Showing posts with label बुवाबाजी. Show all posts
Showing posts with label बुवाबाजी. Show all posts

Wednesday, February 5, 2014

बुवा तेथे बाया ! 

जिवंत हृदयाच्या शाबूत डोक्याच्या मित्र मैत्रिणींनो - 
मित्रांनो … आचार्य अत्रेंचे एक वाक्य अतिशय प्रसिद्ध आहे 'वृक्ष तेथे छाया बुवा तेथे बाया !' हे वाक्य ऐकल्यावर सुरुवातीस असे वाटायचे की अत्र्यांचा हा उगाचच केलेला आगावूपणा आहे. असतील काही बाबा, बुवा,बापू असे पण सगळेच असे नसावेत. पण ह्या वाक्याची सत्यता चळवळीच्या अनुषंगाने, डोळस अनुभवाने पटत गेली, दृढ होत गेली. 
(काही मोठ्या प्रमाणावर भांडाफोड प्रसारित झालेल्या उदा. सह मांडणी करण्याचा मी प्रयत्न करत आहे ) 

* विद्यानंद महाराज (वर्धा) - खरे तर विवेकानंदांचे तत्वज्ञान सांगणारे हे बाबा. या बाबाच्या नागोबा अंगात येत असे आणि 'विठुलाचा खेळ' नावाखाली हा बाबा स्त्रियांशी संबंध प्रस्तापित करत असे. या बाबाचे खरे नाव चंद्रशेखर जोशी. दहावी नापास असलेला हा माणूस अमेरिकेत (एम. डी. एफ. आर. सी. एस.) डॉक्टर होतो, पण साक्षात्कार झाल्याने पुंन्हा विदेशातील practice सोडून भारतात लोकांचे कल्याणाकरिता आलो असे सांगत असे. …।
मित्रांनो - माणूस कधीही श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये भेद करत नाही. कारण त्याला प्रत्यक्षामध्ये हा भेद करताच येत नाही. कारण श्रद्धेच्या बाबतीत चार इन्क्रिडीयंट सांगितले जातात.
(१) ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची त्याला सर्वश्रेष्ठ मानणे.।
(२) ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची त्याचे शब्दप्रामाण्य मानणे (शब्द प्रामाण्य म्हणजे शब्द हेच प्रमाण -उदा . - एखादा बाबा म्हणाला कि मी स्वर्गात जाउन आलो कि आपण त्यावर विश्वास ठेऊन बाबा स्वर्गात जाउन आले असे मानणे )
(३) ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची त्याच्यावर शंका न घेणे. 
(४) ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची त्या विषयी चिकित्सा न करणे. 
मित्रांनो असे चिकित्सा न करता तुंम्ही शब्दप्रामाण्य मानून व्यक्ती,वस्तू,ग्रंथ यावर श्रद्धा ठेवायला लागलात तर श्रद्धेचे रुपांतर अंधश्रद्धेत कधी होते ते लक्षात येत नाही. 
खरे तर समोरील माणसाला श्रद्धा बाळगणाऱ्या माणसातील अंधश्रद्धा दिसत असते. पण त्याला स्वत:ला तो शब्दप्रामाण्य मानत असल्यामुळे चिकित्सा करत नसल्याने ती अंधश्रद्धा वाटत नसते. त्यामुळे मित्रांनो श्रद्धा आणि अंधश्रद्धा एकच आहेत.
काही लोक म्हणतात डोळस श्रद्धा ठेवली पाहिजे, म्हणजेच बदलू शकेल अशी श्रद्धा - खर म्हणजे डोळस प्रकारची श्रद्धा असू शकत नाही - पण हेही खरे आहे की विश्वासाशिवाय माणसाला जगताच येणार नाही. - अनुभव बदलला कि विश्वास बदलतो पण या प्रक्रियेला श्रद्धा या प्रक्रियेत स्थान नाही. अनुभव बदलला कि विश्वास बदलू शकतो. त्याला कुणाचा विरोध असण्याचे कारणच नाही आणि म्हणून श्रद्धा या शब्दाविषयी आपण भांडत नाही. 
समाजामध्ये आपल्याला श्रद्धा या प्रक्रियेचा वापर करून माणसे मोठ्या प्रमाणावर इतरांना कशा प्रकारे लुबाडत असतात हे प्रकर्षाने दिसते. ।
मित्रांनो अंनिस च्या चळवळीने हजारो बाबा, बुवा, बापू, मांत्रिक यांची भांडाफोड केलेली आहे. या सर्व भांडाफोड झालेल्या प्रकरणांचा अभ्यास केल्यास असे कळते कि जो जो माणूस स्वत: स्वामी, बाबा म्हणवतो जो जो स्वत:मध्ये दैवी शक्ती आहे असा आभास निर्माण करतो तो तो प्रत्येक बाबा अनेक स्त्रियांचा वापर करीत असतो.
*मनमाड जवळील शुकादास बाबा : - स्वत:ला देव अवतार म्हणवणारा काही इयत्ता शिकलेला हा माणूस एका डॉक्टरकडे काम्पौडर होता. त्या अनुभवाच्या जोरावर हा लोकांना बाबागिरी सोबतच औषधाच्या प्रीक्सिप्षनही लिहून देत असे. पुरुषांची तपासणी दोन मिनिटात तर स्त्रियांसाठी लागणारा वेळ हा पाच मिनिटांपासून अर्धा पाउण तास इतका असे. एका जागरूक महिलेच्या तक्रारीवरून आपल्या कार्यकर्त्यांना या बाबाची भांडाफोड करण्यात यश मिळाले होते. तक्रारीनंतर कार्याकर्त्यांजवळ पिडीत महिलांची १००च्या पुढे लिस्ट गेली होती. त्यातील २० ते २५ महिला फोडण्यात समितिला यश आले. व अनेक पुरावे गोळा होऊ शकले. हा शुक्दासबाबा महिलांना एकांतात मी कृष्णाचा अवतार आहे आणि तू गेल्या जन्मीची माझी राधा किंवा आवडती गोपी आहेस, असे सांगून त्यांच्या मनातील गिल्ट (अपराधीपणाची भावना) काडून टाकत असे आणि त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करत असे. मित्रांनो या बाबाचा दरबार अनेक ठिकाणी लागत असे,यामुळे गोपिकांची संख्या देखील वाढली होती. त्यामुळे अनेक गोपिकांचे नंबर या बाबाकडे लागेनासे झाले. त्यातून त्यांची आपापसात कुरबुर वाढून मारामारीपर्यंत वेळ आली होती आणि याचा फायदा चळवळीला झाला समिती त्यांना फोडू शकली आणि मोठ्या प्रमाणावर शुकदासबाबाची भांडाफोड शक्य झाली. 
*गुलाबबाबा (काटेल - वर्धा) - मित्रांनो हा हि कृष्णावतार … हा बाबा अनेक मुलींना माय संबोधून त्यांच्याशी लहान बाळाप्रमाणे वर्तन करीत असे पुढे संबध प्रस्तापित करीत असे. - ह्याही बाबाला मोठ्या प्रमाणावर एक्स्पोज करण्यात कार्यकर्त्याना यश आले होते. 
मित्रांनो ज्या ज्या बाबा/बुवांना चळवळीने एक्स्पोज केले होते त्यातील अधिकाधिक बाबा श्रीकृष्ण नावाच्या देवाचा अतिशय वाईट पद्धतीने वापर करून घेत होते. ते सर्व केंव्हा ना केंव्हा आपल्या भक्तांना मी कृष्णावतार आहे आणि तू गोपी किंवा माझी आवडती राधा आहेस असे सांगून त्यांचा वापर सातत्याने करून घेतांना पुढे आले आहे. हे सर्व बाबापर्यंत मर्यादित नसून मांत्रिक, भगत, दीर्घकाळ जोतिशाचा धंदा करणारे लोक थोड्याफार वेगळ्या प्रमाणात हेच करतात हे लक्षात आले. 
*विधार्भातील सुंदरदास महाराज :- रामास्नेही पंथातील कोट्यावधी संपत्ती असलेल्या समाजातील हा महाराज - याच्याविरोधात अकोला,अमरावतीतील अनेक तरून मंडळी उभी ठाकली होती, परंतु त्यांना फारसे यश न आल्याने या मंडळींनी चळवळीची मदत घेवून या महाराजाला मोठ्या प्रमाणावर एक्स्पोज केले. या बाबाचे भक्त एव्हढे अंधश्रद्धाळू होते की आपल्या नव्या सुनेला देखील पहिल्या रात्रीकरीता सुंदरदासाकडे पाठवत असत. आणि त्याचा अभिमानही बाळगत असत. त्यांची श्रद्धा अशी होती कि त्याने सांगितल्याप्रमाणे हा बाबा दहाव्या मार्गातून मोक्ष मिळवून देतो. याला एक्स्पोज केल्यानंतर रामस्नेही पंथातील साधूंच्या मंडळासमोर या सुंदरदासाला विचारणा करण्यात आल्यावर त्याने अगदी छातीठोकपणे सांगितले की मी जो मार्ग सांगत आहे तोच खरा धार्मिक मार्ग आहे. कारण हा पंथ व्यापाऱ्यांचा आहे. या पंथातील पुरुषांना आपल्या स्त्रियांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो मग या स्त्रिया नोकरांशी संबंध ठेवतात त्यातून वर्णसंकर होतो त्यामुळे धर्माचे प्रचंड नुकसान होते. मी मात्र संबंध निर्माण करून त्या स्त्रियांना शपथ घालतो कि माझ्याशिवाय व तुझ्या नवऱ्याशीवाय कोणाशीही संबध ठेवायचे नाहीत व त्या स्त्रिया माझा शब्द कधीही तोडत नाहीत. त्यामुळे खऱ्या अर्थाने मी धर्म बचावाचे काम करतो आहे, वर्णव्यवस्था टिकविण्याचे काम करतो आहे.असा दावा सुंदरदासने त्या ठिकाणी केला. आणि कालांतराने दडपशाहीच्या जोरावर स्वत: त्या पंथाचा चीफ होऊन बसला. 
*कृपाळू महाराज :- याला अनाघ्रात स्त्री लागत असे आणि याचे अंधभक्त ते सर्व पुरवित असत. - भारतीय कायद्यानुसार वय १८ वर्षे वयाखालील मुलीवर असा प्रसंग झाल्यास तो बलात्कार ठरतो. -- ह्या संदर्भातील केस दाखल करून बरेच वर्ष हा बाबा नागपूर कोर्टाच्या वाऱ्या करत होता.
** मित्रांनो असं का घडत ? ज्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात चारित्र्याचे स्तोम माजवले जाते, प्रत्येक स्त्रीने, मुलीने चारित्र्य संपन्न असावे असे मानले जाते. पुरुषांना थोड्या प्रमाणात सूट दिली जाते. पण स्त्रयांच्या मुलींच्या बाबतीत आग्रह कायम असतो. पुरुषाने काही प्रामाणात लग्नाआधी भानगडी केलेल्या चालतात. पण स्त्रीच्या बाबतीत खपवून घेतले जात नाही. प्रत्येक नवऱ्याला आपली पत्नी अनाघ्रात हवी असते. एव्हढेच नव्हे तर एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीची छेद काढली किंवा tonting केले तर बदडून अगदी गाढवावरून धिंड काढणे, हातपाय तोडण्यापर्यंत मजल जाते. त्या समाजात हे बाबालोक एव्हड्या मोठ्या प्रमाणावर कसे काय संबंध प्रस्थापित करू शकतात. ??? 

स्त्री-पुरुषांनी आयुष्यभर प्रामाणिक असावं केवळ विवाह या पद्धतीमध्येच या पद्धतीचे शरीरसंबंध निर्माण व्हावे वैवाहिक जीवनाबाहेर कधीही होऊ नयेत हि एक आदर्श कल्पना आपण आपल्या समाजामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला हि कल्पना समाजामध्ये राबवत असतांना पुरुषसत्ताक पद्धती असल्याने पुरुषांनी स्वत:ला मात्र स्वातंत्र्य खेचून घेतले व कायम ठेवले. त्यांना आपले स्वातंत्र्य राबवायचे असेल आणि स्त्रियांनी पूर्णपणे चारित्र्याची संकल्पना आमलात आणायची असेल तर स्वाभाविकच अशा स्त्रीया समाजामध्ये निर्माण झाल्या पाहिजेत कि ज्या चारित्र्य बाळगणार नाहीत. त्यांच्यावर चारित्र्याचे बंधन असणार नाही. यातूनच वेश्याव्यवसाय यंत्रणेला सुरुवात झाली. आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर वेश्याव्यवसाय समाजामध्ये निर्माण झाला. हि जी दुहेरी नितीमत्ता आहे की स्त्रियांना वेगळी मोरलीटी आणि पुरुषांना मात्र त्या मोरालिटीमध्ये थोडी लवचिकता, यातून जशी स्त्री वेश्यांची निर्मिती घडते आणि ती समाजामध्ये अपरिहार्य ठरते त्याच पद्धतीने पुरुषवेश्यांची निर्मिती सुद्धा अपरिहार्य ठरते. कारण - लग्नसंस्थेतून हे प्रश्न सुटतातच असे नाही. एक तर भारतीय १००% पुरुषांना शरीरसंबंधातील ज्ञान असतेच असे नाही. अनेकांना असे वाटते की मुल होणे म्हणजे आपल्याला या संबंधी परिपूर्ण ज्ञान आहे. 
बाबा /बुवा यांच्याशी एंटेन्गल झालेल्या स्त्रीयांशी संवाद साधल्यावर त्या म्हणाल्या हे बाबा महाराज या बाबतीत खूपच प्रवीण असतात. आमची फसगत झाली पण त्यावेळी आम्ही परमानंदात होतो. मित्रांनो याचा नेमका अर्थ लक्षात घेतला पाहिजे. - 
भारतीय समाजामध्ये स्त्रियांना एका बाजूने सेक्सबद्धल चुकीच्या संकल्पना सांगितल्या जातात. त्याना हे सुद्धा सांगितल जात की सेक्समध्ये रुची वाटता कामा नये. बाईला केवळ प्रेमामध्येच रुची वाटायला हवी. थोडक्यात एक फ्रीजीडीटी निर्माण होईल कमी लैंगिक इच्छा निर्माण होईल या पद्धतीचा संस्कार स्त्रियांवर असतो. पुरुषसुद्धा कमी लैंगिक इच्छेची धारणा कमी करण्याचा प्रयत्न करत नाही. स्वसमाधान पुरेसे मानतात. त्यातून सेक्ससंबंधी आवड निर्माण होण्याऐवजी कंटाळवाणा प्रकार या पद्धतीने पहाण्याचा कल स्त्रियांमध्ये वाढत जातो. या पद्धतीच्या स्त्रिया देवा धर्माच्या जास्त नादाला लागलेल्या दिसतात कारण मनामध्ये साचून राहिलेली भावना देवाधार्मासाराख्या क्रियांमधून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. भजन-कीर्तन करतात. देवाच्या आहारी जाण्याचा प्रयत्न करतात. आणि या पद्धतीच्या स्त्रिया देवाचा अवतार असलेल्या बुवांकडे अधिक मोठ्या संखेने खेचल्या जातात.
सर्वात पाहिलं काम बुवा कोणत करत असेल तर या स्त्रियांच्या मनातील गिल्ट कॉम्प्लेक्स काढून टाकतो. बुवा बाबांना हे सांगण्याची खर म्हणजे गरज नाही कि मी कृष्णावतार आहे व तू गोपी आहेस कारण - भारतीय समाजात स्त्रीला सहजपणे ज्याच्यापर्यंत पोहचता येते ते म्हणजे बाबा, बुवा, मांत्रिक,ज्योतीशी हे आहे. डॉक्टरकडे सुद्धा तिला सहजतेने जाता येत नाही. एखादा पुरुष डॉक्टर एखाद्या स्त्रीला जास्त वेळ आतमध्ये तपासत असेल तर बाहेर बसलेला पुरुष अस्वस्थ होतो. किंवा नातेवाइक अस्वस्थ होतात. पण बाबा, बुवांकडे तासंतास आहे तर यामध्ये पवित्रता आहे. यामध्ये देवाचं काहीतरी आहे. म्हणून माणसं नेहमी खुश होतांना दिसतात की माझी बायको फार मोठी धार्मिक आहे, ती बाबांची फार मोठी भक्त आहे. त्यामुळे स्त्रीला पुरूषांजवळ जाण्याची उत्तम संधी मिळत असेल तर ती असल्या बाबा,बुवा, मांत्रिक, ज्योतिषी या पद्धतीच्या पुरुशांजवळ जाण्याची त्यामुळे स्वाभाविकच यामार्गातून त्यांना रिलेशन निर्माण करता येतात. यामध्ये हे बाबालोक स्त्रियांच्या मनातील गिल्ट कॉम्प्लेक्स काढून टाकतात, राधाकृष्ण यासारखे संबंध जोडून यामागे वावगे काही नाही, हीच देवाची दिशा आहे, या संबंधातून केवळ तुझाच नव्हे तर तुझ्या कुटुंबाला सुद्धा मोक्ष मिळणार आहे असं सुंदरदास सारखा बाबा पटवून देण्यात यशस्वी होत असतो. एखादा मांत्रिक घरातील उद्भवलेल्या अडचणीपासून सुटका मिळण्यासाठी स्त्रीला आपल्याशी संबंध ठेवण्यास भाग पडतो. या प्रमाणे तांत्रिक कल्पनांच्या नावाखाली देवाच्या अवताराच्या नावाखाली किंवा गेल्या जन्मी तू कोणीतरी मी कोणीतरी होतो म्हणून याही जन्मी हरकत नाही, या पद्धतीची खेळी वापरून स्त्रियांच्या मनातील अपराधीपणाची भावना काढून टाकतात. या पद्धतीचा पुण्यामधील काही वर्षांपूर्वी मिसर नावाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी वाघमारेबाबा बाबत सखोल चौकशी करून वाघमारेबाबा प्रकरण बाहेर काढले होते.
मित्रांनो असे बाबा स्त्रियांच्या बाबतीत वीरपुरुष सिद्धपुरुष ठरतो. त्यानंतर ती स्त्री सातत्याने त्यात अडकत जाते. मित्रांनो वाईट भाग हा आहे कि हे सगळ धर्म आणि श्रद्धा या क्षेत्रातील प्रकरण असल्याने ती स्त्री बाबा बुवांच्या आहारी जाते त्याचे शब्द प्रमाण मानते व त्यानुसार अख्ख कुटुंबच बसायला, उठायला, नाचायला लागत हि वस्तुस्थिती फार विदारक आहे. 
पुरुषांना जशा वेगवेळ्या चवी हव्या असतात त्यासाठी वेश्याव्यवसायाची गरज पुरुष समाजाला असते. तीच निकड कुठे न कुठे स्त्रियांबाबत असते. तिला ही अस वाटू शकत कि आपले संबंध दुसऱ्या कुणाशी असले तर बरे होईल पण धर्माच्या पागाड्यामुळे , नैतिक कल्पनांमुळे, सामाजिक प्रशिक्षणामुळे ती यासाठी कधीच धजावत नाही. पण ज्यावेळेस हे बाबालोक ज्यावेळेस संधी उपलब्ध करून देतात त्यावेळेस या स्त्रिया या करिता तयार व्हायला ह्या एका मानसिक नैसर्गिक प्रवृत्तीमुळे तयार होत असतात अस वाटण्यासारखी परिस्थिती आहे. 
या वरून हे बाबा, मांत्रिक, भगत, दैवी शक्ती अंगात आणणारे लोक कळत नकळत पुरुष किंवा स्त्री वेश्या आहेत या निश्कर्षापर्यंत सहज जाता येत.
बुवा तेथे बाया ! जिवंत हृदयाच्या शाबूत डोक्याच्या मित्र मैत्रिणींनो - मित्रांनो … आचार्य अत्रेंचे एक वाक्य अतिशय प्रसिद्ध आहे 'वृक्ष तेथे छाया बुवा तेथे बाया !' हे वाक्य ऐकल्यावर सुरुवातीस असे वाटायचे की अत्र्यांचा हा उगाचच केलेला आगावूपणा आहे. असतील काही बाबा, बुवा,बापू असे पण सगळेच असे नसावेत. पण ह्या वाक्याची सत्यता चळवळीच्या अनुषंगाने, डोळस अनुभवाने पटत गेली, दृढ होत गेली. (काही मोठ्या प्रमाणावर भांडाफोड प्रसारित झालेल्या उदा. सह मांडणी करण्याचा मी प्रयत्न करत आहे ) * विद्यानंद महाराज (वर्धा) - खरे तर विवेकानंदांचे तत्वज्ञान सांगणारे हे बाबा. या बाबाच्या नागोबा अंगात येत असे आणि 'विठुलाचा खेळ' नावाखाली हा बाबा स्त्रियांशी संबंध प्रस्तापित करत असे. या बाबाचे खरे नाव चंद्रशेखर जोशी. दहावी नापास असलेला हा माणूस अमेरिकेत (एम. डी. एफ. आर. सी. एस.) डॉक्टर होतो, पण साक्षात्कार झाल्याने पुंन्हा विदेशातील practice सोडून भारतात लोकांचे कल्याणाकरिता आलो असे सांगत असे. …। मित्रांनो - माणूस कधीही श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये भेद करत नाही. कारण त्याला प्रत्यक्षामध्ये हा भेद करताच येत नाही. कारण श्रद्धेच्या बाबतीत चार इन्क्रिडीयंट सांगितले जातात. (१) ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची त्याला सर्वश्रेष्ठ मानणे.। (२) ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची त्याचे शब्दप्रामाण्य मानणे (शब्द प्रामाण्य म्हणजे शब्द हेच प्रमाण -उदा . - एखादा बाबा म्हणाला कि मी स्वर्गात जाउन आलो कि आपण त्यावर विश्वास ठेऊन बाबा स्वर्गात जाउन आले असे मानणे ) (३) ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची त्याच्यावर शंका न घेणे. (४) ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची त्या विषयी चिकित्सा न करणे. मित्रांनो असे चिकित्सा न करता तुंम्ही शब्दप्रामाण्य मानून व्यक्ती,वस्तू,ग्रंथ यावर श्रद्धा ठेवायला लागलात तर श्रद्धेचे रुपांतर अंधश्रद्धेत कधी होते ते लक्षात येत नाही. खरे तर समोरील माणसाला श्रद्धा बाळगणाऱ्या माणसातील अंधश्रद्धा दिसत असते. पण त्याला स्वत:ला तो शब्दप्रामाण्य मानत असल्यामुळे चिकित्सा करत नसल्याने ती अंधश्रद्धा वाटत नसते. त्यामुळे मित्रांनो श्रद्धा आणि अंधश्रद्धा एकच आहेत. काही लोक म्हणतात डोळस श्रद्धा ठेवली पाहिजे, म्हणजेच बदलू शकेल अशी श्रद्धा - खर म्हणजे डोळस प्रकारची श्रद्धा असू शकत नाही - पण हेही खरे आहे की विश्वासाशिवाय माणसाला जगताच येणार नाही. - अनुभव बदलला कि विश्वास बदलतो पण या प्रक्रियेला श्रद्धा या प्रक्रियेत स्थान नाही. अनुभव बदलला कि विश्वास बदलू शकतो. त्याला कुणाचा विरोध असण्याचे कारणच नाही आणि म्हणून श्रद्धा या शब्दाविषयी आपण भांडत नाही. समाजामध्ये आपल्याला श्रद्धा या प्रक्रियेचा वापर करून माणसे मोठ्या प्रमाणावर इतरांना कशा प्रकारे लुबाडत असतात हे प्रकर्षाने दिसते. । मित्रांनो अंनिस च्या चळवळीने हजारो बाबा, बुवा, बापू, मांत्रिक यांची भांडाफोड केलेली आहे. या सर्व भांडाफोड झालेल्या प्रकरणांचा अभ्यास केल्यास असे कळते कि जो जो माणूस स्वत: स्वामी, बाबा म्हणवतो जो जो स्वत:मध्ये दैवी शक्ती आहे असा आभास निर्माण करतो तो तो प्रत्येक बाबा अनेक स्त्रियांचा वापर करीत असतो. *मनमाड जवळील शुकादास बाबा : - स्वत:ला देव अवतार म्हणवणारा काही इयत्ता शिकलेला हा माणूस एका डॉक्टरकडे काम्पौडर होता. त्या अनुभवाच्या जोरावर हा लोकांना बाबागिरी सोबतच औषधाच्या प्रीक्सिप्षनही लिहून देत असे. पुरुषांची तपासणी दोन मिनिटात तर स्त्रियांसाठी लागणारा वेळ हा पाच मिनिटांपासून अर्धा पाउण तास इतका असे. एका जागरूक महिलेच्या तक्रारीवरून आपल्या कार्यकर्त्यांना या बाबाची भांडाफोड करण्यात यश मिळाले होते. तक्रारीनंतर कार्याकर्त्यांजवळ पिडीत महिलांची १००च्या पुढे लिस्ट गेली होती. त्यातील २० ते २५ महिला फोडण्यात समितिला यश आले. व अनेक पुरावे गोळा होऊ शकले. हा शुक्दासबाबा महिलांना एकांतात मी कृष्णाचा अवतार आहे आणि तू गेल्या जन्मीची माझी राधा किंवा आवडती गोपी आहेस, असे सांगून त्यांच्या मनातील गिल्ट (अपराधीपणाची भावना) काडून टाकत असे आणि त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करत असे. मित्रांनो या बाबाचा दरबार अनेक ठिकाणी लागत असे,यामुळे गोपिकांची संख्या देखील वाढली होती. त्यामुळे अनेक गोपिकांचे नंबर या बाबाकडे लागेनासे झाले. त्यातून त्यांची आपापसात कुरबुर वाढून मारामारीपर्यंत वेळ आली होती आणि याचा फायदा चळवळीला झाला समिती त्यांना फोडू शकली आणि मोठ्या प्रमाणावर शुकदासबाबाची भांडाफोड शक्य झाली. *गुलाबबाबा (काटेल - वर्धा) - मित्रांनो हा हि कृष्णावतार … हा बाबा अनेक मुलींना माय संबोधून त्यांच्याशी लहान बाळाप्रमाणे वर्तन करीत असे पुढे संबध प्रस्तापित करीत असे. - ह्याही बाबाला मोठ्या प्रमाणावर एक्स्पोज करण्यात कार्यकर्त्याना यश आले होते. मित्रांनो ज्या ज्या बाबा/बुवांना चळवळीने एक्स्पोज केले होते त्यातील अधिकाधिक बाबा श्रीकृष्ण नावाच्या देवाचा अतिशय वाईट पद्धतीने वापर करून घेत होते. ते सर्व केंव्हा ना केंव्हा आपल्या भक्तांना मी कृष्णावतार आहे आणि तू गोपी किंवा माझी आवडती राधा आहेस असे सांगून त्यांचा वापर सातत्याने करून घेतांना पुढे आले आहे. हे सर्व बाबापर्यंत मर्यादित नसून मांत्रिक, भगत, दीर्घकाळ जोतिशाचा धंदा करणारे लोक थोड्याफार वेगळ्या प्रमाणात हेच करतात हे लक्षात आले. *विधार्भातील सुंदरदास महाराज :- रामास्नेही पंथातील कोट्यावधी संपत्ती असलेल्या समाजातील हा महाराज - याच्याविरोधात अकोला,अमरावतीतील अनेक तरून मंडळी उभी ठाकली होती, परंतु त्यांना फारसे यश न आल्याने या मंडळींनी चळवळीची मदत घेवून या महाराजाला मोठ्या प्रमाणावर एक्स्पोज केले. या बाबाचे भक्त एव्हढे अंधश्रद्धाळू होते की आपल्या नव्या सुनेला देखील पहिल्या रात्रीकरीता सुंदरदासाकडे पाठवत असत. आणि त्याचा अभिमानही बाळगत असत. त्यांची श्रद्धा अशी होती कि त्याने सांगितल्याप्रमाणे हा बाबा दहाव्या मार्गातून मोक्ष मिळवून देतो. याला एक्स्पोज केल्यानंतर रामस्नेही पंथातील साधूंच्या मंडळासमोर या सुंदरदासाला विचारणा करण्यात आल्यावर त्याने अगदी छातीठोकपणे सांगितले की मी जो मार्ग सांगत आहे तोच खरा धार्मिक मार्ग आहे. कारण हा पंथ व्यापाऱ्यांचा आहे. या पंथातील पुरुषांना आपल्या स्त्रियांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो मग या स्त्रिया नोकरांशी संबंध ठेवतात त्यातून वर्णसंकर होतो त्यामुळे धर्माचे प्रचंड नुकसान होते. मी मात्र संबंध निर्माण करून त्या स्त्रियांना शपथ घालतो कि माझ्याशिवाय व तुझ्या नवऱ्याशीवाय कोणाशीही संबध ठेवायचे नाहीत व त्या स्त्रिया माझा शब्द कधीही तोडत नाहीत. त्यामुळे खऱ्या अर्थाने मी धर्म बचावाचे काम करतो आहे, वर्णव्यवस्था टिकविण्याचे काम करतो आहे.असा दावा सुंदरदासने त्या ठिकाणी केला. आणि कालांतराने दडपशाहीच्या जोरावर स्वत: त्या पंथाचा चीफ होऊन बसला. *कृपाळू महाराज :- याला अनाघ्रात स्त्री लागत असे आणि याचे अंधभक्त ते सर्व पुरवित असत. - भारतीय कायद्यानुसार वय १८ वर्षे वयाखालील मुलीवर असा प्रसंग झाल्यास तो बलात्कार ठरतो. -- ह्या संदर्भातील केस दाखल करून बरेच वर्ष हा बाबा नागपूर कोर्टाच्या वाऱ्या करत होता. ** मित्रांनो असं का घडत ? ज्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात चारित्र्याचे स्तोम माजवले जाते, प्रत्येक स्त्रीने, मुलीने चारित्र्य संपन्न असावे असे मानले जाते. पुरुषांना थोड्या प्रमाणात सूट दिली जाते. पण स्त्रयांच्या मुलींच्या बाबतीत आग्रह कायम असतो. पुरुषाने काही प्रामाणात लग्नाआधी भानगडी केलेल्या चालतात. पण स्त्रीच्या बाबतीत खपवून घेतले जात नाही. प्रत्येक नवऱ्याला आपली पत्नी अनाघ्रात हवी असते. एव्हढेच नव्हे तर एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीची छेद काढली किंवा tonting केले तर बदडून अगदी गाढवावरून धिंड काढणे, हातपाय तोडण्यापर्यंत मजल जाते. त्या समाजात हे बाबालोक एव्हड्या मोठ्या प्रमाणावर कसे काय संबंध प्रस्थापित करू शकतात. ??? स्त्री-पुरुषांनी आयुष्यभर प्रामाणिक असावं केवळ विवाह या पद्धतीमध्येच या पद्धतीचे शरीरसंबंध निर्माण व्हावे वैवाहिक जीवनाबाहेर कधीही होऊ नयेत हि एक आदर्श कल्पना आपण आपल्या समाजामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला हि कल्पना समाजामध्ये राबवत असतांना पुरुषसत्ताक पद्धती असल्याने पुरुषांनी स्वत:ला मात्र स्वातंत्र्य खेचून घेतले व कायम ठेवले. त्यांना आपले स्वातंत्र्य राबवायचे असेल आणि स्त्रियांनी पूर्णपणे चारित्र्याची संकल्पना आमलात आणायची असेल तर स्वाभाविकच अशा स्त्रीया समाजामध्ये निर्माण झाल्या पाहिजेत कि ज्या चारित्र्य बाळगणार नाहीत. त्यांच्यावर चारित्र्याचे बंधन असणार नाही. यातूनच वेश्याव्यवसाय यंत्रणेला सुरुवात झाली. आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर वेश्याव्यवसाय समाजामध्ये निर्माण झाला. हि जी दुहेरी नितीमत्ता आहे की स्त्रियांना वेगळी मोरलीटी आणि पुरुषांना मात्र त्या मोरालिटीमध्ये थोडी लवचिकता, यातून जशी स्त्री वेश्यांची निर्मिती घडते आणि ती समाजामध्ये अपरिहार्य ठरते त्याच पद्धतीने पुरुषवेश्यांची निर्मिती सुद्धा अपरिहार्य ठरते. कारण - लग्नसंस्थेतून हे प्रश्न सुटतातच असे नाही. एक तर भारतीय १००% पुरुषांना शरीरसंबंधातील ज्ञान असतेच असे नाही. अनेकांना असे वाटते की मुल होणे म्हणजे आपल्याला या संबंधी परिपूर्ण ज्ञान आहे. बाबा /बुवा यांच्याशी एंटेन्गल झालेल्या स्त्रीयांशी संवाद साधल्यावर त्या म्हणाल्या हे बाबा महाराज या बाबतीत खूपच प्रवीण असतात. आमची फसगत झाली पण त्यावेळी आम्ही परमानंदात होतो. मित्रांनो याचा नेमका अर्थ लक्षात घेतला पाहिजे. - भारतीय समाजामध्ये स्त्रियांना एका बाजूने सेक्सबद्धल चुकीच्या संकल्पना सांगितल्या जातात. त्याना हे सुद्धा सांगितल जात की सेक्समध्ये रुची वाटता कामा नये. बाईला केवळ प्रेमामध्येच रुची वाटायला हवी. थोडक्यात एक फ्रीजीडीटी निर्माण होईल कमी लैंगिक इच्छा निर्माण होईल या पद्धतीचा संस्कार स्त्रियांवर असतो. पुरुषसुद्धा कमी लैंगिक इच्छेची धारणा कमी करण्याचा प्रयत्न करत नाही. स्वसमाधान पुरेसे मानतात. त्यातून सेक्ससंबंधी आवड निर्माण होण्याऐवजी कंटाळवाणा प्रकार या पद्धतीने पहाण्याचा कल स्त्रियांमध्ये वाढत जातो. या पद्धतीच्या स्त्रिया देवा धर्माच्या जास्त नादाला लागलेल्या दिसतात कारण मनामध्ये साचून राहिलेली भावना देवाधार्मासाराख्या क्रियांमधून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. भजन-कीर्तन करतात. देवाच्या आहारी जाण्याचा प्रयत्न करतात. आणि या पद्धतीच्या स्त्रिया देवाचा अवतार असलेल्या बुवांकडे अधिक मोठ्या संखेने खेचल्या जातात. सर्वात पाहिलं काम बुवा कोणत करत असेल तर या स्त्रियांच्या मनातील गिल्ट कॉम्प्लेक्स काढून टाकतो. बुवा बाबांना हे सांगण्याची खर म्हणजे गरज नाही कि मी कृष्णावतार आहे व तू गोपी आहेस कारण - भारतीय समाजात स्त्रीला सहजपणे ज्याच्यापर्यंत पोहचता येते ते म्हणजे बाबा, बुवा, मांत्रिक,ज्योतीशी हे आहे. डॉक्टरकडे सुद्धा तिला सहजतेने जाता येत नाही. एखादा पुरुष डॉक्टर एखाद्या स्त्रीला जास्त वेळ आतमध्ये तपासत असेल तर बाहेर बसलेला पुरुष अस्वस्थ होतो. किंवा नातेवाइक अस्वस्थ होतात. पण बाबा, बुवांकडे तासंतास आहे तर यामध्ये पवित्रता आहे. यामध्ये देवाचं काहीतरी आहे. म्हणून माणसं नेहमी खुश होतांना दिसतात की माझी बायको फार मोठी धार्मिक आहे, ती बाबांची फार मोठी भक्त आहे. त्यामुळे स्त्रीला पुरूषांजवळ जाण्याची उत्तम संधी मिळत असेल तर ती असल्या बाबा,बुवा, मांत्रिक, ज्योतिषी या पद्धतीच्या पुरुशांजवळ जाण्याची त्यामुळे स्वाभाविकच यामार्गातून त्यांना रिलेशन निर्माण करता येतात. यामध्ये हे बाबालोक स्त्रियांच्या मनातील गिल्ट कॉम्प्लेक्स काढून टाकतात, राधाकृष्ण यासारखे संबंध जोडून यामागे वावगे काही नाही, हीच देवाची दिशा आहे, या संबंधातून केवळ तुझाच नव्हे तर तुझ्या कुटुंबाला सुद्धा मोक्ष मिळणार आहे असं सुंदरदास सारखा बाबा पटवून देण्यात यशस्वी होत असतो. एखादा मांत्रिक घरातील उद्भवलेल्या अडचणीपासून सुटका मिळण्यासाठी स्त्रीला आपल्याशी संबंध ठेवण्यास भाग पडतो. या प्रमाणे तांत्रिक कल्पनांच्या नावाखाली देवाच्या अवताराच्या नावाखाली किंवा गेल्या जन्मी तू कोणीतरी मी कोणीतरी होतो म्हणून याही जन्मी हरकत नाही, या पद्धतीची खेळी वापरून स्त्रियांच्या मनातील अपराधीपणाची भावना काढून टाकतात. या पद्धतीचा पुण्यामधील काही वर्षांपूर्वी मिसर नावाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी वाघमारेबाबा बाबत सखोल चौकशी करून वाघमारेबाबा प्रकरण बाहेर काढले होते. मित्रांनो असे बाबा स्त्रियांच्या बाबतीत वीरपुरुष सिद्धपुरुष ठरतो. त्यानंतर ती स्त्री सातत्याने त्यात अडकत जाते. मित्रांनो वाईट भाग हा आहे कि हे सगळ धर्म आणि श्रद्धा या क्षेत्रातील प्रकरण असल्याने ती स्त्री बाबा बुवांच्या आहारी जाते त्याचे शब्द प्रमाण मानते व त्यानुसार अख्ख कुटुंबच बसायला, उठायला, नाचायला लागत हि वस्तुस्थिती फार विदारक आहे. पुरुषांना जशा वेगवेळ्या चवी हव्या असतात त्यासाठी वेश्याव्यवसायाची गरज पुरुष समाजाला असते. तीच निकड कुठे न कुठे स्त्रियांबाबत असते. तिला ही अस वाटू शकत कि आपले संबंध दुसऱ्या कुणाशी असले तर बरे होईल पण धर्माच्या पागाड्यामुळे , नैतिक कल्पनांमुळे, सामाजिक प्रशिक्षणामुळे ती यासाठी कधीच धजावत नाही. पण ज्यावेळेस हे बाबालोक ज्यावेळेस संधी उपलब्ध करून देतात त्यावेळेस या स्त्रिया या करिता तयार व्हायला ह्या एका मानसिक नैसर्गिक प्रवृत्तीमुळे तयार होत असतात अस वाटण्यासारखी परिस्थिती आहे. या वरून हे बाबा, मांत्रिक, भगत, दैवी शक्ती अंगात आणणारे लोक कळत नकळत पुरुष किंवा स्त्री वेश्या आहेत या निश्कर्षापर्यंत सहज जाता येत.

Sunday, August 18, 2013

टाळ्या वाजवणारे मृतात्मे: अमेरिकन बहिणींची बुवाबाजी



जगाच्या पाठीवर सर्वत्र मृतात्म्यांच्या अस्तित्वाला विविध धर्मांत मान्यता आहे. हे आत्मे विविध रुपात भटकत असतात असा समज आहे. विज्ञानात आत्म्याचे अस्तित्व सिद्ध झालेले नाही. तरीही एका मानसिक गरजेपोटी माणूस आपल्या प्रिय व्यक्तीच्या वियोगाला सहन करत नाही व त्याला आपल्या प्रिय व्यक्तीच्या तथाकथित आत्म्याशी संवाद साधण्याची अनिवार ओढ लागलेली असते. या मानसिकतेचा फायदा घेऊन नसलेल्या आत्म्याशी संवाद साधून देणारे दलाल जागोजागी जगभर दिसतात. अमेरिकाही याला अपवाद नाही. १९४८ मध्ये न्यूयॉर्कमधून आत्म्याशी संवाद साधण्याची बुवाबाजी दोन चलाख भगिनींनी सुरु केली. या बुवाबाजीचा पर्दाफाश कसा झाला हे जाणून घेणे जितके मनोरंजक तितकेच प्रबोधन करणारे ठरेल.
अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील हाईड्सव्हिले हे एक उपनगर. जॉन फॉक्स नावाच्या लोहाराचे कुटुंब येथे राहत होते. या कुटुंबात एकूण पाच सभासद होते. जॉन फॉक्स, त्याची पत्नी व मार्गारेट(मॅगी), कॅथेरीन (कॅथी) आणि ली फिश या त्यांच्या मुली.
मार्गारेट आठ वर्षांची व कॅथेरीन साडे सहा वर्षांची असतानाची ही घटना. या दोघी बहिणी मोठ्या खोडकर होत्या. त्यांची आई मात्र प्रेमळ व सरळ मनाची पण भित्र्या स्वभावाची होती. या स्वभावाचा फायदा घेऊन या खोडकर पोरी आईला घाबरवण्याचे विविध उद्योग करीत असत. बेडवर झोपायला जाताना दोघी बहिणी एक सफरचंद दोरीला बांधून ती दोरी वरून खाली जमिनीवर टाकून आपटल्याचा आवाज काढीत. आईने हा आवाज बऱ्याचदा ऐकला पण तिला आवाज कशामुळे येतोय हे कळायचे नाही. कॅथी व मॅगी तशा लहानच. त्यामुळे त्या हा चावटपणा करत असतील अशी पुसट शंकाही तिला आली नाही.
अखेरीस तिने हा गूढ प्रकार आपल्या शेजाऱ्यांना सांगायला सुरुवात केली. आपली आई व शेजारी या गूढ आवाजावर विश्वास ठेवतात हे लक्षात येताच दोघी बहिणींनी पायाची बोटे लाकडी जमिनीवर खुबीने वाकवून वेगळेच आवाज काढायची नाटके सुरु केली.
हे आवाज आपण कसे काढीत असू हे पुढे मॅगीने उघड केले. तिने दिलेला कबुली जबाब असा, “माझी बहीण कॅटी हिला हाताची बोटे मोडण्यातून आवाज निघतो हे माहित होते. तसाच आवाज पायाची बोटे जमिनीवर मोडून काढता येईल हे तिच्या लक्षात आले. मग आम्ही दोघींनी एका पायाची बोटे वापरून असा आवाज काढण्याचा सराव केला. नंतर दोन्ही पायाच्या बोटाने असा आवाज काढण्याचा सराव केला आणि अंधारात असा बेमालूम आवाज काढण्याचे कौशल्य आम्ही प्राप्त केले.”
पायाची बोटे लाकडी जमिनीवर मोडून टाळीसारखा आवाज निघे. या आवाजाचा वापर करून या बहिणींनी न्यूयॉर्कमध्ये व नंतर सर्व अमेरिकेत एका नव्या बुवाबाजीची सुरुवात केली. अमेरिकेत मृतात्म्याशी संवाद करण्याचे दरबार या दोघींनी सुरु केले. १९४८ मध्ये या नाट्याला सुरुवात झाली.
मॅगी व कॅथी यांनी असा दावा करायला सुरुवात केली की आपल्या बेडरूममधून विचित्र आवाज येत आहेत. हे आवाज एका खून झालेल्या फेरीवाल्याच्या आत्म्याचे होत असे सांगायला त्यांनी सुरुवात केली. थोड्याच दिवसांनी या दोघींच्या आईला याबाबतची खात्री देणारा अनुभवच आला. हा अनुभव तिने स्वतःच्या सहीने प्रसिद्धीस दिला. ती वेळ होती ३१ मार्चच्या मध्यरात्रीनंतरची. म्हणजेच एप्रिल फूलचा दिवस. मॅगी व  कॅटीने सगळ्या अमेरिकेला एप्रिलफूल करण्याची ती सुरुवात होती. मॅगीच्या आईने हा अनुभव खालीलप्रमाणे वर्णन केला.
कॅटी मोठ्याने म्हणाली, “मि. स्प्लिटफूट (खुन्याचा आत्मा) मी जसं करते तसं तू कर.” मग तिने टाळ्या वाजवल्या. लगेच तेवढ्याच टाळ्या कुठूनतरी वाजल्या. मोठे गूढच झाले. नंतर मॅगी उद्गारली, “आता मी करते ते कर; मोज एक, दोन, तीन आणि चार.” तशा चार टाळ्या तिने वाजविल्या आणि आश्चर्य म्हणजे तशाच चार टाळ्या प्रतिसादादाखल वाजल्या.
नतंर फेरीवाल्याच्या आत्म्याने अशा प्रतिसादाद्वारे संदेश दिला की, त्याचा खून झालाय व त्याचे प्रेत तळघरात पुरलंय. पण याची शहानिशा करण्यासाठी ते तळघर खणल्यावर तेथे थोडी हाडेच सापडली. मात्र ही हाडे कोण्यातरी प्राण्याची असावीत माणसाची नव्हे असा निष्कर्ष निघाला.
काही दिवसातच लोकांपर्यंत बातम्या पोचल्या की, या मुली केवळ त्या फेरीवाल्याच्या आत्म्याची माहिती देत नाहीत तर अशा भटकणाऱ्या वा खितपत पडलेल्या अनेक आत्म्यांच्या शोधासाठी मदत करतात. त्यांनी केलेल्या प्रात्यक्षिकांची एवढी ख्याती झाली की, या मुलींची थोरली बहीण ली फिश हिने मृतात्मावादी सोसायटीची स्थापना घोषित केली. याच्या प्रसाराला धर्माचे स्वरूप आले. आणि मृतात्म्याच्या दरबारात सुरुवातीला व शेवटी धार्मिक प्रार्थना म्हणायला सुरुवात झाली.
न्यूयॉर्क शहरात उत्तम प्रतिसाद मिळाल्यावर ली फिशने या दोघींना घेऊन संपूर्ण अमेरिकेतील विविध शहरामधून मृतात्म्याशी बोलण्याचे दरबार भरविण्याची मोहीम सुरु केली. प्रत्येक ठिकाणी लोक आपल्या प्रिय मृत व्यक्तीच्या आत्म्याशी संवाद साधण्यास मोठ्या संख्येने सहभागी होऊ लागले.
या गोष्टीचा असा बोलबाला झाल्यावर अमेरिकेतील विवेकवादी मंडली जागी झाली. चिकित्सक संशोधकांनी मॅगी व कॅटीला आव्हान देण्यास सुरुवात केली. बफेलो विद्यापीठातील प्राध्यापकांनी या मुलींना मिळणारे आत्म्यांचे गूढ आवाज तपासले. संशोधनांती हे गूढ आवाज आत्म्याचे नसून या मुलींच्या सांध्यांतून मुद्दामहून काढलेले असावेत असा निष्कर्ष काढला. नंतरच्या संशोधनात असे आढळले की, हे आत्मे अनेकदा चुकीची उत्तरे देत आहेत. मॅगीच्या पायाची हालचाल नियंत्रित केल्यावर असे गूढ आवाज येत नाहीत असा निष्कर्ष त्यांनी काढला.
चलाख मंडळी आपल्या कृत्यांबद्दल पश्चात्ताप होऊन त्याची जाहीर कबुली सहसा देत नाहीत. आपण इतरांना फसवले हे कोण सांगेल? ते लपवून ठेवण्यातच शहाणपणा दाखविण्याची प्रवृत्ती बहुतेक मंडळींची असते. पण कॅटी आणि मॅगीच्या बाबतीत आश्चर्यकारक गोष्ट घडली. आम्ही लोकांना फसवीत होतो याची जाहीर कबुली त्यांनी दिली. पण ती चाळीस वर्षांनी. त्यांच्या दरबाराची सुरुवात झाली १९४८ मध्ये व जाहीर कबुली दिली २१ ऑक्टोबर १९८८ मध्ये. त्या दिवशी या भगिनी न्यूयॉर्कमधील संगीत अकादमीच्या हॉलमध्ये दाखल झाल्या. आम्ही चलाखीने मृतात्म्याचे आवाज कसे काढत होतो याचे प्रात्यक्षिक मार्गारेट दाखवू लागली आणि कॅथरीन मान डोलावून त्यास होकार देत होती. गंमत म्हणजे या कार्यक्रमास जमलेल्या मंडळीत आत्म्याचे अस्तित्व मानणारे बहुसंख्येने होते. त्यांना धक्काच बसला व ते भुवया उंचावून स्टेजवरील प्रात्याक्षिके खोटी आहेत असा नकारात्मक सूर काढू लागले व आपली नाराजी प्रकट करू लागले. मृतात्म्यांचे टाळीसारखे आवाज मार्गारेट पायातील बूट चलाखीने काढून, पायाची बोटे वाकवून कशी काढत होती ते स्पष्टपणे दाखवीत होती. मोजे घातलेला पाय पातळ अशा लाकडी फळीवर कौशल्याने आपटून ती आत्म्याचा गूढ अवाज काढत होती. आणि हे ती सर्वांसमोर दाखवीत होती.
इव्हनिंस पोस्ट या दैनिकाने दुसऱ्या दिवशी या प्रयोगावर बातमी दिली. “मिसेस मार्गारेट आता आधुनिक मृतात्मावादाचा उगम तिच्या पायाच्या अंगठ्यात असल्याचे दाखवीत आहे.” मार्गारेटने स्वतः याबाबत खालील निवेदन जाहीर केले.
“हीच वेळ आहे की, आता मला मृत्यूनंतरचे जग व एकूणच अध्यात्मवादाबाबतच्या या विषयाबाबतचे सत्य उघड करायला हवे. हा विषय आता जगभर पसरला आहे आणि याला वेळीच पायबंद घातला नाही तर त्यामुळे मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. या क्षेत्रात मी प्रथम प्रवेश केला आणि म्हणून तो उघड करण्याचा हक्क मलाच आहे.”
पुढे मग लहानपणी आईच्या भित्र्या स्वभावाचा फायदा घेऊन तिच्या खोड्या कशा काढत असू हे मार्गारेटने विस्ताराने आपल्या निवेदनात कथन केले. ज्याची माहिती या लेखाच्या सुरवातीस आली आहे. या निवेदनात मार्गारेटने पुढे लिहिले आहे की,
तिची थोरली बहिण ली फिश हिला माहित होते की, मृतात्म्यांच्या टाळीचा आवाज हा बनावट होता आणि जेव्हा तिने दोघी बहिणीबरोबर अमेरिकेचा दौरा केला तेव्हा लोकांच्या प्रिय मृतात्म्यांच्या प्रश्नांची उत्तरे तीच त्यांना सुचवित असे. यासाठी ती दरबारात आलेल्या लोकांकडून अगोदरच माहिती मिळवीत असावी आणि अशी माहिती मिळत नसेल तेव्हा या क्षेत्रातील चाणाक्ष लोक संदिग्ध उत्तर देण्याचे जे कौशल्य वापरतात तेच त्या वापरत असाव्यात.
मार्गारेट आणि तिच्या बहिणींचे हे मृतात्मानाट्य आणखीनच वेगळ्या प्रकारे रंगत गेले. या भगिनींची अशी अटकळ होती की, आपल्या सत्य कथनाबद्दल लोक आपली स्तुती करतील व निर्भयपणाला दाद देतील. शेवटी माणूस पैशाचा गुलाम असतो हेच खरे. पूर्वी दरबारात चलाखी करून पैसा मिळे, पण आता खरे लोकांना सांगितले तर लोक खूश होऊन अधिक बक्षीस देतील अशी त्यांची अटकळ होती. पण घडले उलटेच. आपण मृतात्म्यांचा आवाज चलाखीने काढत होतो याचे प्रयोग त्यांनी लोकांसमोर सुरु केले. त्याला खुश होऊन लोक आर्थिक मदत करतील ही मार्गारेटची अपेक्षा फोल ठरली. चरितार्थ चालवणे त्यामुळे कठीण झाले. तिला जाणीव झाली की, लोक फसण्यासाठी भरपूर पैसा खर्च करतात पण शहाणे होण्यासाठी नाही करत.
परिणामी मार्गारेट परत आपल्या मूळ मृतात्मा संवाद दरबाराकडे वळली याचे आश्चर्य वाटायला नको. ८ मार्च १९९५ रोजी तिचा मृत्यू झाला. त्यावेळी तिच्या शोकयात्रेसाठी हजारो अध्यात्मवादी (मृत्यूनंतर आत्मा असतो असे मानणारे) जमले होते व शोक व्यक्त करीत होते.
आजही मृतात्म्याच्या भेटीसाठी आसुसलेली ही मंडळी मार्गारेटने कबूल केलेला अपराध हा खोटा असल्याचे सांगतात. तिच्या पैशाच्या गरजेपोटी किंवा या क्षेत्रातील इतर स्पर्धकांवर सूड उगवण्यासाठी तिने हे ढोंग केले असावे असे त्यांचे म्हणणे आहे. तथापि पुढे तिच्या बहिणीने, ती चलाखीच करत होती याला पुष्टी दिली आणि ही चलाखी त्या दोघी कशा करत होत्या याची प्रात्याक्षिके दाखवण्याचे कार्यक्रम परत परत केले.
मार्गारेट व तिच्या बहिणींचा अमेरिकेतील हा आत्म्याचा खेळ मानवी स्वभावाचे अनेक पैलू दाखवतो. माणसांना सत्य पचवणे किती जड जाते व सुप्त इच्छांच्या पूर्तीसाठी आभासी जग त्यांना खरं वाटू लागतं. या आभासी जगाचे दर्शन चलाख मंडळी करतात हे त्यांना हवहवसं वाटतं. आपली फसवणूक होत आहे हे दिसल्यावर देखील लोक ते मान्य करायला तयार होत नाहीत. म्हणूनच जेम्स रँडीनं म्हटलंय, “लोकांना फसण्याची भारी हौस असते. म्हणून त्यांना फसवणे सोपे जाते.”
विवेकाची वाट किती अवघड आहे नाही का?

-प्रा. प. रा. आर्डे

Monday, June 10, 2013

आधुनिक अंधश्रद्धा अर्थात बुवाबाजी...

आजकाल बुवा बाबांची संख्या वारेमाप वाढलीय. पूर्वीची बुवाबाजी अत्याधुनिक रूप घेऊन आलीय. बुवा, बाबा, भगत, मांत्रिक, तांत्रिक हे शब्द बदलून स्वामी, महात्मा, गुरुजी, महाराज, सद्गुरु अशा अनेक हायटेक उपाध्यांमध्ये रूपांतरीत झालेले दिसतात.
आजचे बाबा हुशार आहेत, उच्चशिक्षितही आहेत. समाजमनाचा दांडगा अभ्यास त्यांनी केलेला असतो. मानसशास्त्रही ते कोळून प्यालेले असतात. समाजाची नाडी त्यांनी ओळखलेली असते. म्हणूनच त्यांच्या सत्संगांना हजारो लाखोँच्या संख्येने गर्दी होते.
देव, देवता, स्वर्ग, नरक, पाप, पुण्य, चौऱ्‍याऐंशीचा फेरा, आत्म्याचे अमरत्व, परमात्म्याशी तादात्म्य पावणे, कुंडलिनी जागृत करणे, मोक्षप्राप्ती अशा अवैज्ञानिक, बिनबुडाच्या संकल्पनांचा समाजाच्या अस्थिर मनावर भडीमार करीत हे बाबालोक आपणाला शरण आल्याशिवाय तरणोपाय नाही हे पटवून देण्यात यशस्वी ठरतात. अशा या भ्रामक कल्पनांच्या आहारी जाऊन सूज्ञ व्यक्तिदेखील स्वतःची सद्सद्विवेकबुद्धी बाबांच्या चरणी गहाण ठेवतात हीच ती खरी अंधश्रद्धा. मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले, आता मंगळावर मोहीम चालू आहे आणि दुसरीकडे मी मी म्हणणारे सुशिक्षितसुद्धा मोक्षप्राप्तीच्या मृगजळामागे धावतांना दिसतात. हीच ती आधुनिक अंधश्रद्धा.
एकदा का बुवाचे अनुयायी झाले की आपल्याला सुख, समाधान, शांती मिळेल अशी शरणार्थी व्यक्तीची धारणा बनते. मग ती बाबाच्या बुवागिरीत पुरती अडकते, भरडली जाते. ती कशी? ते पुढील उदाहरणांवरून स्पष्ट होईल-
बांबांच्या कंपूत किंवा कळपात फक्त शिरता येते बाहेर पडण्याचा विचार मुळापासूनच छाटला जातो.
बांबांच्या कृपादृष्टीशिवाय तरणोपाय नाही असे बिंबवले जाते.
जीवनातील दुःखे, चिंता, समस्या बाबांमुळे हमखास दूर होतील याची हमी हस्तकांकरवी दिली जाते.
आलेल्या संकटाचा किंवा अडचणीचा सामना आपण नाही तर खुद्द आपले बाबाच करतील असा विचार बळावून व्यक्ति निष्क्रिय बनते.
बांबांनी वेळोवेळी ठरवून दिलेले साधना साहित्य त्यांच्या भांडारातूनच खरेदी करण्याची अलिखित सक्ती असते.
जपमाळा, बाबांच्या प्रतिमा, फोटो, नेमून दिलेले ग्रंथ-पोथ्या, बाबांच्या गौरवार्थ त्यांच्याच मठातून प्रकाशित होणारी मासिके, विशेषांक, कॅसेटस्, सीडीज, भिंतीवरची कॅलेंडर्स, बाबांची छबी असलेल्या अंगठ्या, ताईत, पदके, गळ्यातल्या माळा, वह्या,पेन इ.इ. भक्ताच्या माथी मारले जाते. ते साहित्य खरिदण्याशिवाय पर्याय नसतो.
बांबांचा जाहीर कार्यक्रम वा सत्संग वा दर्शन सोहळा जेथे असेल त्या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित रहावेच लागते.
अमूक रोगावर तमूक औषध म्हणून भांडारातून दिल्या जाणाऱ्‍या गोळ्या भलेही शेणा-मातीच्या असल्या तरी भक्त बाबांचे नाव घेऊन सेवन करतांना आढळतो.
बाबा म्हणतील ती पूर्वदिशा असते. का? कसे? असले फालतू प्रश्न विचारून त्यांना गोत्यात आणणाऱ्‍या भक्ताला जागीच ताकीद देण्याची तजवीज बांबांचे हस्तक करीत असतात.
सर्व भिस्त बाबांवर सोपवून निवांतपणे अध्यात्माच्या नावाखाली बाबांची व्यक्तिपूजा करण्याची सवय लागल्याने व्यक्ती वैचारिक, मानसिक, शारीरिकदृष्ट्या पंगु बनविली जाते.
बाबांचा अनुग्रह नामांकित व्यक्तींनी (उदा. नेते, अभिनेते, खेळाडू इ.) घ्यावा असे जाळे हस्तकांमार्फत पसरवले जाते. बाबांचे चरणस्पर्श करा तुम्हांला अपयश येणार नाही असे त्या वलयांकितांना पटवून दिले जाते आणि एकदा का अशी व्यkti बाबांकडे आली की प्रसारमाध्यमांना हाताशी धरून त्या बातमीचा उपयोग बाबांची प्रसिद्धी करण्यासाठीच केला जातो. बाबांकडे नक्कीच काहीतरी अद्भूत शक्ति असल्याशिवाय ती व्यक्ती अनुग्रह घेणार नाही अशी समाजमनाची ठाम समजूत होते आणि बाबांचा कळप वाढीस लागतो.
काही व्यक्तींच्या अगतिकतेचा, असहायतेचा गैरफायदा बुवाबाबांकडून घेतला जाऊन प्रसंगी संमोहन विद्या वापरून तिचा शारीरिक उपभोगसुद्धा घेतला जातो. बाबांना ईश्वरतुल्य मानले जात असल्याने अशी प्रकरणे मठाच्या शयनगृहातच दडपली जातात. फार क्वचितवेळा बाहेर पडणाऱ्‍या भानगडी म्हणजे हिमनगाचे टोक असते.
अशा अनेक प्रकाराने ही बाबागिरी,बुवाबाजी सामान्यजनांची लूट ठरते...
बाबांच्या भजनी लागले जाण्याची कारणे कोणती?
बहुदा ती मानसिक असतात. धावपळीच्या संघर्षमय जगात टिकून राहण्याचा तणाव प्रत्येकाच्या मनावर असतो. त्यातून उद्भवणाऱ्‍या चिंता, काळज्या, विवंचना ह्या मनोकायिक आजारांचे रूप घेऊन येतात. कितीही तपासण्या केल्या तरी शारीरिक आजार सापडत नाही. अशावेळी समुपदेशनाची गरज असते परंतु चांगले सांगणारा गोड बोलणारा कोणी भेटत नाही. पैशालाच सर्वस्व मानणाऱ्‍या या दुनियेत हितचिंतक, मित्र, स्नेही, नातलग भेटतील म्हणता भेटत नाहीत. त्रिकोणी कुटुंब व्यवस्थेमुळे म्हणा किंवा पैशापाठी धावून थकल्यामुळे म्हणा जोडीदारांमध्येही फारसा सुसंवाद होत नाही. परिणामी ताण तणाव वाढतात. मग व्यक्ति मनःशांतीच्या शोधात बाबांपर्यंत येऊन ठेपते. बाबांची अतिसमाधानी मुद्रा, तेजःपुंज चर्या, डोळ्यातील सुखाची शीतल चमक या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून विदीर्ण मनाच्या व्यक्तीला बाबांची ओढ लागते. बाबांचे मोहमयी दर्शन म्हणजे दुखऱ्‍या व्रणांवरचा लेप वाटतो. त्यांची मिठास वाणी व मधुर संभाषणाची नशा हवीहवीशी वाटू लागते आणि क्षणार्धात व्यक्ती बाबांची भक्त होते.
दडपणाखाली वावरणाऱ्‍या, न्यूनगंड असलेल्या किंवा पारतंत्र्य सोसणाऱ्‍या व्यक्तींना बाबांच्या सत्संग, प्रवचनांना जाणे म्हणजे स्वातंत्र्य उपभोगणे किंवा स्वतःला सिद्ध करून दाखवणे अशा प्रकारातले असते.
काहीजण खून, दरोडे, चोऱ्‍या, भ्रष्टाचार, व्यभिचार आदी पापांचे क्षालन बाबांच्या माध्यमातून होईल अशा हेतूने बाबांच्या भजनी लागतात.
या बुवाबाजीच्या अंधश्रद्धेला लगाम घालण्यासाठी प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवणे, हरेक घटनेच्या मुळाचा चौकस नजरेने शोध घेणे, स्वतःवर, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणे यासारखे उपाय अंगिकारता येतील.
- डॉ.श्रीराम दिवटे