Thursday, October 22, 2015

गुरुविण कोण लावितो वाट ?

बर्‍याच वर्षांपूर्वीचा काळतेव्हा आम्ही शालेय विद्यार्थी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आमच्या वर्गावर पहिल्या तासाला येणार्‍या गुरुजींना फुलें देऊन नमस्कार करीत असूसर्व गुरुजींचा पहिला तास कुठल्या ना कुठल्या वर्गावर असायचात्यामुळे त्यादिवशी सर्व गुरुजनांचे पुष्पपूजन होईतसेच गायनवादननृत्य अशा कला क्षेत्रांतील गुरूंचे त्यांचे शिष्य पूजन करीतत्याकाळी गुरुपौर्णिमेचा संबंध शिक्षकांच्याकलातपस्वींच्याज्ञानमहर्षींच्या सन्मानाशी होताते दिवस गेले.




संगीत, नाट्य, नृत्य, शिल्प अशा कलाक्षेत्रात गुरूंचे महत्त्व अजून टिकून आहे.कारण या कला गुरूकडूनच ग्रहण कराव्या लागतात. तिथे निवडक शिष्य असतात. आध्यात्मिक क्षेत्रात ठकसेन गुरूंचा सुळसुळाट झालेला दिसतो. कांही खरे सद्गुरू असतात. पण आजच्या जाहिरातींच्या कल्लोळात आणि झगमगाटात ते दिसेनासे झाले आहेत. गावोगावी मेळावे भरवून खरे सद्गुरू आपली भक्तसंख्या वाढविण्याच्या मागे नसतात. त्यांना प्रसिद्धीची आणि संपत्तीची हाव नसते. शिष्यांनी गुरूंचा शोध ध्यावा अशी अपेक्षा असते. पण आजच्या धावपळीच्या जीवनात सगळ्यांना झटपट रेडिमेड हवे असते. त्यासाठी ते पैसे मोजायला तयार असतात.आपल्याला हवे तें ठकसेन गुरूंकडून मिळेल असे त्यांना वाटते. कारण ते जाहिरातींना बळी पडतात. असे भक्त त्यांच्या कच्छपी लागतात. ठकसेनांचा धंदा फोफावतो. आजच्या मार्केटिंच्या युगाचा हा अपरिहार्य परिणाम आहे. खरे सद्गुरू आणि भक्त यांची संख्या आता नगण्य झाली आहे असे दिसते. त्यांचा विचार या लेखात नाही. श्रद्धाळूंनी ठकसेनांच्या नादी लागून फसू नये, हा या लेखाचा हेतू आहे.


आता गुरुपौर्णिमा म्हणजे आध्यात्मिक गुरूंच्या पूजनाचा (आणि त्या गुरूंनी भक्तांकडून दक्षिणा लाटण्याचा) दिवस असा अर्थ रूढ झाला आहेपूर्वी दैवी शक्तीचे चमत्कार करून दाखविणार्‍या बुवा,महाराजस्वामीबाबा यांची संख्या मोठी होतीपुढे अनेक बुवा-बाबांच्या "लीलाउघड झाल्यात्यांचेदैवी चमत्कार म्हणजे हातचलाखीचे प्रयोग हेही लक्षात येऊ लागलेत्यामुळे चमत्कारी बुवा बदनाम झालेपण एखादी दहशतवादी संघटना जशी जुने नाव बदलून नव्याने आपली स्फोटक कृत्ये चालू ठेवतेत्याप्रमाणे बुवा--बाबांनी आध्यात्मिक गुरू हे नाव धारण करूनआपली कार्यपद्धती बदलून,श्रद्धाळूंना फसवण्याचे आपले मूलभूत मह्त्कार्य पुढे चालू ठेवले. "हृदयीं गुरु नांदे। फसवुनी घेऊं आनंदे॥या मनोवृत्तीचे श्रद्धाळू भक्त त्यांना मोठ्या प्रमाणात लाभलेगुरुबाजी का फोफावते यासंबंधी"उदासबोधया कवितासंग्रहात मंगेश पाडगावकर म्हणतात,:

" प्रत्येकासी येथे हवा । कोणीतरी जबरा बुवा।जो काढील सार्‍या उवा । मनातल्या चिंतेच्या।
आपण शोधायचे नाही । आपण लढायचे नाही।आपण भिडायचे नाही । आयुष्याला।
येक गुरू फार मोठा । अध्यात्मधंद्या नाही तोटा। तो आपुल्या धोतरा कासोटा । वर्ज्य मानी।
असल्या आध्यात्मिक गुरूंचे स्तोम आज सर्वत्र माजलेले दिसतेभक्तांची संख्या अमाप आहेबहुतेक आध्यात्मिक गुरु हे प्रच्छन्न ठकसेन असतातशिष्यांना फसवूनआपल्या भजनी लावून त्यांचे आर्थिक शोषण करणे हे त्यांचे उद्दिष्ट असतेआसाराम,रामपाल, नित्यानंदनिर्मलबाबावेंकटसर्वानन अशा अनेक गुरूंचे ढोंग उघड झालेखरे स्वरूप समजलेतरी अशा ठकसेन गुरूंच्या कच्छपीं लागणारे भोळसट भाविक आहेतचपरब्रह्मपरमात्माजीवात्मापुनर्जन्ममोक्षब्रह्मलोकअसे शब्द कानी पडल्यावर ते श्रद्धाळू भारावून जातातत्यांना भुरळ पडतेगुरूवरील श्रद्धा दृढ होते.दुसर्‍या प्रकारच्या कांही गुरूंना वाटतेकी अध्यात्मशास्त्राचा आपला परिपूर्ण अभ्यास आहेआपण साक्षात्कारी आहोआपल्याला आत्मज्ञान प्राप्त झाले आहेआपल्यापाशी दिव्य अलौकिक शक्ती आहे,भक्ताच्या डोक्यावर हात ठेवून आपण शक्तिपात करू शकतोज्ञानसंक्रमण करू शकतोअशा कल्पनेच्या राज्यात जे वावरतात ते भ्रमसेन गुरू होतकुणाला फसवण्याचा त्यांचा हेतू नसतोअशाभ्रमसेन गुरूंत काहीजण सज्जनसदाचारीसत्पुरुष असू शकतातमात्र दिव्य ज्ञानअलौकिक शक्ती कुणापाशी नसतेखरेतर अशा शक्तीला अस्तित्वच नाहीनिसर्गनियमांचे अतिक्रमण कोणीही करू शकत नाही.काही गुरू निष्पापअश्रापनिरिच्छनिर्मोही असतातत्यांचे भक्त त्यांना विदेहीजीवन्मुक्तदेहातीत,अवलियापहुंचा हुवा आदमी असे समजतातत्यांच्या भजनी लागतातत्या गुरूंना आपल्या शरीराचे,कपड्यांचेखाण्या-पिण्याचेस्वच्छतेचे भान नसते..." हे इतके लोक माझ्यापुढे असे हात का जोडताहेतगाणे कसले म्हणताहेतसमोरच्या पेटीत पैसे का टाकताहेत?..." हे त्यांना काही समजत नसतेखरे तर ते मतिमंद असतातकाही धूर्त लोकांनी त्यांना गुरू बनवून मठात बसवलेले असतेहे मूढसेन गुरू होतअशा या आध्यात्मिक गुरूंच्या तीन तर्‍हा (ठकसेन, भ्रमसेन, मूढसेन) दिसतात.गुरू ठकसेन असोभ्रमसेन असो वा मूढसेन असो प्रत्येकाचा भक्तवृंद असतोचत्यांत ठकसेन गुरू साधनशुचिता गुंडाळून ठेवून आपल्या धंद्याचे व्यवस्थापन पद्धतशीरपणे करत असल्याने भाविकांवर त्यांचा प्रभाव अधिक पडतो आणि त्यांना मोठ्या संख्येने शिष्य लाभतातसर्व गुरूंचे शिष्य आपली बुद्धी गुरुचरणी वाहातात आणि गुरूंना सर्वभावे शरण जातातअशा भक्तांविषयी पु..देशपांडे यांनी एक अप्रतिम भक्तिगीत लिहिले आहेबहुतेकांनी ते वाचले असेलते दत्तगुरूंविषयी असले तरी सर्वच गुरुभक्तांना आवडेल आणि मुखोद्गत करावेसे वाटेल म्हणून इथे दिले आहे.
गुरुराज मन्मनीं बसले । हृदयात माझिया ठसले ।
श्वान सुलोचन अहा गोजिरे । जवळी बसता दिसे साजिरे
झोळीमधला प्रसाद मिळता । स्वपुच्छ हलवित हसले । गुरुराज मन्मनीं बसले ।..त्या श्वानाचा वाटे हेवा । कधी सुखाचा मिळेल ठेवा
गुरुचरणांच्या ठायीं मजला । सात स्वर्गही दिसले । गुरुराज मन्मनीं बसले ।...

खरेतर हे सर्व आध्यात्मिक गुरू म्हणजे सामान्य माणसे असतातत्यांतील कोणापाशी दैवी शक्ती,अलौकिक सामर्थ्यदिव्य ज्ञान असले काही नसतेगीतेतील श्लोकधर्मग्रंथांतील वचनेपुराणांतील दाखलेसंतसाहित्यातील अभंगओव्या यांतील काही गोष्टी हे गुरू (मूढसेन सोडूनतोंडपाठ करतात.बरेचसे वाचलेलेऐकलेले असतेवक्तृत्व प्रभावी असते...."ब्रह्मस्वरूप गोमातेच्या महन्मंगल मुखातून उद्भूत झालेला पवित्रतम गहनगूढ गायत्री मंत्र सर्वतोभद्र आहेतो शिवस्वरूप असून धवलवर्णी आहे.त्या महामंत्राच्या जपाचे रहस्य पुरंजनाने रंतिदेवाला कथन केले तेव्हा त्याचा आत्मा देहमुक्त होऊन अर्चिमार्गे ब्रह्मलोकी प्रवेश करून शाश्वत अशा चिदानंदात तरंगू लागला." असले गुरुमुखातून येणारे अगम्य बोल ऐकले की श्रद्धाळू भक्त मंत्रमुग्ध होतातमाना डोलावू लागतातगुरुवचन सत्य मानायचे.त्याची चिकित्सा करायची नाही. " गाईचे मुख महन्मंगल कसे? " अशी शंका विचारायची नाही.भक्तांच्या या श्रद्धाळू वृत्तीमुळे जटाधारी-गोटाधारीटिळाधारी-माळाधारीकफनीधारी-लुंगीधारी असे सर्व गुरू इथे प्रभावी ठरतात.गुरूमुळे भक्तांची आर्थिक हानी होतेवेळ आणि ऊर्जा यांचा अपव्यय होतोपण सर्वांत गंभीर गोष्ट म्हणजे त्यांची बुद्धी पांगळी होतेभक्त आपल्या गुरूला सर्वभावे शरण जातोगुरूचा शब्द प्रमाण मानतोगुरू जे सांगेल ते पूर्ण सत्य असणार हे गृहीत धरतोगुरुवचनांची चिकित्सा करणेत्यांवर शंका घेणे पाप समजतोगुरूचे विचार हे आपलेच विचार आहेत असे त्याला वाटतेतो स्वबुद्धीने स्वतंत्रपणे विचार करू शकत नाहीआपली बुद्धी गुरूच्या पायी गहाण ठेवतोदुसर्‍याच्या आहारी जाऊन त्याच्या सांगण्याप्रमाणे वागणे म्हणजे स्वत्व हरवून बसणेदास्य स्वीकारणेशरणागती पत्करणेहा माणूसपणाचा अपमान आहेपण भक्तांना त्यात धन्यता वाटतेमूढसेन गुरूचे भक्त त्याच्या कृपा कटाक्षासाठी आसुसलेले असतातगुरूने त्यांच्याकडे पाहिलेआशीर्वाद दिल्यासारखा हात वर केला की भक्ताला धन्य धन्य वाटतेगुरूने कधी थप्पड मारली तर आता आपल्या मोक्षाचा मार्ग मोकळा झाला असे वाटून भक्त कृतार्थ होतोम्हणजे अशा मतिमंद गुरूपुढे भक्ताची पूर्ण शरणागती असतेगुरुपायाशी बुद्धी गहाण असते.आध्यात्मिक गुरुविषयीं एक जुना किस्सा आहेमुळात तो एक संस्कृत श्लोक आहेत्याला कुणी मराठी दिलेत्या आधारे हा किस्सा लिहिला आहे.

"नमस्कार महाराजआपल्या या कफनीला मोठा झोळ पडलेला दिसतोतसेच त्यात लहान लहान छिद्रेही आहेत."
खरे आहेनदीत आंघोळ करताना अशा कफनीचा उपयोग मी मासे पकडण्यासाठी करतो."
"
मासेम्हणजे तुम्ही मासे खातामत्स्याहारी आहांत? "
"
होतळलेले छोटे मासे दारूबरोबर छान लागतातआपला काय अनुभव?"
"
दारूम्हणजे मद्यपानसुद्धा करता?"
"
व्यसन नाहीपण कधी बाईकडे जायचे तर आधी एखादी बाटली पिणे बरेआपला काय अनुभव?"
"
बाप रेबाईम्हणजे वेश्यागमन?"
"
आश्चर्य कसले त्यातअहोजुगारात एखादे वेळी एकदम घबाड लागले तर मौज मजा करावीशी वाटणारच ना?"
"
 म्हणजे तुम्ही जुगारी अड्ड्यांवर पण जाता? "
क्वचित कधीतरीबाकी वेळ कुणाला असतोआमच्या मठात सतत गर्दी असते भक्तांचीत्यांना दर्शन देण्यात आणि मार्गदर्शन करण्यात खूप वेळ जातो."
समजले.तुम्ही आध्यात्मिक गुरू आहांत तर नमस्कारनिघतो मी."
हा किस्सा जुना झालाआता या गुरूंची जीवन पद्धती (लाईफ स्टाईलखूप बदलली आहेतरी मूळ मनोवृत्ती तशीच आहेअशा या गुरूंचे श्रद्धाळू भक्त व्यासपौर्णिमेला पूजन करतात हे आपल्या समाजाचे दुर्भाग्य होय.
-प्रा..ना.वालावलकर