Sunday, April 29, 2018

मूर्तीत ताकद असते?

अवैज्ञानिक गोष्टीवर एकदा श्रद्धा बसली की ती जाणे दुरापास्तच. आपण मानतो ते खोटे आहे हे स्पष्ट दिसत असले तरी माणसाची अंधश्रद्धा ढळत नाही. याचे एक उदाहरण असे:
......गझनीच्या महमुदाने सोमनाथाची मूर्ती फोडली हे सर्वज्ञात आहे.त्याने जेव्हा ते मंदिर पाहिले तेव्हा तिथल्या वैभवाने तो चकित झाला.पुरुषभर उंचीच्या चांदीच्या समया, सोन्याने मढविलेल्या आणि हिरे माणकांनी सजविलेल्या सुंदर मूर्ती पाहून त्याचे डोळे फिरले. "ही सारी दौलत आम्ही लुटणार " असे त्याने तिथेच जाहीर केले. तेव्हा त्याठिकाणी असलेले भक्तगण हसले. ते म्हणाले, "हे जागृत देवस्थान आहे. सोमनाथाचा प्रभाव फार मोठा आहे. तो देवच तुला शासन करील."
......दुसर्‍या दिवशी शस्त्रसज्ज अशा पंचवीस तीस सैनिकांसह गझनी घोड्यावरून आला.ते नंग्या तलवारी परजीत मंदिरात घुसले. गझनीने स्वहस्ते मूर्ती फोडली. सैनिकांनी सर्व संपत्ती लुटली. तिथे असलेले भक्त आणि पुजारी केवळ बघत राहिले. देवाचा चमत्कार दिसेल यावर त्यांचा दृढ विश्वास होता. प्रतिकाराचा प्रश्नच नव्हता. देवाने काहीच प्रभाव दाखवला नाही. पण देवाच्या सामर्थ्याविषयी कोणाच्याही मनात शंका उत्पन्न झाली नाही. केवढी ही अढळ श्रद्धा! धन्य धन्य ते परम भक्त ! त्यांच्या वंशजांची संख्या आज फार मोठी आहे.
.......ही ऐतिहासिक घटना आहे. ती सत्य आहे. या घटनेवर तर्कशुद्ध विचार केला तर काय निष्कर्ष निघतो? सोमनाथाची मूर्ती फोडली तरी भंजकाला काहीच झाले नाही. ज्या शिवमूर्तीची वेदोक्त मंत्रोच्चारांनी प्राणप्रतिष्ठा झाली होती अशा देवाचा काहीच प्रभाव पडला नाही. त्या अर्थी देवाच्या मूर्तीत काही सामर्थ्य नसते. म्हणजे वरळीचा सिद्धिविनायक, ठिकठिकाणचे अष्ट विनायक, पुण्याचा दगडूशेट गणपती, तिरुपतीचा बालाजी या आणि इतर सगळ्या मूर्ती म्हणजे निर्जीव बाहुल्या आहेत. त्या कुणाचेही काही बरे अथवा वाईत करू शकत नाहीत. त्यांच्या दर्शनासाठी रांगा लावणे हास्यास्पद आहे. असाच तर्कसंगत निष्कर्ष निघतो. डोक्यावरील पूर्वसंस्कारांचे ओझे फेकून देऊन स्वच्छ बुद्धीने विचार केला तर हे कोणालाही पटेल. पण अंधश्रद्धा अढळ असतात. त्या माणसाला विचार करू देतच नाहीत. ही देवस्थाने आणि तिथे जाणारे भक्त यांच्या संरक्षणासाठी शासनाला केवढी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवावी लागते.! यावरून निर्जीव देव स्वतःचे रक्षण करू शकत नाही हे स्पष्ट दिसते. तरी भक्तांना तो सर्वशक्तिमानच वाटतो. केवढी ही दृढ (अंध)श्रद्धा !
- यनावाला

Sunday, January 28, 2018

डॉ. दाभोलकर यांची पुस्तके ऑनलाईन उपलब्ध

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुस्तके online खरेदीसाठी उपलब्ध. खालील लिंकवरून आपण ती खरेदी करू शकता.
१) श्रद्धा अंधश्रद्धा
Amazon- http://amzn.to/2jKY6qw
२) विचार तर कराल?
Amazon- http://amzn.to/2A0lAvZ
३) मती भानामती
Amazon- http://amzn.to/2jIzsqv
४) भ्रम आणि निरास
Amazon- http://amzn.to/2DE3ULL
५) तिमिरातून तेजाकडे
Amazon- http://amzn.to/2E98jDj
६) अंधश्रद्धा विनाशाय
Amazon- http://amzn.to/2DMdziF
७) प्रश्न मनाचे
Amazon- http://amzn.to/2DNbnar
८) अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम
Amazon- http://amzn.to/2naxTQi
९) अंधविश्वास उन्मूलन (भाग पहला): विचार
Amazon- http://amzn.to/2jbYXg4
१०) अंधविश्वास उन्मूलन (भाग दुसरा): आचार
Amazon- http://amzn.to/2BviEq8
११) अंधविश्वास उन्मूलन (भाग तिसरा): सिद्धांत
Amazon- http://amzn.to/2EauCZe
१२) लढे अंधश्रद्धेचे
Flipkart- https://amzn.to/3kNbQgS
१३) ठरलं डोळस व्हायचंच
Amazon- http://amzn.to/2DHXuLt
१४) ऐसे कैसे झाले भोंदू
Amazon- http://amzn.to/2DAVlNM

Wednesday, April 19, 2017

थोडक्यात महत्वाचे

*अंधश्रद्धा निर्मूलन*

(1) स्त्री-पुरुष/मुलगा-मुलगी दोघेही शक्ती बुध्दीच्या बाबतीत सारखेच असतात.
(2) मंत्र, तंत्र,नवस, बळी, प्रसाद यामुळे मुल होणे, मुलीचा मुलगा होणे या गोष्टी कधीही शक्य नाहीत
(3) "अंगात येणे" हे देवीमुळे शक्य होत नाही, तो मानसिक आजार, संमोहनाची एक अवस्था किंवा ढोंग  आहे.
(4) कोणाकडेही दैवी शक्ती नसते.
(5) कोणताही चमत्कार, भौतिक अथवा रासायनिक विज्ञानांमधल्या तत्वावर आधारलेला असतो किंवा हातचलाखीने केलेला असतो.
(6) कोणालाही कोणतीही गोष्ट हवेतून काढता येत नाही.
(7) चमत्कार करुन कोणाचीही फसवणूक करणे हा गुन्हा आहे.
(8) मंत्र, तंत्र, ताईत, अंगारा, गंडे, दोरे, उतारा यांनी कोणताही आजार बरा होत नाही.
(9) आकाशातील ग्रह ताऱ्यांचा मानवावर कोणताही परिणाम होत नाही.
(10) आपले भविष्य आपल्या मनगटात असते, आपण आपले भविष्य बनवू शकतो.
(11)  ज्योतिष हे विज्ञानासारखे शास्त्र नाही.
(12) भानामतीमुळे घरातील वस्तू धडपडतात, डबे फळीवरुन खाली पडतात, वस्तू घराबाहेर फेकल्या जातात, कपडे फाटतात, कपडे पेटतात, पिठात राख मिसळते, अन्नात वाळू पडते, अंगावर बिब्बाच्या फुल्या उमटतात.  घरावर लिंबू, दगड पडतात.  भानामतीमुळे अशा काही गोष्टी घडतात असे लोक समजतात परंतु ते खरे नाही.
(13) या जगात कोणतीही अतींद्रिय शक्ती नाही.
(14) भानामती घरातील मानसिकदृष्ट्या विकृत व्यक्ती घडवत असते.
(15) बाह्य प्रेरणेशिवाय जागची वस्तू हलत नाही.
(16) करणी, मुठ, भानामती या गोष्टी खोट्या आहेत.
(17) निसर्गात घडणारी कोणतीही घटना शुभ किंवा अशुभ नसते.
(18) "नवस करुन हवे ते मिळविता येते" हा गैरसमज आहे.
(19) नवस फेडण्याच्या प्रयत्नात माणसाचे आर्थिक, शारीरिक नुकसान होते.
(20) स्वत:च्या प्रयत्नाने आपण आपली प्रगती करु शकतो.  आपले भविष्य आपल्या हातात म्हणजे प्रयत्नात असते.
(21) माणूस मेल्यानंतर त्याची राख होते किंवा माती होते, भूत होत नाही.
(22) भूत ही एक कल्पना आहे. ते सत्य नाही.
(23) निर्भय होऊन, धीट होऊन चिकित्सा करणे आवश्यक आहे.
(24) साप, नाग आपली दैवते नाहीत, पण मित्र आहेत.
(25) आपल्याकडे आढळणारे बरेच साप बिनविषारी असतात, फक्त नाग, मण्यार, घोणस, फुरसे या जातीचे साप विषारी असतात.
(26) विषारी साप चावल्यास दाताच्या दोन खुणा उमटतात.
(27) विषारी साप चावल्यास त्या व्यक्तीला प्रतिविषाचे इंजेक्शन घेण्यासाठी सरकारी दवाखान्यात न्यावे, इतर कोणत्याही उपायाने  विष उतरत नाही.

Monday, April 17, 2017

एक गोष्ट

थोडं थांबून शांत मनाने वाचावी
अशी एक गोष्ट !!
******
ब्राझील देशातील थेन चिकीनो स्कार्पा नावाच्या एका गर्भ श्रीमंत माणसाने एक गोष्ट घोषित केली की, त्याच्या कडे असलेली करोडो डाॅलर किमतीची बेंटली कार तो दफन करणार..!!
मृत्युनंतरच्या जिवनात ही ऐशोरामात या कार मधून फिरण्याची त्याची मनिषा पारलौकीक जगातही पूर्ण होत रहावी , हा त्याचा उद्देश असल्या चेही त्याने जाहिर केले.

अर्थातच माध्यमांनी त्याच्या या विचित्र घोषणेला प्रचंड प्रसिद्धी दिली. देशभर चर्चा सुरू झाली. या चर्चेचा सूर नकारात्मक होता. थेन चिकीनो वर प्रचंड टिका करण्यात आली. एवढी किमती कार पुरून टाकणे हा मुर्खपणा असल्याचे लोकांनी म्हटले आपणास ही कार विकायची नव्हती तर  दान करून टाकली असती तर पुण्य तरी मिळाले असते असा सल्ला ब्राझिलीयन मेडिया ने दिला...
😃

हे कृत्य म्हणजे राष्ट्रीय संपत्तीचा विनाश असल्याचेही अनेकांनी म्हटले.. तेथील काही राष्ट्रभक्तांनी त्याला देशद्रोही ही संबोधले.

अखेर सर्व प्रकारच्या टिकेला सामोरे जात थेन चिकीनो ने त्याच्या स्टेनली कारच्या दफन विधी समारंभाची तारीख ही जाहिर करून टाकली.
 
झाले...अखेर तो दिवस उजाडला.
प्रचंड गर्दी जमली.
विविध माध्यमांचे अनेक प्रतिनिधी लाईव कवरेज साठी हजर होते..
🏎  🚗  🚕 🚙

येथे कहाणीला ट्विस्ट आहे .
आणि तसा तो नसता तर
हा किस्सा आपणासाठी मी लिहीला ही नसता...
आणि जगभरच्या माध्यमांनी त्यास एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी ही दिली नसती...

थेन चिकीनोने घराच्या अंगणातच कार पुरता येईल एवढा मोठा खड्डा खणून घेतला होता... थोड्याच वेळात ही महागडी कार पुरली जाणार होती.
तेवढ्यात थेन चिकीनो ने, तो ही कार दफन करू इच्छित नाही अशी घोषणा केली.. आणि हा दफन विधीचा ड्रामा एका अत्यंत आवश्यक अशा राष्ट्रीय कार्या साठी असल्याचे सांगितले.
ह्या गुपित राष्ट्रीय कार्याची उकल त्याने केली तेव्हा उपस्थितां नी टाळ्यांचा कडकडाट केला व थेन च्या जय जय काराच्या घोषणा दिल्या.
***
अवयव दानाचे महत्व माझ्या देशातील जनतेला कळावे हाच एकमेव पवित्र उद्देश ह्या दफन नाट्या मागे असल्याचे थेन ने सांगितले.

थेन चिकानो म्हणाला,
"लोकांनी मी महागडी / किमती कार दफन करणार म्हणून मला मुर्ख म्हटले. खरी गोष्ट तर ही आहे की ह्या कारपेक्षा ही खूप किमती असलेले अवयव आपण पुरून टाकता. हृदय, यकृत, फुफ्फुसे डोळे, मूत्रपिंडे आदी अवयव पुरून टाकणे हा मी करत असलेल्या मुर्खपणा पेक्षा खूप मोठा मुर्खपणा कळत नकळत आपण सारेच जण पिढ्यान पिढ्या करत आहात..!! आपल्या देशात हजारो लाखो रूग्ण अवयवांची वाट पहात आहेत. कोणी त्यांना दान दिले तर त्यांना नवा जन्म मिळणार आहे..!!
अनेकांचे प्राण यातून वाचू शकतील..!!
आज आपण ही अवयव दानाचा संकल्प करूया.

 ..अवयव दानाचा प्रचार व प्रसार करावा व ..ब्रेन डेड परिस्थितीत जरूर निर्णय घेऊन गरजवंतांना अवयव दान करुन मदत करावी .

Friday, April 7, 2017

मुहूर्त

बाळाला *काळे*
टिके लावून त्याचे संरक्षण झाले असते तर भारतात *बालमृत्यूदर शून्य*
असता .

 गाडीला *लिंबूमिरची*
लावून गाडीची सुरक्षा झाली असती तर भारतात *अपघातांची*
संख्या शून्य असती.

 पूजा करून धंद्यात बरकत आली असती तर भारतात सगळेच
*उद्योजक*
 झाले असते.

बुवाबाबा कडे जाऊन दु:ख निवारण झाले असते तर समस्त बुवाबाबा भक्त *सुखी*
 दिसले असते.

कुंडल्या मिळवून नवरा बायकोची मनं जुळली असती तर सगळी अरेंज मॅरिजिस *यशस्वी*
झाली असती.

*यज्ञ*करून  जिंकता आले असते तर भारत एकही मॅच हरला नसता

*चिकित्सक विचार व वैज्ञानिक दृष्टिकोनच आपल्याला प्रगत करेल.*

      मुहूर्ताचे वेड

ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ..!!

जन्माला येताना कधी मुहर्थ पाहत नाही. व मरतानाही पाहत नाहीत.

 तरी सुद्धा जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते.

 सगळेच दिवस,, सर्वच वेळ शुभ आहे.

फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी..

आपल्यासाठी  सर्वच दिवस सर्वच वेळ शुभ आहे..!!

कुंडल्या पाहून लग्नांचे मुहूर्त काढले जातात तरी अनेक स्त्रीया विधवा व पुरूष विधूर का होतात...?

पत्रिका व कुंडली जुळवून लग्न झालेल्या जोडप्यांचे घटस्फोट का  होतात, तर काही अकाली मृत्यू होतात असे का..?

95% विवाह हे मुहूर्तानुसार वेळेवर लागत नाहीत तरी मुहूर्ताचा आग्रह का धरावा...?

 
 मुहूर्त पाहून निवडणुकीसाठी उभे राहणा-या सर्व उमेद्वारांपैकी एकच निवडून येतो आणि बाकीचे आपटतात. असे का घडते.....?

 एकालाच मुहूर्त शुभ होता काय ?

मंत्रीपद मिळाल्यानंतर  मंत्रालयाची  जबाबदारी स्वीकारण्यासाठी  व खुर्चीवर बसण्यासाठी  शुभ मुहूर्त शोधतात तरी त्यांच्या योजना अयशस्वी का होतात...????

 मंत्रीपद अल्प कालावधीत का जाते !

शुभ मुहूर्तावर  मूल जन्माला घातल्यास  वैज्ञानिक,  राष्ट्रपती,  पंतप्रधान  होईल काय..?

 अंबानीच्या जन्म मुहूर्ताला जन्माला आलेली  व्यक्ती ....ती पण ..अंबानीसारखी  झाली का...?

उच्च शिक्षित डॉक्टर, इंजिनियर  , उद्योजक, आपल्या कार्यालयाचे  बांधकाम करतांना,  व्यवसायास प्रारंभ करतांना मूहूर्त पाहूनच सर्व करतात.....

तरी सुद्धा  कित्येकांना अपयश येते असे का...?

         :  कारण :

  शुभमुहूर्त  हे थोतांड आहे सत्य नव्हे... ज्यांचा स्वतः वर विश्वास नसतो ,तेच लोकं अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात.

 मुहूर्त पाहणारी पेशवाई नष्ट झाली ...आणि कधीही मुहूर्त न पाहणारी .....ब्रिटिशशाही अख्खा  भारत देश गिळून बसली.

*स्वतःवर व स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा.

*जर तुमचं मन साफ असेल व  तुमच्यात प्रयत्न करण्याची क्षमता  असेल... तर तुमच्यासाठी कोणतीही  वेळ  ही  ' चांगली वेळच असते " चला तर आजपासून शुभ-अशुभ या चक्रात न पडता विज्ञानवादी होऊ या.*

Wednesday, March 22, 2017



महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचाबाबत बोलताना डॉ. नरेंद्र दाभोलकर
विशेषतः स्त्रियांसाठी महत्त्वाचा व्हिडीओ

Wednesday, August 17, 2016

जगदीश काबरे

1] मनुस्मृती,पुराणे आणि देवळे असा तिपेडी फास हिंदू समाजावर लटकवून भिक्क्षुकशाही ब्राम्हणांनी आपल्या जातीच्या सवतसुभ्याचं सोवळं वर्चस्व आजवर टिकवून धरलेलं आहे.या मर्मावर कुणी घाव घालताच एकजात सुधारक-दुर्धारक भट सापासारखे फुसफुसतात. कारण या तिपेडीवर प्रत्येक भट जगत असतो. पण या तीनही गोष्टी म्हणजे अखिल भटेतर दुनियेच्या उरावरील प्राणघातक धोंडी आहेत. या गोष्टी नष्ट करा! जाळून खाक करा!! की भिक्षुकशाही रसातळाला गेलीच!!! ( प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘देवळांचा धर्म, धर्माची देवळे’ या पुस्तकातून साभार.)

2] जुने-जुनाट असणे हा विषय अभिमानाचा कसा असू शकतो ? एखादा माणूस अनेक वर्षे एकच जुनाट वस्त्र वापरत असेल तर त्यास आपण दारिद्र्याची, दुर्दैवाची खूण समजू की अभिमानास्पद वैभवाची ? मग ऐंशी टक्के माणसांना गुलाम ठरवणाऱ्या जुनाट संस्कृतीचा अभिमान का बाळगावा ? [नरहर कुरुंदकर, मनुस्मृती- इंद्रायणी प्रकाशन]

3] मुखें सांगे ब्रम्हज्ञान ।जन लोकाची कापितो मान ।।१।। ज्ञान सांगतो जनासी । नाहीं अनुभव आपणासी ।।ध्रु।। कथा करितो देवाची । अंतरी आशा बहु लोभाची ।।२।। तुका म्हणे तो चि वेडा। त्याचें हाणूनि थोबाड फोडा ।।३।।

4] महारासी सिवे । कोपे ब्राह्मण तो नव्हे ॥१॥  तया प्रायश्चित्त काही । देहत्याग करिता नाही ॥धृ॥  नातळे चांडाळ । त्याचा अंतरी विटाळ ॥२॥ज्याचा संग चित्ती । तुका म्हणे तो त्या याती३॥[संत तुकाराम महाराज ]

5] वैज्ञानीक शोध लावणाऱ्यात एखादा तरी चमत्कारी-दैवी शक्तीधारी बाबा, बूवा, बापू, महाराज, साध्वी, पंडित आहे का? यांच्याकडे तर दैवी सिद्ध शक्ती असते म्हणे!
यांच्या तंत्रा-मंत्रात-पुजेत-पंचांगात आणि होमहवनात शक्ती असते म्हणे!! मग ह्या ''नमुन्यांनी" एखादा तरी शोध लावायला पाहिजे होता की नाही? पण यांनी आजपर्यंत एक तरी शोध लावला का? नाही ना? कारण मित्रांनो, बाबा,बुवा,महाराज,पंडित ही सर्व माणसे देवाधर्माच्या नावावर जगणारी व चलाखीने सर्वसामांन्याचे शोषण करणारी बांडगुळं आहेत.

वैज्ञानिक ,संशोधक शास्त्रज्ञ आणि ज्यांनी समानतेचे धडे दिले ते समाजसुधारक संतच आपले खरे हिरो व आदर्श आहेत. त्यांच्या संशोधन आणि अथक परिश्रमांमुळेच जनजागृती होऊन आज समाजास सुखी व आनंदमय जीवन लाभलेले आहे.या बांडगुळांमुळे नाही. म्हणुन पालकांनी आपल्या मुलामुलींवर व शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर चिकित्सक विज्ञानवादी व बुद्धीप्रामाण्यवादी होण्याचे संस्कार केले पाहिजेत. तेव्हाच भारतात जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ पुन्हा तयार होतील.तरच प्रगत व बलशाली भारत निर्माण होईल.(^M^)  (^J^) (मनोगते)