Wednesday, February 5, 2014

बुवा तेथे बाया ! 

जिवंत हृदयाच्या शाबूत डोक्याच्या मित्र मैत्रिणींनो - 
मित्रांनो … आचार्य अत्रेंचे एक वाक्य अतिशय प्रसिद्ध आहे 'वृक्ष तेथे छाया बुवा तेथे बाया !' हे वाक्य ऐकल्यावर सुरुवातीस असे वाटायचे की अत्र्यांचा हा उगाचच केलेला आगावूपणा आहे. असतील काही बाबा, बुवा,बापू असे पण सगळेच असे नसावेत. पण ह्या वाक्याची सत्यता चळवळीच्या अनुषंगाने, डोळस अनुभवाने पटत गेली, दृढ होत गेली. 
(काही मोठ्या प्रमाणावर भांडाफोड प्रसारित झालेल्या उदा. सह मांडणी करण्याचा मी प्रयत्न करत आहे ) 

* विद्यानंद महाराज (वर्धा) - खरे तर विवेकानंदांचे तत्वज्ञान सांगणारे हे बाबा. या बाबाच्या नागोबा अंगात येत असे आणि 'विठुलाचा खेळ' नावाखाली हा बाबा स्त्रियांशी संबंध प्रस्तापित करत असे. या बाबाचे खरे नाव चंद्रशेखर जोशी. दहावी नापास असलेला हा माणूस अमेरिकेत (एम. डी. एफ. आर. सी. एस.) डॉक्टर होतो, पण साक्षात्कार झाल्याने पुंन्हा विदेशातील practice सोडून भारतात लोकांचे कल्याणाकरिता आलो असे सांगत असे. …।
मित्रांनो - माणूस कधीही श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये भेद करत नाही. कारण त्याला प्रत्यक्षामध्ये हा भेद करताच येत नाही. कारण श्रद्धेच्या बाबतीत चार इन्क्रिडीयंट सांगितले जातात.
(१) ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची त्याला सर्वश्रेष्ठ मानणे.।
(२) ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची त्याचे शब्दप्रामाण्य मानणे (शब्द प्रामाण्य म्हणजे शब्द हेच प्रमाण -उदा . - एखादा बाबा म्हणाला कि मी स्वर्गात जाउन आलो कि आपण त्यावर विश्वास ठेऊन बाबा स्वर्गात जाउन आले असे मानणे )
(३) ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची त्याच्यावर शंका न घेणे. 
(४) ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची त्या विषयी चिकित्सा न करणे. 
मित्रांनो असे चिकित्सा न करता तुंम्ही शब्दप्रामाण्य मानून व्यक्ती,वस्तू,ग्रंथ यावर श्रद्धा ठेवायला लागलात तर श्रद्धेचे रुपांतर अंधश्रद्धेत कधी होते ते लक्षात येत नाही. 
खरे तर समोरील माणसाला श्रद्धा बाळगणाऱ्या माणसातील अंधश्रद्धा दिसत असते. पण त्याला स्वत:ला तो शब्दप्रामाण्य मानत असल्यामुळे चिकित्सा करत नसल्याने ती अंधश्रद्धा वाटत नसते. त्यामुळे मित्रांनो श्रद्धा आणि अंधश्रद्धा एकच आहेत.
काही लोक म्हणतात डोळस श्रद्धा ठेवली पाहिजे, म्हणजेच बदलू शकेल अशी श्रद्धा - खर म्हणजे डोळस प्रकारची श्रद्धा असू शकत नाही - पण हेही खरे आहे की विश्वासाशिवाय माणसाला जगताच येणार नाही. - अनुभव बदलला कि विश्वास बदलतो पण या प्रक्रियेला श्रद्धा या प्रक्रियेत स्थान नाही. अनुभव बदलला कि विश्वास बदलू शकतो. त्याला कुणाचा विरोध असण्याचे कारणच नाही आणि म्हणून श्रद्धा या शब्दाविषयी आपण भांडत नाही. 
समाजामध्ये आपल्याला श्रद्धा या प्रक्रियेचा वापर करून माणसे मोठ्या प्रमाणावर इतरांना कशा प्रकारे लुबाडत असतात हे प्रकर्षाने दिसते. ।
मित्रांनो अंनिस च्या चळवळीने हजारो बाबा, बुवा, बापू, मांत्रिक यांची भांडाफोड केलेली आहे. या सर्व भांडाफोड झालेल्या प्रकरणांचा अभ्यास केल्यास असे कळते कि जो जो माणूस स्वत: स्वामी, बाबा म्हणवतो जो जो स्वत:मध्ये दैवी शक्ती आहे असा आभास निर्माण करतो तो तो प्रत्येक बाबा अनेक स्त्रियांचा वापर करीत असतो.
*मनमाड जवळील शुकादास बाबा : - स्वत:ला देव अवतार म्हणवणारा काही इयत्ता शिकलेला हा माणूस एका डॉक्टरकडे काम्पौडर होता. त्या अनुभवाच्या जोरावर हा लोकांना बाबागिरी सोबतच औषधाच्या प्रीक्सिप्षनही लिहून देत असे. पुरुषांची तपासणी दोन मिनिटात तर स्त्रियांसाठी लागणारा वेळ हा पाच मिनिटांपासून अर्धा पाउण तास इतका असे. एका जागरूक महिलेच्या तक्रारीवरून आपल्या कार्यकर्त्यांना या बाबाची भांडाफोड करण्यात यश मिळाले होते. तक्रारीनंतर कार्याकर्त्यांजवळ पिडीत महिलांची १००च्या पुढे लिस्ट गेली होती. त्यातील २० ते २५ महिला फोडण्यात समितिला यश आले. व अनेक पुरावे गोळा होऊ शकले. हा शुक्दासबाबा महिलांना एकांतात मी कृष्णाचा अवतार आहे आणि तू गेल्या जन्मीची माझी राधा किंवा आवडती गोपी आहेस, असे सांगून त्यांच्या मनातील गिल्ट (अपराधीपणाची भावना) काडून टाकत असे आणि त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करत असे. मित्रांनो या बाबाचा दरबार अनेक ठिकाणी लागत असे,यामुळे गोपिकांची संख्या देखील वाढली होती. त्यामुळे अनेक गोपिकांचे नंबर या बाबाकडे लागेनासे झाले. त्यातून त्यांची आपापसात कुरबुर वाढून मारामारीपर्यंत वेळ आली होती आणि याचा फायदा चळवळीला झाला समिती त्यांना फोडू शकली आणि मोठ्या प्रमाणावर शुकदासबाबाची भांडाफोड शक्य झाली. 
*गुलाबबाबा (काटेल - वर्धा) - मित्रांनो हा हि कृष्णावतार … हा बाबा अनेक मुलींना माय संबोधून त्यांच्याशी लहान बाळाप्रमाणे वर्तन करीत असे पुढे संबध प्रस्तापित करीत असे. - ह्याही बाबाला मोठ्या प्रमाणावर एक्स्पोज करण्यात कार्यकर्त्याना यश आले होते. 
मित्रांनो ज्या ज्या बाबा/बुवांना चळवळीने एक्स्पोज केले होते त्यातील अधिकाधिक बाबा श्रीकृष्ण नावाच्या देवाचा अतिशय वाईट पद्धतीने वापर करून घेत होते. ते सर्व केंव्हा ना केंव्हा आपल्या भक्तांना मी कृष्णावतार आहे आणि तू गोपी किंवा माझी आवडती राधा आहेस असे सांगून त्यांचा वापर सातत्याने करून घेतांना पुढे आले आहे. हे सर्व बाबापर्यंत मर्यादित नसून मांत्रिक, भगत, दीर्घकाळ जोतिशाचा धंदा करणारे लोक थोड्याफार वेगळ्या प्रमाणात हेच करतात हे लक्षात आले. 
*विधार्भातील सुंदरदास महाराज :- रामास्नेही पंथातील कोट्यावधी संपत्ती असलेल्या समाजातील हा महाराज - याच्याविरोधात अकोला,अमरावतीतील अनेक तरून मंडळी उभी ठाकली होती, परंतु त्यांना फारसे यश न आल्याने या मंडळींनी चळवळीची मदत घेवून या महाराजाला मोठ्या प्रमाणावर एक्स्पोज केले. या बाबाचे भक्त एव्हढे अंधश्रद्धाळू होते की आपल्या नव्या सुनेला देखील पहिल्या रात्रीकरीता सुंदरदासाकडे पाठवत असत. आणि त्याचा अभिमानही बाळगत असत. त्यांची श्रद्धा अशी होती कि त्याने सांगितल्याप्रमाणे हा बाबा दहाव्या मार्गातून मोक्ष मिळवून देतो. याला एक्स्पोज केल्यानंतर रामस्नेही पंथातील साधूंच्या मंडळासमोर या सुंदरदासाला विचारणा करण्यात आल्यावर त्याने अगदी छातीठोकपणे सांगितले की मी जो मार्ग सांगत आहे तोच खरा धार्मिक मार्ग आहे. कारण हा पंथ व्यापाऱ्यांचा आहे. या पंथातील पुरुषांना आपल्या स्त्रियांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो मग या स्त्रिया नोकरांशी संबंध ठेवतात त्यातून वर्णसंकर होतो त्यामुळे धर्माचे प्रचंड नुकसान होते. मी मात्र संबंध निर्माण करून त्या स्त्रियांना शपथ घालतो कि माझ्याशिवाय व तुझ्या नवऱ्याशीवाय कोणाशीही संबध ठेवायचे नाहीत व त्या स्त्रिया माझा शब्द कधीही तोडत नाहीत. त्यामुळे खऱ्या अर्थाने मी धर्म बचावाचे काम करतो आहे, वर्णव्यवस्था टिकविण्याचे काम करतो आहे.असा दावा सुंदरदासने त्या ठिकाणी केला. आणि कालांतराने दडपशाहीच्या जोरावर स्वत: त्या पंथाचा चीफ होऊन बसला. 
*कृपाळू महाराज :- याला अनाघ्रात स्त्री लागत असे आणि याचे अंधभक्त ते सर्व पुरवित असत. - भारतीय कायद्यानुसार वय १८ वर्षे वयाखालील मुलीवर असा प्रसंग झाल्यास तो बलात्कार ठरतो. -- ह्या संदर्भातील केस दाखल करून बरेच वर्ष हा बाबा नागपूर कोर्टाच्या वाऱ्या करत होता.
** मित्रांनो असं का घडत ? ज्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात चारित्र्याचे स्तोम माजवले जाते, प्रत्येक स्त्रीने, मुलीने चारित्र्य संपन्न असावे असे मानले जाते. पुरुषांना थोड्या प्रमाणात सूट दिली जाते. पण स्त्रयांच्या मुलींच्या बाबतीत आग्रह कायम असतो. पुरुषाने काही प्रामाणात लग्नाआधी भानगडी केलेल्या चालतात. पण स्त्रीच्या बाबतीत खपवून घेतले जात नाही. प्रत्येक नवऱ्याला आपली पत्नी अनाघ्रात हवी असते. एव्हढेच नव्हे तर एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीची छेद काढली किंवा tonting केले तर बदडून अगदी गाढवावरून धिंड काढणे, हातपाय तोडण्यापर्यंत मजल जाते. त्या समाजात हे बाबालोक एव्हड्या मोठ्या प्रमाणावर कसे काय संबंध प्रस्थापित करू शकतात. ??? 

स्त्री-पुरुषांनी आयुष्यभर प्रामाणिक असावं केवळ विवाह या पद्धतीमध्येच या पद्धतीचे शरीरसंबंध निर्माण व्हावे वैवाहिक जीवनाबाहेर कधीही होऊ नयेत हि एक आदर्श कल्पना आपण आपल्या समाजामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला हि कल्पना समाजामध्ये राबवत असतांना पुरुषसत्ताक पद्धती असल्याने पुरुषांनी स्वत:ला मात्र स्वातंत्र्य खेचून घेतले व कायम ठेवले. त्यांना आपले स्वातंत्र्य राबवायचे असेल आणि स्त्रियांनी पूर्णपणे चारित्र्याची संकल्पना आमलात आणायची असेल तर स्वाभाविकच अशा स्त्रीया समाजामध्ये निर्माण झाल्या पाहिजेत कि ज्या चारित्र्य बाळगणार नाहीत. त्यांच्यावर चारित्र्याचे बंधन असणार नाही. यातूनच वेश्याव्यवसाय यंत्रणेला सुरुवात झाली. आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर वेश्याव्यवसाय समाजामध्ये निर्माण झाला. हि जी दुहेरी नितीमत्ता आहे की स्त्रियांना वेगळी मोरलीटी आणि पुरुषांना मात्र त्या मोरालिटीमध्ये थोडी लवचिकता, यातून जशी स्त्री वेश्यांची निर्मिती घडते आणि ती समाजामध्ये अपरिहार्य ठरते त्याच पद्धतीने पुरुषवेश्यांची निर्मिती सुद्धा अपरिहार्य ठरते. कारण - लग्नसंस्थेतून हे प्रश्न सुटतातच असे नाही. एक तर भारतीय १००% पुरुषांना शरीरसंबंधातील ज्ञान असतेच असे नाही. अनेकांना असे वाटते की मुल होणे म्हणजे आपल्याला या संबंधी परिपूर्ण ज्ञान आहे. 
बाबा /बुवा यांच्याशी एंटेन्गल झालेल्या स्त्रीयांशी संवाद साधल्यावर त्या म्हणाल्या हे बाबा महाराज या बाबतीत खूपच प्रवीण असतात. आमची फसगत झाली पण त्यावेळी आम्ही परमानंदात होतो. मित्रांनो याचा नेमका अर्थ लक्षात घेतला पाहिजे. - 
भारतीय समाजामध्ये स्त्रियांना एका बाजूने सेक्सबद्धल चुकीच्या संकल्पना सांगितल्या जातात. त्याना हे सुद्धा सांगितल जात की सेक्समध्ये रुची वाटता कामा नये. बाईला केवळ प्रेमामध्येच रुची वाटायला हवी. थोडक्यात एक फ्रीजीडीटी निर्माण होईल कमी लैंगिक इच्छा निर्माण होईल या पद्धतीचा संस्कार स्त्रियांवर असतो. पुरुषसुद्धा कमी लैंगिक इच्छेची धारणा कमी करण्याचा प्रयत्न करत नाही. स्वसमाधान पुरेसे मानतात. त्यातून सेक्ससंबंधी आवड निर्माण होण्याऐवजी कंटाळवाणा प्रकार या पद्धतीने पहाण्याचा कल स्त्रियांमध्ये वाढत जातो. या पद्धतीच्या स्त्रिया देवा धर्माच्या जास्त नादाला लागलेल्या दिसतात कारण मनामध्ये साचून राहिलेली भावना देवाधार्मासाराख्या क्रियांमधून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. भजन-कीर्तन करतात. देवाच्या आहारी जाण्याचा प्रयत्न करतात. आणि या पद्धतीच्या स्त्रिया देवाचा अवतार असलेल्या बुवांकडे अधिक मोठ्या संखेने खेचल्या जातात.
सर्वात पाहिलं काम बुवा कोणत करत असेल तर या स्त्रियांच्या मनातील गिल्ट कॉम्प्लेक्स काढून टाकतो. बुवा बाबांना हे सांगण्याची खर म्हणजे गरज नाही कि मी कृष्णावतार आहे व तू गोपी आहेस कारण - भारतीय समाजात स्त्रीला सहजपणे ज्याच्यापर्यंत पोहचता येते ते म्हणजे बाबा, बुवा, मांत्रिक,ज्योतीशी हे आहे. डॉक्टरकडे सुद्धा तिला सहजतेने जाता येत नाही. एखादा पुरुष डॉक्टर एखाद्या स्त्रीला जास्त वेळ आतमध्ये तपासत असेल तर बाहेर बसलेला पुरुष अस्वस्थ होतो. किंवा नातेवाइक अस्वस्थ होतात. पण बाबा, बुवांकडे तासंतास आहे तर यामध्ये पवित्रता आहे. यामध्ये देवाचं काहीतरी आहे. म्हणून माणसं नेहमी खुश होतांना दिसतात की माझी बायको फार मोठी धार्मिक आहे, ती बाबांची फार मोठी भक्त आहे. त्यामुळे स्त्रीला पुरूषांजवळ जाण्याची उत्तम संधी मिळत असेल तर ती असल्या बाबा,बुवा, मांत्रिक, ज्योतिषी या पद्धतीच्या पुरुशांजवळ जाण्याची त्यामुळे स्वाभाविकच यामार्गातून त्यांना रिलेशन निर्माण करता येतात. यामध्ये हे बाबालोक स्त्रियांच्या मनातील गिल्ट कॉम्प्लेक्स काढून टाकतात, राधाकृष्ण यासारखे संबंध जोडून यामागे वावगे काही नाही, हीच देवाची दिशा आहे, या संबंधातून केवळ तुझाच नव्हे तर तुझ्या कुटुंबाला सुद्धा मोक्ष मिळणार आहे असं सुंदरदास सारखा बाबा पटवून देण्यात यशस्वी होत असतो. एखादा मांत्रिक घरातील उद्भवलेल्या अडचणीपासून सुटका मिळण्यासाठी स्त्रीला आपल्याशी संबंध ठेवण्यास भाग पडतो. या प्रमाणे तांत्रिक कल्पनांच्या नावाखाली देवाच्या अवताराच्या नावाखाली किंवा गेल्या जन्मी तू कोणीतरी मी कोणीतरी होतो म्हणून याही जन्मी हरकत नाही, या पद्धतीची खेळी वापरून स्त्रियांच्या मनातील अपराधीपणाची भावना काढून टाकतात. या पद्धतीचा पुण्यामधील काही वर्षांपूर्वी मिसर नावाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी वाघमारेबाबा बाबत सखोल चौकशी करून वाघमारेबाबा प्रकरण बाहेर काढले होते.
मित्रांनो असे बाबा स्त्रियांच्या बाबतीत वीरपुरुष सिद्धपुरुष ठरतो. त्यानंतर ती स्त्री सातत्याने त्यात अडकत जाते. मित्रांनो वाईट भाग हा आहे कि हे सगळ धर्म आणि श्रद्धा या क्षेत्रातील प्रकरण असल्याने ती स्त्री बाबा बुवांच्या आहारी जाते त्याचे शब्द प्रमाण मानते व त्यानुसार अख्ख कुटुंबच बसायला, उठायला, नाचायला लागत हि वस्तुस्थिती फार विदारक आहे. 
पुरुषांना जशा वेगवेळ्या चवी हव्या असतात त्यासाठी वेश्याव्यवसायाची गरज पुरुष समाजाला असते. तीच निकड कुठे न कुठे स्त्रियांबाबत असते. तिला ही अस वाटू शकत कि आपले संबंध दुसऱ्या कुणाशी असले तर बरे होईल पण धर्माच्या पागाड्यामुळे , नैतिक कल्पनांमुळे, सामाजिक प्रशिक्षणामुळे ती यासाठी कधीच धजावत नाही. पण ज्यावेळेस हे बाबालोक ज्यावेळेस संधी उपलब्ध करून देतात त्यावेळेस या स्त्रिया या करिता तयार व्हायला ह्या एका मानसिक नैसर्गिक प्रवृत्तीमुळे तयार होत असतात अस वाटण्यासारखी परिस्थिती आहे. 
या वरून हे बाबा, मांत्रिक, भगत, दैवी शक्ती अंगात आणणारे लोक कळत नकळत पुरुष किंवा स्त्री वेश्या आहेत या निश्कर्षापर्यंत सहज जाता येत.
बुवा तेथे बाया ! जिवंत हृदयाच्या शाबूत डोक्याच्या मित्र मैत्रिणींनो - मित्रांनो … आचार्य अत्रेंचे एक वाक्य अतिशय प्रसिद्ध आहे 'वृक्ष तेथे छाया बुवा तेथे बाया !' हे वाक्य ऐकल्यावर सुरुवातीस असे वाटायचे की अत्र्यांचा हा उगाचच केलेला आगावूपणा आहे. असतील काही बाबा, बुवा,बापू असे पण सगळेच असे नसावेत. पण ह्या वाक्याची सत्यता चळवळीच्या अनुषंगाने, डोळस अनुभवाने पटत गेली, दृढ होत गेली. (काही मोठ्या प्रमाणावर भांडाफोड प्रसारित झालेल्या उदा. सह मांडणी करण्याचा मी प्रयत्न करत आहे ) * विद्यानंद महाराज (वर्धा) - खरे तर विवेकानंदांचे तत्वज्ञान सांगणारे हे बाबा. या बाबाच्या नागोबा अंगात येत असे आणि 'विठुलाचा खेळ' नावाखाली हा बाबा स्त्रियांशी संबंध प्रस्तापित करत असे. या बाबाचे खरे नाव चंद्रशेखर जोशी. दहावी नापास असलेला हा माणूस अमेरिकेत (एम. डी. एफ. आर. सी. एस.) डॉक्टर होतो, पण साक्षात्कार झाल्याने पुंन्हा विदेशातील practice सोडून भारतात लोकांचे कल्याणाकरिता आलो असे सांगत असे. …। मित्रांनो - माणूस कधीही श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये भेद करत नाही. कारण त्याला प्रत्यक्षामध्ये हा भेद करताच येत नाही. कारण श्रद्धेच्या बाबतीत चार इन्क्रिडीयंट सांगितले जातात. (१) ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची त्याला सर्वश्रेष्ठ मानणे.। (२) ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची त्याचे शब्दप्रामाण्य मानणे (शब्द प्रामाण्य म्हणजे शब्द हेच प्रमाण -उदा . - एखादा बाबा म्हणाला कि मी स्वर्गात जाउन आलो कि आपण त्यावर विश्वास ठेऊन बाबा स्वर्गात जाउन आले असे मानणे ) (३) ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची त्याच्यावर शंका न घेणे. (४) ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची त्या विषयी चिकित्सा न करणे. मित्रांनो असे चिकित्सा न करता तुंम्ही शब्दप्रामाण्य मानून व्यक्ती,वस्तू,ग्रंथ यावर श्रद्धा ठेवायला लागलात तर श्रद्धेचे रुपांतर अंधश्रद्धेत कधी होते ते लक्षात येत नाही. खरे तर समोरील माणसाला श्रद्धा बाळगणाऱ्या माणसातील अंधश्रद्धा दिसत असते. पण त्याला स्वत:ला तो शब्दप्रामाण्य मानत असल्यामुळे चिकित्सा करत नसल्याने ती अंधश्रद्धा वाटत नसते. त्यामुळे मित्रांनो श्रद्धा आणि अंधश्रद्धा एकच आहेत. काही लोक म्हणतात डोळस श्रद्धा ठेवली पाहिजे, म्हणजेच बदलू शकेल अशी श्रद्धा - खर म्हणजे डोळस प्रकारची श्रद्धा असू शकत नाही - पण हेही खरे आहे की विश्वासाशिवाय माणसाला जगताच येणार नाही. - अनुभव बदलला कि विश्वास बदलतो पण या प्रक्रियेला श्रद्धा या प्रक्रियेत स्थान नाही. अनुभव बदलला कि विश्वास बदलू शकतो. त्याला कुणाचा विरोध असण्याचे कारणच नाही आणि म्हणून श्रद्धा या शब्दाविषयी आपण भांडत नाही. समाजामध्ये आपल्याला श्रद्धा या प्रक्रियेचा वापर करून माणसे मोठ्या प्रमाणावर इतरांना कशा प्रकारे लुबाडत असतात हे प्रकर्षाने दिसते. । मित्रांनो अंनिस च्या चळवळीने हजारो बाबा, बुवा, बापू, मांत्रिक यांची भांडाफोड केलेली आहे. या सर्व भांडाफोड झालेल्या प्रकरणांचा अभ्यास केल्यास असे कळते कि जो जो माणूस स्वत: स्वामी, बाबा म्हणवतो जो जो स्वत:मध्ये दैवी शक्ती आहे असा आभास निर्माण करतो तो तो प्रत्येक बाबा अनेक स्त्रियांचा वापर करीत असतो. *मनमाड जवळील शुकादास बाबा : - स्वत:ला देव अवतार म्हणवणारा काही इयत्ता शिकलेला हा माणूस एका डॉक्टरकडे काम्पौडर होता. त्या अनुभवाच्या जोरावर हा लोकांना बाबागिरी सोबतच औषधाच्या प्रीक्सिप्षनही लिहून देत असे. पुरुषांची तपासणी दोन मिनिटात तर स्त्रियांसाठी लागणारा वेळ हा पाच मिनिटांपासून अर्धा पाउण तास इतका असे. एका जागरूक महिलेच्या तक्रारीवरून आपल्या कार्यकर्त्यांना या बाबाची भांडाफोड करण्यात यश मिळाले होते. तक्रारीनंतर कार्याकर्त्यांजवळ पिडीत महिलांची १००च्या पुढे लिस्ट गेली होती. त्यातील २० ते २५ महिला फोडण्यात समितिला यश आले. व अनेक पुरावे गोळा होऊ शकले. हा शुक्दासबाबा महिलांना एकांतात मी कृष्णाचा अवतार आहे आणि तू गेल्या जन्मीची माझी राधा किंवा आवडती गोपी आहेस, असे सांगून त्यांच्या मनातील गिल्ट (अपराधीपणाची भावना) काडून टाकत असे आणि त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करत असे. मित्रांनो या बाबाचा दरबार अनेक ठिकाणी लागत असे,यामुळे गोपिकांची संख्या देखील वाढली होती. त्यामुळे अनेक गोपिकांचे नंबर या बाबाकडे लागेनासे झाले. त्यातून त्यांची आपापसात कुरबुर वाढून मारामारीपर्यंत वेळ आली होती आणि याचा फायदा चळवळीला झाला समिती त्यांना फोडू शकली आणि मोठ्या प्रमाणावर शुकदासबाबाची भांडाफोड शक्य झाली. *गुलाबबाबा (काटेल - वर्धा) - मित्रांनो हा हि कृष्णावतार … हा बाबा अनेक मुलींना माय संबोधून त्यांच्याशी लहान बाळाप्रमाणे वर्तन करीत असे पुढे संबध प्रस्तापित करीत असे. - ह्याही बाबाला मोठ्या प्रमाणावर एक्स्पोज करण्यात कार्यकर्त्याना यश आले होते. मित्रांनो ज्या ज्या बाबा/बुवांना चळवळीने एक्स्पोज केले होते त्यातील अधिकाधिक बाबा श्रीकृष्ण नावाच्या देवाचा अतिशय वाईट पद्धतीने वापर करून घेत होते. ते सर्व केंव्हा ना केंव्हा आपल्या भक्तांना मी कृष्णावतार आहे आणि तू गोपी किंवा माझी आवडती राधा आहेस असे सांगून त्यांचा वापर सातत्याने करून घेतांना पुढे आले आहे. हे सर्व बाबापर्यंत मर्यादित नसून मांत्रिक, भगत, दीर्घकाळ जोतिशाचा धंदा करणारे लोक थोड्याफार वेगळ्या प्रमाणात हेच करतात हे लक्षात आले. *विधार्भातील सुंदरदास महाराज :- रामास्नेही पंथातील कोट्यावधी संपत्ती असलेल्या समाजातील हा महाराज - याच्याविरोधात अकोला,अमरावतीतील अनेक तरून मंडळी उभी ठाकली होती, परंतु त्यांना फारसे यश न आल्याने या मंडळींनी चळवळीची मदत घेवून या महाराजाला मोठ्या प्रमाणावर एक्स्पोज केले. या बाबाचे भक्त एव्हढे अंधश्रद्धाळू होते की आपल्या नव्या सुनेला देखील पहिल्या रात्रीकरीता सुंदरदासाकडे पाठवत असत. आणि त्याचा अभिमानही बाळगत असत. त्यांची श्रद्धा अशी होती कि त्याने सांगितल्याप्रमाणे हा बाबा दहाव्या मार्गातून मोक्ष मिळवून देतो. याला एक्स्पोज केल्यानंतर रामस्नेही पंथातील साधूंच्या मंडळासमोर या सुंदरदासाला विचारणा करण्यात आल्यावर त्याने अगदी छातीठोकपणे सांगितले की मी जो मार्ग सांगत आहे तोच खरा धार्मिक मार्ग आहे. कारण हा पंथ व्यापाऱ्यांचा आहे. या पंथातील पुरुषांना आपल्या स्त्रियांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो मग या स्त्रिया नोकरांशी संबंध ठेवतात त्यातून वर्णसंकर होतो त्यामुळे धर्माचे प्रचंड नुकसान होते. मी मात्र संबंध निर्माण करून त्या स्त्रियांना शपथ घालतो कि माझ्याशिवाय व तुझ्या नवऱ्याशीवाय कोणाशीही संबध ठेवायचे नाहीत व त्या स्त्रिया माझा शब्द कधीही तोडत नाहीत. त्यामुळे खऱ्या अर्थाने मी धर्म बचावाचे काम करतो आहे, वर्णव्यवस्था टिकविण्याचे काम करतो आहे.असा दावा सुंदरदासने त्या ठिकाणी केला. आणि कालांतराने दडपशाहीच्या जोरावर स्वत: त्या पंथाचा चीफ होऊन बसला. *कृपाळू महाराज :- याला अनाघ्रात स्त्री लागत असे आणि याचे अंधभक्त ते सर्व पुरवित असत. - भारतीय कायद्यानुसार वय १८ वर्षे वयाखालील मुलीवर असा प्रसंग झाल्यास तो बलात्कार ठरतो. -- ह्या संदर्भातील केस दाखल करून बरेच वर्ष हा बाबा नागपूर कोर्टाच्या वाऱ्या करत होता. ** मित्रांनो असं का घडत ? ज्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात चारित्र्याचे स्तोम माजवले जाते, प्रत्येक स्त्रीने, मुलीने चारित्र्य संपन्न असावे असे मानले जाते. पुरुषांना थोड्या प्रमाणात सूट दिली जाते. पण स्त्रयांच्या मुलींच्या बाबतीत आग्रह कायम असतो. पुरुषाने काही प्रामाणात लग्नाआधी भानगडी केलेल्या चालतात. पण स्त्रीच्या बाबतीत खपवून घेतले जात नाही. प्रत्येक नवऱ्याला आपली पत्नी अनाघ्रात हवी असते. एव्हढेच नव्हे तर एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीची छेद काढली किंवा tonting केले तर बदडून अगदी गाढवावरून धिंड काढणे, हातपाय तोडण्यापर्यंत मजल जाते. त्या समाजात हे बाबालोक एव्हड्या मोठ्या प्रमाणावर कसे काय संबंध प्रस्थापित करू शकतात. ??? स्त्री-पुरुषांनी आयुष्यभर प्रामाणिक असावं केवळ विवाह या पद्धतीमध्येच या पद्धतीचे शरीरसंबंध निर्माण व्हावे वैवाहिक जीवनाबाहेर कधीही होऊ नयेत हि एक आदर्श कल्पना आपण आपल्या समाजामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला हि कल्पना समाजामध्ये राबवत असतांना पुरुषसत्ताक पद्धती असल्याने पुरुषांनी स्वत:ला मात्र स्वातंत्र्य खेचून घेतले व कायम ठेवले. त्यांना आपले स्वातंत्र्य राबवायचे असेल आणि स्त्रियांनी पूर्णपणे चारित्र्याची संकल्पना आमलात आणायची असेल तर स्वाभाविकच अशा स्त्रीया समाजामध्ये निर्माण झाल्या पाहिजेत कि ज्या चारित्र्य बाळगणार नाहीत. त्यांच्यावर चारित्र्याचे बंधन असणार नाही. यातूनच वेश्याव्यवसाय यंत्रणेला सुरुवात झाली. आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर वेश्याव्यवसाय समाजामध्ये निर्माण झाला. हि जी दुहेरी नितीमत्ता आहे की स्त्रियांना वेगळी मोरलीटी आणि पुरुषांना मात्र त्या मोरालिटीमध्ये थोडी लवचिकता, यातून जशी स्त्री वेश्यांची निर्मिती घडते आणि ती समाजामध्ये अपरिहार्य ठरते त्याच पद्धतीने पुरुषवेश्यांची निर्मिती सुद्धा अपरिहार्य ठरते. कारण - लग्नसंस्थेतून हे प्रश्न सुटतातच असे नाही. एक तर भारतीय १००% पुरुषांना शरीरसंबंधातील ज्ञान असतेच असे नाही. अनेकांना असे वाटते की मुल होणे म्हणजे आपल्याला या संबंधी परिपूर्ण ज्ञान आहे. बाबा /बुवा यांच्याशी एंटेन्गल झालेल्या स्त्रीयांशी संवाद साधल्यावर त्या म्हणाल्या हे बाबा महाराज या बाबतीत खूपच प्रवीण असतात. आमची फसगत झाली पण त्यावेळी आम्ही परमानंदात होतो. मित्रांनो याचा नेमका अर्थ लक्षात घेतला पाहिजे. - भारतीय समाजामध्ये स्त्रियांना एका बाजूने सेक्सबद्धल चुकीच्या संकल्पना सांगितल्या जातात. त्याना हे सुद्धा सांगितल जात की सेक्समध्ये रुची वाटता कामा नये. बाईला केवळ प्रेमामध्येच रुची वाटायला हवी. थोडक्यात एक फ्रीजीडीटी निर्माण होईल कमी लैंगिक इच्छा निर्माण होईल या पद्धतीचा संस्कार स्त्रियांवर असतो. पुरुषसुद्धा कमी लैंगिक इच्छेची धारणा कमी करण्याचा प्रयत्न करत नाही. स्वसमाधान पुरेसे मानतात. त्यातून सेक्ससंबंधी आवड निर्माण होण्याऐवजी कंटाळवाणा प्रकार या पद्धतीने पहाण्याचा कल स्त्रियांमध्ये वाढत जातो. या पद्धतीच्या स्त्रिया देवा धर्माच्या जास्त नादाला लागलेल्या दिसतात कारण मनामध्ये साचून राहिलेली भावना देवाधार्मासाराख्या क्रियांमधून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. भजन-कीर्तन करतात. देवाच्या आहारी जाण्याचा प्रयत्न करतात. आणि या पद्धतीच्या स्त्रिया देवाचा अवतार असलेल्या बुवांकडे अधिक मोठ्या संखेने खेचल्या जातात. सर्वात पाहिलं काम बुवा कोणत करत असेल तर या स्त्रियांच्या मनातील गिल्ट कॉम्प्लेक्स काढून टाकतो. बुवा बाबांना हे सांगण्याची खर म्हणजे गरज नाही कि मी कृष्णावतार आहे व तू गोपी आहेस कारण - भारतीय समाजात स्त्रीला सहजपणे ज्याच्यापर्यंत पोहचता येते ते म्हणजे बाबा, बुवा, मांत्रिक,ज्योतीशी हे आहे. डॉक्टरकडे सुद्धा तिला सहजतेने जाता येत नाही. एखादा पुरुष डॉक्टर एखाद्या स्त्रीला जास्त वेळ आतमध्ये तपासत असेल तर बाहेर बसलेला पुरुष अस्वस्थ होतो. किंवा नातेवाइक अस्वस्थ होतात. पण बाबा, बुवांकडे तासंतास आहे तर यामध्ये पवित्रता आहे. यामध्ये देवाचं काहीतरी आहे. म्हणून माणसं नेहमी खुश होतांना दिसतात की माझी बायको फार मोठी धार्मिक आहे, ती बाबांची फार मोठी भक्त आहे. त्यामुळे स्त्रीला पुरूषांजवळ जाण्याची उत्तम संधी मिळत असेल तर ती असल्या बाबा,बुवा, मांत्रिक, ज्योतिषी या पद्धतीच्या पुरुशांजवळ जाण्याची त्यामुळे स्वाभाविकच यामार्गातून त्यांना रिलेशन निर्माण करता येतात. यामध्ये हे बाबालोक स्त्रियांच्या मनातील गिल्ट कॉम्प्लेक्स काढून टाकतात, राधाकृष्ण यासारखे संबंध जोडून यामागे वावगे काही नाही, हीच देवाची दिशा आहे, या संबंधातून केवळ तुझाच नव्हे तर तुझ्या कुटुंबाला सुद्धा मोक्ष मिळणार आहे असं सुंदरदास सारखा बाबा पटवून देण्यात यशस्वी होत असतो. एखादा मांत्रिक घरातील उद्भवलेल्या अडचणीपासून सुटका मिळण्यासाठी स्त्रीला आपल्याशी संबंध ठेवण्यास भाग पडतो. या प्रमाणे तांत्रिक कल्पनांच्या नावाखाली देवाच्या अवताराच्या नावाखाली किंवा गेल्या जन्मी तू कोणीतरी मी कोणीतरी होतो म्हणून याही जन्मी हरकत नाही, या पद्धतीची खेळी वापरून स्त्रियांच्या मनातील अपराधीपणाची भावना काढून टाकतात. या पद्धतीचा पुण्यामधील काही वर्षांपूर्वी मिसर नावाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी वाघमारेबाबा बाबत सखोल चौकशी करून वाघमारेबाबा प्रकरण बाहेर काढले होते. मित्रांनो असे बाबा स्त्रियांच्या बाबतीत वीरपुरुष सिद्धपुरुष ठरतो. त्यानंतर ती स्त्री सातत्याने त्यात अडकत जाते. मित्रांनो वाईट भाग हा आहे कि हे सगळ धर्म आणि श्रद्धा या क्षेत्रातील प्रकरण असल्याने ती स्त्री बाबा बुवांच्या आहारी जाते त्याचे शब्द प्रमाण मानते व त्यानुसार अख्ख कुटुंबच बसायला, उठायला, नाचायला लागत हि वस्तुस्थिती फार विदारक आहे. पुरुषांना जशा वेगवेळ्या चवी हव्या असतात त्यासाठी वेश्याव्यवसायाची गरज पुरुष समाजाला असते. तीच निकड कुठे न कुठे स्त्रियांबाबत असते. तिला ही अस वाटू शकत कि आपले संबंध दुसऱ्या कुणाशी असले तर बरे होईल पण धर्माच्या पागाड्यामुळे , नैतिक कल्पनांमुळे, सामाजिक प्रशिक्षणामुळे ती यासाठी कधीच धजावत नाही. पण ज्यावेळेस हे बाबालोक ज्यावेळेस संधी उपलब्ध करून देतात त्यावेळेस या स्त्रिया या करिता तयार व्हायला ह्या एका मानसिक नैसर्गिक प्रवृत्तीमुळे तयार होत असतात अस वाटण्यासारखी परिस्थिती आहे. या वरून हे बाबा, मांत्रिक, भगत, दैवी शक्ती अंगात आणणारे लोक कळत नकळत पुरुष किंवा स्त्री वेश्या आहेत या निश्कर्षापर्यंत सहज जाता येत.

No comments:

Post a Comment