन कागदपत्रांत या व्रताचा कुठेही उल्लेख नाहीछत्रपतींना असली व्रत-वैकल्ये करण्यास वेळच नव्हता म्हणानंतरचे पेशवे तर मोठे देवभक्त होतेपण पेशवेकालीन कागदपत्रांतही या व्रताचे नाव कुठे नाही.बंगालमधील मुसलमानांच्या साचापीर उत्सवावरून हे सत्यनारायण व्रत इ.१८८०च्या सुमारास इकडे आलेयाविषयी इतिहासकारांचे एकमत आहेसध्या बंगाल आणि महाराष्ट्र या दोनच राज्यात सत्यनारायण पूजा करतातहे व्रत पौराणिक असते तर उत्तर भारतात रूढ झालेच असतेतसेच विष्णुसहस्रनामात सत्यनारायण हे नाव नाही. "
"आम्ही हे कधी कुठे वाचले नाही की ऐकले नाही."कांही पर्यटक म्हणाले.
"खरे तर हा इतिहास ठाऊक नसला तरी ही कथा ऐकताना एवढे कशाला -जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा-ही आरती ऐकताना अर्थ समजून घेतला (भाषा सोपी आहेअर्थ सरळ आहे.) तर अथ ते इति सगळे असत्य आहे हे आपल्यासारख्यांना सहज कळू शकते.पण मन श्रद्धेने लिप्त झाले की बुद्धी चालेनाशी होतेश्रद्धा ही मनोभावना आहेभावनेवर बुद्धीचे नियंत्रण असेल तरच सत्य कळू शकते."
ठीक आहेपण प्रसाद नाकारायचा कशाला तुम्ही देणगी दिली नव्हती तरी त्याने तुमच्यासाठी अगत्याने प्रसाद आणला होता."माझ्या शेजारी बसणारा बोलला.
त्याच्या हातात पावतीपुस्तक होतेमी पावती फाडावी अशी त्याची अपेक्षा होतीते असोमी प्रसाद नाकारलाम्हणजे समजा मी पाप केलेतर देवाने मला एकट्याला काय ती शिक्षा करावी नातुम्ही सर्वांनी भक्तिभावाने देवदर्शन घेऊनप्रसाद ग्रहण करून,देवस्थानाला देणग्या देऊन पुण्यकृत्ये केली नामग बस बंद का पडली तुमच्या सगळ्यांच्या पुण्याच्या प्रभावापेक्षा माझ्या एकट्याच्या पापाचा प्रभाव मोठा कसा ?"
सुक्याबरोबर ओलेही जळते." एका बाईने म्हणीचा उल्लेख केला. "
ही म्हण दैवी कृत्यांसाठी लागू नाहीभक्त प्रह्लादाला उकळत्या तेलाच्या कढईत टाकलेतरी ती उष्णता त्याला भाजू शकली नाहीदेव सर्वसमर्थ आहेतो मला एकट्याला सहज शिक्षा करू शकला असताज्या तोंडाने मी प्रसाद नाकारला ती वाचा बंद पडावीजे हात मी देवापुढे जोडले नाहीत ते लुळे पडावेजी वाकवून मी नतमस्तक झालो नाही ती मान लट-लट कंप पावावीअसे काही करणे त्याला शक्य नव्हते काय मग माझ्या पापासाठी बस बंद पाडून तुम्हा सर्व पुण्यवंतांचा खोळंबा कशाला केला ?"
अहोअसं काय बोलता तुम्ही हे तुमचे हातपाय खरेच लुळे पडले तर कोण बघणार तुमच्याकडेअसे बोलू नयेशुभ बोलावे." एक बाई भीतीयुक्त आश्चर्याने म्हणाल्या.
चिंता नसावीबोललो ते खरे आहेबोलून काही होत नाहीमाणसे उगीच देवाला घाबरताततो काही कुणाचे बरे -वाईट करू शकत नाही." मी उत्तरलो.
आढीतील एक आंबा नासला की बाकी सगळे आंबे नासतात." मधाच्या म्हणवाल्या बाई पुन्हा म्हणाल्याबहुदा त्या कुठल्यातरी प्रशालेत मराठीच्या शिक्षिका असाव्या.
आपणा तेवीस जणांत मी एकटाच नास्तिक म्हणून नासका आंबा हे मान्यपण नासक्या आंब्यातील जंतूंचा संसर्ग आढीतील इतर आंब्यांना होतो (साथीच्या रोगासारखाम्हणून ते नासतातमाझ्या नास्तिक विचारांचा परिणाम तुम्हा बावीस आस्तिकांतील एकावर तरी झाला आहे का कुणाची देवावरील श्रद्धा किंचित् तरी ढळली आहे का नास्तिक विचारांविषयी कुणाशीही बोललो नाहीतसा बोलतो आहे तो हा आत्ताबस बंद पडल्यावरत्यामुळे आढीतील नासक्या आंब्याची म्हण इथे अप्रस्तुत आहे."
"पण तुम्हाला बरोबर घ्यायला नको होते हे खरे." कुणीतरी हळू आवाजात बोललेपण सार्‍यांना ऐकू आले असावे.
"तसे म्हणा हवे तरपण सीट रिकामी असल्याने कर्णिकांनी मला बोलावलेमी त्वरित पैसे भरलेत्यांनी सांगितलेल्या सीटवर बसलो.कुठे कसली तक्रार नाही.गैरवर्तन तर नाहीच नाहीसहलीचे वेळापत्रक पाळलेसर्वांबरोबर मंदिरांत आलोतिथे जे पटले नाहीकरावेसे वाटले नाही ते केले नाही हे खरेपण कधीही इतरांचा खोळंबा केला नाही."
पण आता इतका वेळ झाला ना?" कुणीतरी बोलले.
ठीक आहेमाझ्यामुळे हा खोळंबा झाला म्हणातुम्हांला बरे वाटावे म्हणून सगळा दोष माझ्यावर घेतोपण --स्वत:च्या गाडीतून देवदर्शनाला आलेल्या भाविकांचा मोटर अपघातात दुर्दैवी मृत्यू.--अशा बातम्या अनेकदां छापून येतातत्या अपघातग्रस्त गाड्यांतील सर्वजण १००श्रद्धाळू भाविक असताततरी असे जीवघेणे अपघात का घडतात देव आपल्या भक्तांना अपघातातून वाचवू शकत नाही कायविचार करावाबस बंद पडली त्याच्याशी बसमध्ये कोण कोण प्रवासी आहेतत्यांची विचारसरणी काय आहेत्यांची वागणूक कशी आहे इ.गोष्टींचा काहीही संबंध असूच शकत नाहीगाडीच्या कांही भागांतील दोषदेखभालीतील चाल-ढकलचूक,दक्षतेचा अभावरस्त्यातील खड्डेइंधनातील भेसळअसले कसले तरी कारण असू शकतेकार्य-कारणभाव समजून घ्यायला हवा. "

थोडावेळ शांतता पसरलीइंजिनाचा आवाज आल्यासारखे वाटलेसर्वांनी कान टवकारलेकांही क्षणांत बस चालू झालीबंद पडलेली गाडी दीड तासाच्या खटपटीनंतर मार्गी लागलीवेग घेतलापुढचा प्रवास चालू झालाप्रवाशांची मरगळ गेलीबसमध्ये उत्साहाचे वातावरण पसरलेसगळे जण मागचे सारे विसरलेहास्यविनोद झडू लागलेमी डोळे मिटून विचारमग्न झालोवाटले या प्रसंगाच्या निमित्ताने मी जे कांही बोललो त्यावर कोणीतरीकाहीतरीथोडातरी विचार करील काकुठेतरी ठिणगी पडेल का कुणाचे विचारचक्र चालू होईल कामला वाटले होकाहीतरी सकारात्मक घडेलमाणसाने आशावादी असावे.
-प्रा.य.ना.वालावलकर