Wednesday, October 29, 2014

पोप यांचा साक्षात्कार

देवाच्या हातात काही जादूची छडी नाही, हे पोप फ्रान्सिस यांचे उद्गार क्रांतिकारी असेच म्हणावे लागतील. कारण धर्म कोणताही असो, त्यात देव म्हणजे जणू कोणी जादूगार आहे याच दृष्टिकोनातून पाहिले जात असते. आकाशात कोठे तरी तो बसलेला असतो आणि तेथून सर्व विश्वाची सूत्रे हलवीत असतो, अशी ती कल्पना. प्रार्थना करून, नवस वगैरे बोलून त्याला प्रसन्न करून घेणे हे त्याच कल्पनेचे व्यावहरिक रूप. त्याला श्रद्धा म्हणा वा अंधश्रद्धा. अर्थ एकच. त्या अर्थाला कोणा नास्तिकाने आव्हान दिले तर त्यात विशेष काहीही नाही. त्याने धार्मिकांच्या एकूण जीवनव्यवहारावर तसूभरही परिणाम होत नाही. कॅथलिक ख्रिश्चनांच्या मुख्य धर्मगुरूने, पोप फ्रान्सिस यांनीच देवाच्या या लोकप्रिय भूमिकेतील हवा काढून घेणे ही मात्र निश्चितच एक मोठी घटना आहे. आज सर्वच धर्म किरटय़ा एकारलेपणाकडे वाटचाल करीत असल्याचे दिसत आहे. या पाश्र्वभूमीवर तर पोप यांची अशी भूमिका फारच महत्त्वाची ठरते. पाँटिफिकल अकॅडमी ऑफ सायन्सेस येथे केलेल्या भाषणात पोप यांनी हे वक्तव्य केले. पण एवढय़ावरच ते थांबले नाहीत. विश्वाच्या उत्पत्तीचा महाविस्फोट सिद्धान्त तसेच डार्विनप्रणीत उत्क्रांतिवाद यांतही तथ्य असल्याचे त्यांनी मान्य केले. ही गोष्टही तितकीच महत्त्वाची आहे. केवळ ख्रिश्चन धर्मातीलच नव्हे, तर सर्वच धर्मातील विश्वोत्पत्तीच्या मूलभूत सिद्धान्तांना किंचित का होईना, पण छेद देणारी अशी ही गोष्ट पोप सांगत आहेत म्हटल्यानंतर त्याचे महत्त्व ध्यानी यावे.
सर्वच मानव समाजांसमोर आणि म्हणून सर्वच धर्मासमोर 'हे सारे कोठून येते' हा एक महत्त्वाचा सवाल राहिलेला आहे. या प्रश्नाच्या उत्तराकडे जाण्याचे दोन मार्ग आहेत. एक धार्मिक तत्त्वज्ञानाचा. दुसरा विज्ञानाचा. धर्मानुसार हे जग, पंचमहाभूते, अवघी सजीव-निर्जीव सृष्टी यांच्या निर्मितीचे श्रेय हे परमेश्वराचे. शिवाय पुन्हा तोच जगन्नियंता. या विश्वाचे यंत्र चालविणारा. विज्ञानाला अर्थातच हे मान्य असण्याचे कारण नाही. विज्ञानानुसार एका महास्फोटातून या विश्वाची निर्मिती झाली. अशी असंख्य विश्वे अवकाशाच्या पोकळीत आहेत. ती सतत प्रसरण पावत आहेत. आता ही अवकाशाची पोकळी कोठून आली. पुन्हा ती आहे तर कशात आहे असे अनेक प्रश्न आहेत. विज्ञान सांगते- माहीत नाही. तीच गोष्ट सजीव सृष्टीची. कोणी केले या सृष्टीचे सर्जन? विज्ञान सांगते, धर्माने त्याला आकाशातला बाप वा खुदा वा ब्रह्मा असे काहीही म्हणू दे; सृष्टीचे असे जनकत्व कोणाकडे नसते. कारण मुळात पृथ्वीवर आधी काहीही नव्हते आणि एका रात्रीत येथे सारे आले असे झालेले नाही. जे काही घडले ते जैवरासायनिक प्रक्रियेतून आणि पुढे उत्क्रांतीतून. ती प्रक्रिया आजही सुरू आहे. नव्या जीवजाती जन्माला येतात. काही नामशेष होतात. जुन्या जीवांच्या गुणसूत्रांत वगैरे बदल होऊन नव्या जाती निर्माण होतात. यात ईश्वरनामक संकल्पनेचा संबंधच काय, असा विज्ञानाचा सवाल आहे. या अर्थाने महास्फोटाचा सिद्धान्त असो वा उत्क्रांतिवाद या गोष्टी ईश्वरवादाच्या मूळ प्रमेयांनाच चूड लावतात. केवळ एवढेच करून त्या थांबत नाहीत, तर मानवाचे श्रेष्ठत्वच त्या नाकारतात. माणूस हा पृथ्वीतलावरचा सर्वात बुद्धिमान प्राणी. त्यामुळे त्याचे मत असे की आपण परमेश्वराचे लाडके. त्याने आपणास खेळण्यासाठी म्हणूनच हे जग दिले आहे. येथील प्रत्येक गोष्ट मानवाच्या सुखोपभोगासाठीच निर्माण झाली आहे. जगाच्या निर्मितीतच हा रचनावाद आहे. थोडक्यात सांगायचे तर देवाने माणसाला जे नाक दिले ते चष्मा ठेवण्यासाठी म्हणूनच, अशा शब्दांत फ्रेंच विचारवंत व्हॉल्टेअर यांनी या रचनावादाची खिल्ली उडविली होती. पुढे उत्क्रांतिवादाने या रचनावादाच्या पायालाच सुरुंग लावला. माणसाचा जन्मच जर माकडापासून झाला असेल, तर त्याच्यासाठी देवाने हे जग बनविले या म्हणण्याला काहीच अर्थ राहत नाही. या सिद्धान्ताने रचनावाद तर ढासळून पडतोच, पण रचनाकारही कोसळतो. त्यामुळेच कोणत्याही धर्मश्रद्धाळूला हे मान्य असणे शक्यच नव्हते. हे सिद्धान्त मांडणारी सारी मंडळी युरोप-अमेरिकेतली पण प्रबोधनकाळानंतरची म्हणून ती बचावली. नाही तर त्यांना या पाखंडाबद्दल सुळावरच चढावे लागले असते. अर्थात या वैज्ञानिकांना जाळणे-मारणे यांसारखे धर्मदंड देण्यात आले नसले, तरी त्यांच्या विज्ञानविचारांना मात्र सातत्याने क्रुसेड वा जिहादचा सामना करावा लागला आहे. या तथाकथित धर्मयुद्धातील एक हत्यार असते छद्मविज्ञान. छद्मविज्ञान म्हणजे काटय़ाने काटा काढण्याचा धार्मिकप्रिय प्रकार. विज्ञानातील काही तत्त्वे, काही विचार घ्यायचे आणि ती धार्मिक बाबींमध्ये अशी काही घोळायची की वाटावे हा अभिनव शास्त्रविचारच. अमेरिकेत लोकप्रिय असलेला इंटेलिजन्ट डिझाइन किंवा काही ख्रिस्ती पंथांना अत्यंत प्रिय असलेला क्रिएशनिझम हा त्यातलाच प्रकार. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश धाकटे हे अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचे गृहस्थ. अफगाणिस्तान, इराक या देशांवर हल्ले करावेत असा आदेश त्यांना खुद्द आकाशातल्या बाप्पानेच दिला असल्याचे खुद्द त्यांनीच सांगितले होते, अशा बातम्या काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या. अशा ख्रिस्तित्व हेच राष्ट्रीयत्व मानणाऱ्या नेत्याच्या कारकिर्दीत छद्मविज्ञानाला बहर यावा यात काहीच आश्चर्य नाही. त्यांच्याच काळात अमेरिकेतील शाळा-महाविद्यालयांतून इंटेलिजन्ट डिझाइन हे 'विज्ञान' शिकवावे अशी टूम निघाली होती. या 'इंटेलिजन्ट डिझाइन'कारांनुसार नैसर्गिक निवड वगैरे प्रकार मिथ्या आहे. विश्वातील अनेक गोष्टींमध्ये कोणा बुद्धिमान रचनाकाराचा हात दिसतो. हा रचनाकार म्हणजेच परमेश्वर. तर 'क्रिएशनिझम'नुसार हे जग, ही प्राणीसृष्टी हे सारे एका दैवी निर्मितीची अपत्ये आहेत. पोप फ्रान्सिस यांनी महास्फोट सिद्धान्त आणि उत्क्रांतिवाद खरे असल्याचे सांगितल्याने ही छद्मविज्ञाने उताणी पडली आहेत. अर्थात येथे हेही लक्षात घ्यायला हवे की असा क्रांतिकारी विचार मांडणारे फ्रान्सिस हे काही पहिलेच पोप नाहीत. यापूर्वी पोप पायस बारावे यांनी महास्फोट सिद्धान्ताचे स्वागत केले होते. ते १९३९ ते ५८ या काळात पोपपदी होते. त्यानंतर १९९६ मध्ये पोप जॉन पॉल दुसरे यांनी उत्क्रांतिवाद पुराव्याने शाबीत झाल्याचे सांगून खळबळ उडविली होती. पण हा असा किंचित विज्ञान पक्षपातही चर्चच्या गुणसूत्रांत नाही. त्याची प्रचीती २००५ मध्ये पोपपदी आलेले बेनेडिक्ट सतरावे यांनी आणून दिली. त्यांनी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी शब्दांची अशी काही जाळी विणून इंटेलिजन्ट डिझाइनचा सिद्धान्त उचलून धरला. परंतु पोप फ्रान्सिस यांनी आज त्याची भरपाई केली आहे. याचा अर्थ त्यांनी देव नाकारला आहे असे नाही. त्यांचे म्हणणे एवढेच की महास्फोट सिद्धान्त आणि उत्क्रांतिवाद देवकल्पनेशी विसंगत नाही. खरे तर चर्चला नव्याने झालेला हा साक्षात्कारही थोडका नाही.
धर्म हा मोठा चलाख परंतु गतिमंद विद्यार्थी असतो. चलाख यासाठी की तत्त्वज्ञानाच्या मायाजालात तो बडय़ा बडय़ा बुद्धीमंतांनाही मंद करून टाकतो आणि गतिमंद विद्यार्थी यासाठी की तो आधुनिक ज्ञान-विज्ञान अंगीकारतो परंतु त्यासाठी त्याला वेळ लागतो. पोप फ्रान्सिस यांनी विज्ञानाचे दोन महत्त्वाचे सिद्धान्त मान्य करून धर्माची आजवरची चलाखी उघड करून दाखविली आहेच, पण त्याच्या गतिमंदत्वाचेही प्रमाण दिले आहे. काहीही असो, त्यांना झालेला हा साक्षात्कार क्रांतिकारी ठरणारा आहे हे नक्की.
-३० ऑक्टोबर २०१४ च्या 'लोकसत्ता' मधील अग्रलेख

Saturday, July 19, 2014

हिंदी कविता



आप का जनम हिंदू घर में हुआ
तो आप हिंदू हित की बात करेंगे

आपका जनम मुस्लिम घर में हो गया
तो आप मुसलमानों के मुद्दों पर बोलेंगे


आप ऊंची जात वाले घर में पैदा हुए तो आप
दलितों के मुद्दों पर अविचलित रहेंगे

अगर आपका जनम दलित परिवार में हुआ तो आप
दलित समस्याओं पर बोलेंगे

आपका जनम किसी बड़े शहर में हुआ तो आप दंतेवाड़ा के आदिवासियों की ज़मीनें छीने जाने को विकास के लिए ज़रूरी बताएँगे

और अगर आपका जनम दंतेवाड़ा के आदिवासी के घर में हुआ तो आप नक्सलवादी कहलायेंगे .

किसी खास जगह पैदा होने की वजह से आप एक खास तरीके से सोचते हैं

आपका चिंतन स्थान सापेक्ष है
स्थान बदलते ही आपके विचार बदल जायेंगे

लेकिन सत्य तो स्थान बदलने से नहीं बदलता

सत्य हिंदू या मुसलमान ,सवर्ण या दलित के, घर में या भारत या पाकिस्तान में भी नहीं बदलता

अब देखिये आपके विचार अपने जनम के स्थान के कारण बने हैं या उन विचारों में हर स्थान में सही सिद्ध होने का गुण है .

कभी अपने ही मन में अपना स्थान बदल कर फिर सोचिये .

कल्पना में खुद को अपने विरोधी के स्थान पर रख कर सोचने की कोशिश कीजिये .

क्या आप हर जगह के सत्य को देख पा रहे हैं ?

क्या अब भी आपको लगता है आप सही थे ?

देखिये आपका कट्टर नजरिया अब हल्का होने लगा है .

यही मुक्ति है .

यही आपके जानवरपन से मनुष्त्व की यात्रा की शुरुआत है .

अब आप जीवन का आनंद लेने के लिए तैयार हैं .

कवी : हिमांशू कुमार

Tuesday, July 8, 2014

माझी विचारसरणी

विविध विषयांवर माझे विचार काय आहेतमाझी मते कोणती आहेत ते या लेखात मांडण्याचा प्रयत्‍न केला आहेविविध विषय म्हटले तरी ते देव-धर्म-श्रद्धा-विवेकवाद यांच्याशी संबंधित आहेततसेच लेखातील विषय काही एका विशिष्ट क्रमाने मांडले आहेत असे नाहीजसे सुचेल तसे लिहिले आहेमला जे मन:पूर्वक वाटते तेच लिहिले आहे.
(हे विश्व कशातून निर्माण झाले कसे उत्पन्न झाले कोणी केले प्रारंभी काय होते हे विश्व शून्यातून निर्माण झाले का याविेषयी मला निश्चित असे काही ठाऊक नाहीअजून मतमतांतरे आहेत असे दिसते.महाविस्फोटबिगबॅंगहिग्सबोसोन् कण यांसंबंधी प्रसंगपरत्वे वाचतोपण ते मला आकळते(समजतेअसेनाहीहे विश्व एवढे अफाटएवढे अमर्याद आहे की त्याच्या तुलनेत आपला पृथ्वी ग्रह अगदीच नगण्य आहेहेमला समजतेमाझा संबंध या पृथ्वी ग्रहाशी आहेम्हणून विश्वाच्या उत्पतीविषयी मी अधिक विचार करीत नाहीअवकाशवस्तुमानकाळ (स्पेस-मास-टाईमया गोष्टी अनादि कालापासून अस्तित्वात आहेत ,निसर्गनियमही अनादि कालापासून आहेत असे मी मानतोया घटकांवर निसर्गनियमांनुसार विविध प्रक्रिया होऊन तारेग्रहमालाआकाशगंगानेब्यूलाक्वासारकृष्णविवरेइत्यादि सर्व काही निर्माण झाले असे मी मानतोमाझे हे अज्ञान असेलमाझ्या आकलन क्षमतेची ही मर्यादा आहे.
मात्र हे विश्व कोण्या एका अलौकिक ईश्वराने निर्माण केलेले नाहीते निसर्गनियमांनुसार उद्भवले असे माझे ठाम मत आहेयाविषयी अधिक वाचन,मननचिंतन करण्याची माझी क्षमता नाहीतसे करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाहीत्यातून काही उपयुक्त घडेल असेही वाटत नाहीमाझे आयुष्य काही वर्षांचे आहेमाझे विश्व लहान आहे.
() " या अमर्याद विश्वाविषयी अधिक सखोल विचार करावा असे मला वाटत नाही. " असे म्हटले असले तरी या विश्वाविषयी शक्य होईल तेवढे सत्यज्ञान आपण मिळवायला हवे असे मला वाटतेआपली ग्रहमाला(प्लॅनेटरि सिस्टिमकशी अस्तित्वात आली याचे विश्वासार्ह आणि सर्वमान्य ज्ञान विज्ञानाला आहे.साधारणपणे ४६० कोटी वर्षांपूर्वी एक अजस्र तारा सूर्या जवळून गेलात्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे सूर्यावर मोठी भरती आली. (सूर्य वायुरूप आहे.) ती फुटून लहान-मोठे पुंजके तयात झालेते सूर्याच्या गुरुत्वाकर्षणक्षेत्राच्या बाहेर गेले नाहीतसूर्याच्या केंद्रगामी गुरुत्वाकर्षण बलामुळे(सेंट्रिपेटल फोर्सते सूर्याभोवती फिरत राहिलेहीझाली आपली ग्रहमालाम्हणजे पृथ्वीचे वय ४६० कोटी वर्षे आहे.
कालांतराने पृथ्वी थंड झालीपाणी पृथ्वीच्या पोटातून वर येऊन समुद्र निर्माण झालेसमुद्राच्या पाण्यातील विविध रासायनिक द्रव्यांचे क्रमपर्यायी संयोग (परम्युटेशन्स-कॉंबिनेशन्सअविरत घडत राहिलेया सततच्या प्रक्रियेतून सुमारे साठ कोटी वर्षांनी सजीव पेशी यदृच्छया निर्माण झाल्याअगदी प्रथमिक स्वरूपाचे जीव तयार झालेनंतर स्वैर गुणबदल (रॅंडम म्युटेशनआणि निकष लावून झालेली नैसर्गिक निवड (नॉन रॅंडम नॅचरल सिलेक्शनया तत्त्वांच्या आधारे उत्क्रांती होत होत या पृथ्वीवरील वैविध्यपूर्ण सजीवसृष्टी निर्माण झालीमाणूसही त्याच प्रक्रियेतून उत्क्रांत झाला.
(या पृथ्वी ग्रहावरील मानव प्रजातीत माझा जन्म झाला हे माझे महद्भाग्य मानतोमला लाभलेले हे एकमेव जीवन आहे--पहिले आणि शेवटचेमाझा गतजन्म नव्हतापुनर्जन्मही असणार नाहीकुणाचाच नसतो.पुनर्जन्म ही भ्रामक कल्पना आहे. "जातस्य हि ध्रुवो मृत्युहे गीतावचन सत्य आहेमृत्यू अटळ आहेमाझामृत्यू झाल्यावर माझे जीवन संपुष्टात येणार.
(मी कुटुंबात राहातोसमाजात राहातोम्हणून जी काही माझी कौटुंबिक कर्तव्ये आहेतसामाजिक कर्तव्ये आहेत ती सर्व मी यथाशक्तीयथामती आनंदाने आणि निष्ठेने पार पाडणारकर्तव्य म्हणजे अवश्य करायला हवे असे स्वकर्मज्ञानेश्वरीतील "तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्मकुसुमांची वीरा ।पूजा केली होय अपारा तोषालागी ।हे वचन मी मानतो.
(मरण अटळ आहेमृत्युनंतर पुन्हा जीवन नाहीम्हणून या सृष्टिविषयीचे आणि विश्वासंबंधीचे शक्य होईल तेवढे सत्यज्ञान मिळविण्याचा मी आमरण प्रयत्‍न करणारजीवनाचा आनंद उपभोगणारकुटुंबाचे,समाजाचे आणि पुढील पिढ्यांचे जीवन अधिक सुखकर ,अधिक सुरक्षित होईल यासाठी शक्य होईल ते काम करणारसमाजातील अज्ञान आणि माणसांचे दु: दूर होण्यासाठी यथाशक्ती प्रयत्‍न करणार.
(भारत माझा देश आहेसारे भारतीय माझे बांधव आहेतया सार्‍यांच्या प्रगतीत देशाची प्रगती गुंफलेली आहेहे मला पटतेम्हणून मी ते मनापासून मानतोमाझ्या देशबांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे त्यांच्या हिताचे आहेम्हणून ते समाजाच्या आणि अंततदेशाच्या हिताचे आहे असे मला विचारान्तीं वाटतेहेप्रामाणिक मत माझ्या देशबांधवांना वैधमार्गांनी परोपरीने सांगण्याचे मला घटनादत्त स्वातंत्र्य आहेकिंबहुनावैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे आणि त्याचा प्रसार करणे हेभारतीय संविधानानुसार आपणा सर्वांचे कर्तव्य आहे.
(या लेखात मी ज्या अंधश्रद्धा सांगितल्या आहेतज्यांना भंपक शास्त्रे (स्यूडो सायंसे म्हटले आहेत्यांतीलकोणत्याही गोष्टीचा त्याग न करता ती खरी मानून चालणार्‍या श्रद्धाळूंना मी दोष देत नाहीत्यांच्याविषयीमाझ्यामनात किंचितही राग नाहीपण त्यांनी स्वबुद्धीने विचार करावाश्रद्धेची चिकित्सा करावीअसे माझे मत आहेसमाजात काही धूर्तलबाड माणसे असतातसर्वकाळी असतातश्रद्धाळूंना फसवून लुबाडणेत्यांचेआर्थिक शोषण करणे हाच त्यांच्या उपजीविकेचा धंदा असतोप्रसारमाध्यमांतून जाहिराती करून ते सतत अज्ञान पसरवीत असताततसेच भाडोत्री प्रचारक नेमून आपल्या धंद्याचा प्रचार करतातएखाद्या समस्येमुळे अपरिहार्यपणे अगतिक झालेले श्रद्धाळू या धूर्तांच्या प्रचाराला बळी पडतातआधीच अगतिक झालेल्या आणि श्रद्धेने लिप्त असलेल्या लोकांना आपली आर्थिक फसवणूक होत आहे हे कळतही नाहीमाझा विरोध आहे तो या कावेबाज धूर्तांनाराग येतो तो त्यांचाते भोळ्या श्रद्धाळूंना अज्ञानात ठेवून निर्दयपणे फसवत असतातवरशहाजोगपणाचा आव आणतात.
(जगनिर्माताजगन्नियंतापूजा-अर्चा-प्रार्थना यांनी संतुष्ट होऊन भक्तांवर कृपा करणारा असा कोणी अलौकिक ईश्वर अस्तित्वात नाहीकितीही आर्ततेने धावा केला तरी देव धावून येत नाही. "देव भक्ताघरीं धावलाहे केवळ काल्पनिक पुराणकथांत असतेव्यवहारात नसतेमाणसाने वास्त्ववादी असावेकुठल्याहीभ्रमात राहू नये.
() "या विश्वात एक अलौकिक अद्भुत शक्ती आहेती विश्वाचे संचलन करतेविश्वातील यच्चयावत् सर्व घटना ती शक्ती घडवते. " हे पूर्णतया तथ्यहीन आहेअशी अलौकिक शक्ती कुठेही अस्तित्वात नाही.विश्वातील सर्व घटना निसर्गनियमांनुसार घडतात.
(१०जगात कुणाकडे कसलीही दैवी शक्ती नसतेआपल्या कृपेनेप्रसादानेअनुग्रहानेआशीर्वादाने कुणाचे भले करण्याचे सामर्थ्य कुणाजवळ नसतेमग तो कितीही मोठासुप्रसिद्ध असोतसे सामर्थ्य असल्याचा दावा करणारे गुरु-बाबा-स्वामी-बापू हे सर्व लबाडढोंगीठकसेन असतात अथवा मनोविकृत भ्रमसेन असतात.
..........
(११आत्मापुनर्जन्मपरमात्मामोक्ष या सर्व भ्रामक संकल्पना आहेतत्या उपनिषदांत आहेतगीतेतप्रत्यक्ष भगवंतांच्या मुखी आहेतशांकरभाष्यात आहेतसंतसाहित्यात आहेततरी त्या सत्य मानता येत नाहीतत्या प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध होत नाहीतलोकप्रसिद्ध अनुमान प्रमाणाने सिद्ध होत नाहीततार्किकयुक्तिवादाने तसेच मानवाच्या अधिकृत ज्ञान संग्रहातील तत्त्वांच्या आधारे वरील संकल्पनांची सत्यता प्रस्थापित करता येत नाहीत्या संकल्पना केवळ श्रद्धेने खर्‍या मानायच्याश्रद्धेला तर विज्ञानात तसेच तर्कशास्त्रात मुळीच स्थान नाहीम्हणून आत्मापरमात्मा इसंकल्पना मी खर्‍या मानीत नाहीपूर्वापार ,पिढ्यानुपिढ्या चालत आलेल्या या संकल्पनांची कोणतीही चिकित्सा न करता व्यासमहर्षीआद्यशंकराचार्य,ज्ञानेश्वरअन्य साधुसंत यांनी त्या शब्दप्रामाण्याच्या आधारे खर्‍या मानल्यापण आधुनिक विज्ञानाच्या आधारे चिकित्सा केल्यास त्या भ्रामक ठरतात.
(१२स्वर्गनंदनवनअप्सराअमृतनरक-कुंभिपाक-रौरव-यमयातना या सर्वच्या सर्व गोष्टी केवळ काल्पनिक आहेतप्रत्यक्ष अस्तित्वात नाहीतहे उघड आहे.
(१३संचितक्रियमाणप्रारब्धकर्मविपाकया तथ्यहीन कल्पना आहेतनियतीललाटलेखब्रह्मलिखित,या सर्व गोष्टी निरर्थक आहेत.
(१४कोणतेही धार्मिकविधी (पूजा-अर्चा-व्रतवैकल्ये-होम-हवन इ.)करून कोणताही हेतू साध्य होत नाही. (जोविधी करायचा असे योजिले असेल तो विधी पार पडतो एव्हढेच.) केवळ मानसिक समाधान लाभू शकतेअशाकर्मकांडांच्या वेळी जे संस्कृत भाषेतील मंत्र म्हणतात त्या मंत्रांत कोणतेही सामर्थ्य नसते.
(१५गुरुमंत्र नमशिवाय।गं गणपतये नम: ॐ नमो भगवते वासुदेवाय ।मृत्युंजय महामंत्रगायत्रीमंत्रअसल्या कुठल्याही मंत्रात कसलेही सामर्थ्य नसतेहे मंत्र आणि "ओले मंतर कोले मंतर फूमंतर छूमंतरयांत मूलतकाही भेद नाहीसगळे सारखेच निरुपयोगी !
(१६पुराणात शाप-:शापवर-वरदानदेण्याच्या अनेक कथा आहेतत्या सर्व काल्पनिक आहेतएखाद्यालाशाप देऊन त्याचे काही वाईट करण्याचे सामर्थ्य कुणाजवळही नसतेपूर्वीसुद्धा कुणाजवळ नव्हतेतथाकथितसिद्धयोगीतपस्वीऋषीअशा कोणीही कुणाला शाप दिला तरी त्या शापाचा कोणताही परिणाम शापित व्यक्तीवर हो्ऊ शकत नाहीपूर्वी कधीही झालेला नाहीभविष्यात कधी होणार नाहीमात्र, "मला त्या साधूने शाप दिला आहेआता माझे काहीतरी वाईट होणार असा धसका त्या शापित व्यक्तीने घेतला तर त्या भीतीने मानसिक परिणाम होईलत्याचे पर्यवसान काही शारीरिक आजारात होऊ शकेलकुण्या तापट साधूने रागीट मुद्रा धारण करूनडोळे खदिरांगारांसारखे लालबुंद करून , "तुला भस्मसात करतो." अशी शापवाणी उच्चारली तरी वाळलेल्या गवताची काडीसुद्धा पेट घेणार नाही.
तसेच आपल्या भक्तावर संतुष्ट होऊन कुण्या साधूनेतथाकथित योग्यानेत्या भक्ताला वर अथवा आशीर्वाद दिला तरी त्यामुळे त्याभक्ताचे काही कल्याण होणार नाहीकाहीसुद्धा भले होऊ शकत नाही. (केवळ मानीव मानसिक समाधान मिळेल तेवढेच.)
शाप अथवा वर यामुळे काही प्रत्यक्ष घडून येणे हे निसर्गनियमाविरुद्ध आहेतसे करण्याचे सामर्थ्य कुणालाही प्राप्त होत नाहीया संबंधीच्या सर्व पौराणिक कथा बाष्कळ आहेत.
(१७कितीही योगसाधना केलीध्यान-धारणा करून समाधी लावलीतरी अष्टसिद्धींतील एकही सिद्धी कुणालाही प्राप्त होणे शक्य नाहीअशी सिद्धी मिळणे हे निसर्ग नियमाचे उल्लंघन आहेते कोणीही करू शकत नाही.
(१८सर्व तथाकथित चमत्कार हे हातचलाखीचे प्रयोग असतातपदार्थांच्या रासायनिक गुणधर्मांचा उपयोग करून असे प्रयोग दखविता येतात की जे लोकांना चमत्कारसदृश वाटतीलविविध रासायनिक अभिक्रियांविषयी जनसामान्यांना काही ठाऊक नसते.
(१९आकाशातील ग्रह आणि राशी (तारकापुंजमाणसाच्या जीवनावर काही परिणाम होतो याला यत्किंचितही पुरावा नाहीअसा कोणताच परिणाम होत नाही असे सर्व वैज्ञानिक नि:संदिग्धपणे सांगतात.म्हणूनफलज्योतिषत्यांतील ग्रह योगयुती-प्रतियुतीचे परिणामशनीची साडेसातीसर्व संकल्पना निरर्थक आहेतथोडक्यात म्हणजे फलज्योतिष हे एक भंपक विज्ञान (स्यूडो सायन्सआहेहे वारंवार सिद्ध झाले आहे.फलज्योतिषाचा अभ्यास इथेच संपतोफलज्योतिष विषयावरील पुस्तके वाचणेअभ्यास करणे हा केवळ कालापव्यय आहे.
(२०अंगठीत विशिष्ट रंगाचा खडा घातला की इथून कित्येक कोटी कि.मिदूर असलेल्या ग्रहांची अशुभफळे टळतात ही समजूत अडाणीपणाची आहेमुळात कुठल्याही ग्रहाचे कसलेच फळ नसतेस्वबुद्धीने थोडा जरी विचार केला तरी हे सहज समजतेतसेच बोटांत अंगठ्याकिंबहुना अंगावर कसले अलंकार घालणे हे मला ओंगळवाणेपणाचे वाटते.
(२१कोणताही दिवसकोणतीही गोष्टशुभ-अशुभपवित्र-अपवित्रपुण्यदायक-पापकारक नसतेती चांगली-वाईटयोग्य-अयोग्यहितकारक-अहितकारक असू शकते.
(२२वास्तु (दिशाभूलशास्त्रप्राणिक हीलिंग (प्राणशक्तिउपचार) , ब्रह्मविद्याओंकार गुंजनअग्निहोत्र.सर्व भंपक (स्यूडोशास्त्रे आहेतत्यांतून हितकारक असे काहीही साध्य होत नाही.मात्र असल्या भंपक शास्त्रांच्या आधारे श्रद्धाळू गिर्‍हाइकांना फसवून काही लबाड माणसे भरपूर कमाई करतात.
(२३सुरक्षाकवचेश्रीयंत्रेरुद्राक्षेपिरॅमिडस्अशा सर्व वस्तु पूर्णतया निरुपयोगी असतातत्या घरात आणून ठेवल्या असता आपल्या समस्या दूर होतील असे मानणे असमंजसपणाचे आहे.
(२४अंत्यसंस्कारांच्या संदर्भात हिंदुधर्मातील पुरोहितांनी जी कर्मकांडे रूढ केली ती सर्व त्यांच्या कमाईसाठी,अधिकाधिक लाभासाठी आहेतहे अगदी स्पष्ट दिसतेअन्यथा पिंडदानअकरावेबारावेतेरावेमासिकश्राद्धवार्षिक श्राद्धसर्वपित्री अमावास्याअसले प्रकार का आले असतेया संदर्भात वैज्ञानिक सत्य काय आहे?मृत्युनंतर जीवन पूर्णतया संपतेअमर आत्माअतृप्त आत्मापुनर्जन्ममोक्ष या सर्व कल्पना भ्रामक आहेत.विद्युत् दाहिनीत दहन करावे. (देहदान केल्यास उत्तमच). नंतर कोणतेही कर्मकांड करू नयेमोठ्याप्रमाणातहोणारा अनावश्यक खर्च वाचेलआपल्या श्रमाचाघामाचाकष्टाचा पैसा व्यर्थ वेचू नयेया कर्मकांडांमुळे आजवर अब्जावधी रुपयांची लूट झालीकित्येकजण कर्जबाजारी झालेहे पैसे नुसते वाया जातातहे विधी केले नाही तर कुणाचे काहीही वाईट होत नाहीहे स्वानुभवाने सांगतोसमाज काय म्हणेल याची चिंता नको.अनेकजण तुमचे अनुकरण करतील.

(२५निसर्ग हा पूर्णतया उदासीन आहेभूकंपवणवेमहापूरवादळेअशा घटना निसर्ग नियमांनुसार घडतात.त्यामागे कुणाचा कसलाही हेतू नसतोकोणतीही नैसर्गिक घटना माणसांच्यापशुपक्षांच्याअन्य प्राण्यांच्या,वनस्पतिसृष्टीच्या हितासाठी अथवा हानीसाठी घडत नाहीपाऊस पडतो तो प्राणिमात्रांना वृक्षवेलींना पाणी मिळावे म्हणून नव्हेतो निसर्गनियमानुसार पडतोत्यामागे कार्य-कारणभाव असतो तो केवळ निसर्ग नियमांचाअन्य कशाचाही नाही.
-प्रा.य.ना.वालावलकर

Thursday, May 8, 2014

माणसाचे मांस

एक दिवस एक कावळा आणि त्याचा मुलगा झाडावर बसले होते.

कावळ्याचा मुलगा वडिलांना म्हणाला,  "मी आजपर्यंत सगळ्या प्रकारचे मांस खाल्ले... पण, दोन पायांच्या माणसाचे मांस कधीच खाल्ले नाही. बाबा, कसा स्वाद असतो हो या दोन पायांच्या जीवाच्या मांसाचा?"

वडील कावळा म्हणाला,  "आजपर्यंत मी जीवनात ३ वेळा माणसाचे मांस खाल्ले आहे. खूपच चविष्ट असते ते!"
मुलगा कावळा लगेच हट्ट करू लागला की त्याला पण माणसाचे मांस खायचे आहे.

वडील कावळा म्हणाला, "ठीक आहे, पण थोडा वेळ वाट पहावी लागेल आणि मी जसे सांगेन तसे तुला करावे लागेल. माझ्या वाडवडिलांनी मला हि चतुराई शिकवून ठेवली आहे ज्यामुळे आपल्याला खाणे मिळू शकेल."

मुलगा कावळा "होय" म्हणाला.

त्यानंतर वडील कावळ्याने मुलाला एका जागी बसवले व तो उडून निघून गेला आणि परत येताना मांसाचे २ तुकडे तोंडात घेवून आला. एक तुकडा स्वतःच्या तोंडात धरला व दुसरा तुकडा मुलाच्या तोंडात दिला, तुकडा तोंडात घेता क्षणी मुलगा म्हणाला, "शी बाबा, तुम्ही कसल्या घाणेरड्या चवीचे मांस आणले आहे. असले खाणे मला नको."

वडील कावळा म्हणाला, "थांब", तो तुकडा खाण्यासाठी नसून फेकण्यासाठी आहे. हा एक तुकडा टाकून आपण आता मांसाचे ढीग तयार करणार आहोत. उद्या पर्यंत वाट बघ तुला मांसच मांस खायला मिळेल आणि ते सुद्धा माणसाचे."

मुलाला हे काही कळले नाही कि एका मांसाच्या तुकड्यावर मांसाचे ढीग कसे काय निर्माण होणार ते.

पण त्याचा त्याच्या वडिलावर विश्वास होता.

थोड्या वेळाने वडील कावळा एक तुकडा घेवून आकाशात उडाला आणि त्याने तो तुकडा एका मंदिरात टाकला आणि परत येवून दुसरा तुकडा उचलला व तो दुसरा तुकडा एका मशिदीच्या आत टाकला.

मग तो झाडावर येवून बसला.

वडिल कावळा मुलाला म्हणाला, "आता बघ उद्या सकाळपर्यंत मांस खायला मिळते कि नाही ते?"

थोड्याच वेळात सगळीकडे गलका झाला, ना कुणाला कुणाचे ऐकू येत होते ना कोणी कोणाचे ऐकून घेत होते.

फक्त 'धर्म' भावना विखारी झाली होती. धर्माच्या नावाखाली रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या.... आई, मुलगा, बहिण, भाऊ, वडील, काका, शेजारी, मित्र असे कोणतेच नाते लक्षात न घेत फक्त धर्म बघून एकमेकांवर वार चालू होते.

''आमच्या धर्माचा अपमान झाला त्याचा बदला घेतलाच पाहिजे'' असे दोघेही म्हणत होते आणि यात निरपराध मारले जात होते.

खूप वेळ यातच निघून गेला आताशा गाव शांत होवू लागले होते कारण रस्त्यावर फक्त आणि फक्त रक्तच सांडलेले दिसत होते. विशेष म्हणजे ते रक्त लाल रंगाचे होते... त्यात कुठल्याच धर्माची छटा नव्हती. ते फक्त एकच धर्म पाळत होते ते म्हणजे प्रवाही पणाचा..

गांव निर्मनुष्य भकास झाले होते.... सर्वत्र भयाण शांतता पसरली होती.

या धुमश्चक्रीतून फक्त २ जीव सुटले होते ते म्हणजे झाडावरचे कावळे.

आता कावळ्याचे पोर माणसाची शिकार करायला शिकले होते.

कावळ्याच्या पोराने बापाला प्रश्न विचारला, "बाबा, हे असेच नेहमी होते का?
आपण भांडणे लावतो आणि माणसाच्या लक्षात कसे येत नाही?"
कावळा म्हणाला, "अरे या मुर्ख माणसाना कधीच आपला धर्म कळला नाही. माणुसकी हा धर्म सोडून ते नको त्या गोष्टी करत बसले आणि आपल्यासारखे कावळे त्यांचा फायदा घेवून जातात हे त्यांच्या लक्षातही येत नाही. माणूस म्हणून जगण्यापेक्षा यांनी जात आणि धर्म यांचेच जास्त प्रस्थ माजविले आहे.आणि त्याचा गैरफायदा इतर तिसरे कोणी तरी घेवून जातात."

इतके बोलून दोघे बाप-लेक मांस खाण्यासाठी उडून गेले.

Wednesday, April 30, 2014

महात्मा फुल्यांचे फलज्योतिष विषयक विचार

फलज्योतिषाकडे पहाण्याच्या सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीकोनामध्ये उत्सुकता युक्त आदर असतो. कुतुहल असते. काहींच्या मते फलज्योतिषावर विश्वास ठेवणे म्हणजे अंधश्रद्धा जोपासणे. पण तरीही बहुतेकांच्या मते ते शास्त्र आहे.श्रद्धेपोटी काहीजण फलज्योतिषाच्या माध्यमाद्वारे आपला भविष्यकाळ ज्ञात करुन घेण्यासाठी यथाशक्ती,यथाबुद्धी प्रयत्न करतात.अशिक्षित अडाणी समाजामध्ये सुद्धा फलज्योतिषाचा उपयोग सोयरिक जुळवण्यासाठी केला जातो. यासाठी जन्मनावाचा उपयोग केला जातो.

खेडेगावात शेतकरी, बलुतेदार लोक अपत्य झाल्यानंतर नाव ठेवण्यासाठी ग्रामजोशी, भटजी, पुराणीक अशा धर्माचे प्रतिनिधित्व करणा-या मंडळींकडे जातात. जोशी जन्मनांव काढुन देतो.हे जन्मनाव हीच या बालकाची कुंडली बनते. उच्च वर्णियांसारखी जन्मवेळेची घटीपळांमध्ये नोंद ठेवण्याची गरज या समाजात नसते."पुनवेच्या आदुगर दोन दिवस सांच्या वक्ताला, 'कासराभर दिवस वर आला आसन तव्हा" अशा माहितीतुन जन्मवेळेची अंदाजाने निश्चितीकेली जाते. त्यावरुन ग्रामजोशी नक्षत्र काढून जन्मनावाची आद्याक्षरे पंचांगातुन काढतो व जन्मनाव ठरते.ते कधी कधी निरर्थकही असते. कधी कधी जन्मनावाच्या आद्याक्षरांवरुन एखादे देवाचे नांव ठेवण्यात येते.महात्मा फुल्यांनी फलज्योतिषाची जनमानसावरील पकड अचुक पद्धतीने ओळखली. आपल्या 'सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक' मध्ये त्यांनी ज्या प्रकारचे स्पष्टीकरण दिले त्यावरुन फलज्योतिषाच्या मुळ सिद्धांताचा त्यांनी चांगला अभ्यास केला होता हे स्पष्टपणे जाणवते. प्रथम अभ्यासक व नंतर टीकाकार अशी त्यांची भूमिका होती. फलज्योतिष हा धर्माचा एक भाग मानला जात असल्याने त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकात फलज्योतिषासंबंधी टीका केली.फुल्यांच्या काळातील म्हणजे शतकापुर्वीची असलेली सामाजिक परिस्थिती व सामाजिक मानसिकता या पार्श्वभूमीवर जर आपण विचार केला तर फलज्योतिषाला सामाजिक शोषण व अंधश्रद्धा म्हणणारे म.फुले काळाच्या किती पुढे होते हे समजते. फलज्योतिषी लोकांच्या अज्ञानाच्या फायदा उठवुन भरभक्कम दक्षिणा उकळतात असे ते स्पष्टपणे म्हणतात. ग्रहांची पीडा टाळण्यासाठी ग्रहशांतीचे यज्ञयाग केले जातात. ज्या धर्मग्रंथात ग्रहपीडानिवारणाचे कर्मकांड सांगितले जाते त्याविषयी तीव्र भाषेत टीका करतात."अहो त्यांच्या या भूमंडळावरील चतुष्पाद भाउबंदास म्हणजे बैलास जन्म देणा-या गायांसह मेढ्यांस अघोरी आर्यभट ब्राह्मण त्यांस खाण्याच्या निमित्ताने यज्ञामध्ये त्यांचा बुक्क्यांनी वध त्यांचे मांस गिधाडासारखे खात होते, त्यांच्याने त्यावेळी आर्यभट ब्राह्मणांचे काही नुकसान करवले नाही. तथापि हल्लीच्या सत्ययुगामधे जर गायामेंढ्यास जर ईश्वरकृपेने वाचा फुटली असती तर त्यांनी धूर्त आर्यातील ग्रंथकारांची नांवे ठेवण्यास कधीही मागेपुढे घेतले नसते."
अशाच जन्मनांव प्रकरणाचा समाचार महात्मा फुल्यांनी शंभर वर्षांपुर्वी घेतला. "सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक" मध्ये फुल्यांनी बळवंतराव हरी साकवळकर यांच्या जन्मवेळेवरुन जन्मनांव कसे काढतात? यावरुन जन्मरास पत्रिका कशी मांडतात? याविषयींच्या प्रश्नाला विश्लेषणात्मक उत्तर दिले आहे. त्यावरुन त्यांना फलज्योतिषविषयक चांगली जाण होती हे दिसुन येते. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर " मानव स्त्री पुरुष जन्म होताना त्यावेळी नक्षत्रांचे कोणते चरण होते म्हणुन समजणारे लोक फारच विरळा. त्यातुन नक्षत्रांचा पहिला व दुसरा चरण संधी होताना एक शतांश निमिषाची घालमेल झाल्याबरोबर 'चे' याची 'ची' अथवा 'चु' याचे 'चे' होण्याचा संभव आहे. त्याच प्रमाणे अश्विनीची चार चरणे, भरणीची चार चरणे आणि कृत्तीकाचे पहिले चरण अशी एकंदरीत नउ चरणे मिळुन एक मेष रास होती. आता मेष व वृषभ राशीचा संधी होताना एक शतांश निमिषाची घालमेल झाल्याबरोबर वृषभ राशीची मेष रास अथवा मेषराशीची वृषभ रास होण्याचा संभव आहे. त्या सर्वांवरुन स्त्री पुरुषांचा जन्म होतेवेळी घंगाळाच्या पाण्यात वाटी टाकून घटका पहाणारे फारच थोडे. परंतु वाव अथवा कास-याने सुर्य अथवा रात्रीच्या तपा मोजणारे बहुत सापडतील.यावरुन आर्यातील ग्रहशास्त्रवेत्ते मुली मुलांच्या जन्मपत्रिका कोणत्या त-हेने वर्तवतात याविषयी एखादा अनुभव असेलच. याशिवाय आपण पेशवे सवाई माधवराव यांची जन्मपत्रिका वाचुन पहा. म्हणजे आर्य जोशांची ठकबाजी तुमच्या सहज लक्षात येईल."
वरील विवेचनावरुन फुल्यांनी केलेली टीका तर्कसंगत आहे हे लक्षात येते. नियतकालिकांच्या स्थळांच्या जाहिरातीत 'पत्रिका हवी' असा आग्रह धरणारे उच्च शिक्षित माणसे बघितली कि फुले काळाच्या अजुन ही पुढे आहेत की ही उच्चशिक्षित माणसे गतकाळात चालली आहेत. असा प्रश्न पडतो. सुशिक्षित माणसे मात्र पत्रिका जुळत नाही म्हणुन वधु - वरांना प्राथमिक फेरीतच बाद करतात.ज्या पायावर पत्रिकातयार होते तो पायाच किती डळमळीत आहे हे फुल्यांनी आपल्या विवेचनात दाखवुन दिले आहे. तत्कालीन समाजात तर फलज्योतिषाचे बडे प्रस्थ होते.. अशा परिस्थितीत लोकांची तर्कबुद्धी जागृत करण्याचा फुल्यांनी प्रयत्न केला. मोठी मोठी माणसे सुद्धा फलज्योतिषावषयी उघड टीका करीत नसत. कारण हा जनसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने फलज्योतिषात तथ्य नसल्याचे सांगणे त्यांच्या प्रतिष्ठेच्या, प्रतिमेच्या दृष्टीने हितावह नव्हते.
आकाशातील ग्रहांचा मानवी जीवनातील सुख दु:खावर परिणाम होतो का? अशा आशयाचा प्रश्न जेव्हा फुल्यांना विचारला तेव्हा फुले म्हणतात," या सर्व विस्तीर्ण पोकळीत अनंत तारे आहेत. त्यापैकी आपल्या एका संनिध चे सुर्य आणि चंद्र हे उभयता या पृथ्वीवरील एकंदर सर्व जलचर,भुचर आणि वनचरांसह प्राणजिवन आहेत म्हणुन निर्विवाद आहेत व तसेच बाकी शनी वगैरे ग्रह एकट्या मानव स्त्री पुरुषांस पीडा देतात म्हणुन सिद्ध करता येत नाही. तसेच शनी वगैरे ग्रहांच्या संबंधाने एखादे वेळी या आपल्या पृथ्वीवरील एकंदर सर्व प्राणिमात्रास काही एक त-हेने हित अथवा अनहित होण्याचा जरी संभव आहे तरी ते एकंदरीत सर्व प्राण्यांपैकी फक्त मानव स्त्रीस अथवा पुरुषास पीडा देतात, म्हणुन सिद्ध करता येणार नाही. कारण शनीवरील एकंदरीत सर्व प्रदेश इतका विस्तीर्ण आहे की त्याच्या निर्वाहाकरिता चार चंद्र आहेत. व त्यास आपल्या सर्वांच्या निर्मिकाने नेमुन दिलेले उद्योग एके बाजुला ठेउन तो या भुमंडळावरील एखाद्या मानव व्यक्तीस पीडा देण्यास येतो, आणि ती पीडा टाळण्याकरिता अज्ञानी लोकांनी धुर्त आर्य भट जोशास भक्कम दक्षिणा दिल्याने दुर होते., ही सर्व पोटबाबु आर्य जोशांची लबाडी आहे."
फुल्यांनी फलज्योतिषाच्या मूळ सिद्धांतावर हल्ला चढवला. त्याकाळी फुल्यांनी स्वीकारलेला वैज्ञानिक दृष्टीकोण आज आपल्याला स्वीकारणे जड जाते. फुल्यांच्या काळात नउवारी साडी नेसणारी स्त्री शनी पीडा देईल साडेसातीत शनीला तेल घालण्यासाठी ज्या भीतीपोटी जात होती त्याच भीती पोटी आजची स्लीवलेस ब्लाउज घालणारी, बॊबकट केलेली ललना शनीला जाते.
जन्मवेळ कुठली मानावी याविषयी प्रतिपादन करताना फुले म्हणतात," याविषयी आर्यातील ग्रहशास्त्रवेत्त्यांनी या कामी केवळ आपली पोटे जाळण्याकरिता ज्योतिषशास्त्रात हे मनकल्पित थोतांड मुख्य उभे केले आहे. कारण मानव स्त्रीयांच्या उदरात अथवा उदराबाहेर आलेल्या बालकाच्या मुख्य जन्मकाळाच्या दोन्ही वेळा नव्हेत. परंतु स्त्री पुरुष जेव्हा एकांत स्थळी रमतात, तेव्हा स्त्रीच्या उदरात मानव पुरुष आपल्या स्वत: स्वयंभु अवताराचे बीजारोपण करतो, त्याविषयी आर्यातील ग्रहशास्त्रवेत्त्यांनी स्त्री पुरुषांपासुन त्यांच्या रमण्याच्या वेळकाळांची नक्की बरोबर माहिती काढुन जर त्यांनी जन्मपत्रिका करण्याची वहिवाट घातली असती, तर त्यासर्वास गंमतीकरता या प्रसंगी बरे म्हटले असते."
यावरुन फुल्यांनी फलज्योतिषविषयक आपली भुमिका किती स्पष्ट व तर्कशुद्ध मांडली आहे हे दिसते.आपला फलज्योतिषावर विश्वास नाही अशि साधारण भुमिका न घेता इतरांनीही विश्वास ठेउ नये म्हणुन कारणमिमांसा करुन लोकांमध्ये चिकित्सक दृष्टीकोन जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे. महात्मा फुल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्याकाळी टीकेसाठी लागणा-या शब्दांसाठीही तडजोड स्वीकारली नाही. युवापिढीने त्यांचे विचार आचरणात आणणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.

-किशोर लोखंडे यांच्या फेसबुक TIMELINE वरून